Sunday, 21 September 2014


भाग ३
          बाबरी मशीद

याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभे राहिले .ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने .बाबरी मजीदचे आंदोलन म्हणजे उच्चवर्णीयांच्या हिंदू संघटनेचा राजकीय उठाव .या सवर्ण हिंदू संघटनानी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्नही उपस्थित केला .राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या प्रश्नांवर कदाचित सोबत राहणार नाही म्हणून त्यांनी घटनेलाच विरोध केला आणि घटना बदललीच पाहिजे अशी भूमिका घेतली अशी भूमिका घेतली .घटना बदलामध्ये त्यांचे दोन महत्वाचे मुद्दे होते ,ते म्हणजे संसदीय लोकशाही ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे आणि दुसरा राखीव जागा काढून टाकणे .त्यांनी जो धोरणात्मक बदल केला तो राखीव जागा ऐवजी घटनाविरोधी भूमिका घेतली .हि भूमिका घेण्यामागचा त्यांचा हेतू कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी हिंदू यांच्यात पडत चाललेली दरी मिटवायची असेल तर आपण राखीव जागाविरोधी आहोत असे दर्शविता कामा नये .या सर्व धार्मिक संघटनानी भाजपा आणि शिवसेनेला पुढे केले .खरे तर त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती .उच्चवर्णीय मंडळींनी यापूर्वी राखीव जागेच्या विरुद्ध गदारोळ उभा केला होता .त्यांच्यातला जो धोरणात्मक बदल त्यांनी केला त्याचे कारण हे की राखीव जागेच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली .ओबीसी आपल्याकडून निघून जातो आणि घटनाविरोधी भूमिका आपण घेतली तर आंबेडकरी समूह जोरदार रीअक्शन देईल .त्यांच्या रिअक्शन ने आपल फायदा होईल .त्यांना आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे reacti रिअक्शन देण्यात फार तत्पर आणि उत्साही आहेत याची जाणीव होती .आंबेडकरवाद्यांनी घटना घटना बदलाला रिअक्शन दिली कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी यांना एकत्र आणता येते हे त्यांचे गणित होते .आंबेडकरी चळवळ एकजातीय स्वरुपाची असल्यामुळे ‘आपली घटना बदलत आहेत ‘ ह्या आंबेडकरवाद्यांच्या विधानाचा अर्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोयीस्करपणे ‘हि त्यांची घटना ‘ असा केला आणि म्हणून ते चवताळलेत असा प्रचार केला .आणि म्हणून लोकांची दिशाभूल केली .आपल्याला ‘आपली घटना बनवायची आहे ‘ असा प्रचार सुरु केला व दुसरी घटना बनविण्यासाठी वातावरण तयार करायला सुरुवात केली .आंबेडकरी मंडळी आपण काय भाषण देतो याचा सारासार विचार कधीच करीत नाहीत .त्यामुळे अनेकदा आपली भाषणे अनेकदा विरोधकांच्या हातात आयते कोलीत देतात .याला भाबडेपण म्हणावे ,अज्ञान म्हणावे कि हेतुपुरस्कर हे मला तरी समजत नाही .आंबेडकरवादी चळवळ हि अशाप्रकारे प्रतिक्रियावादी पद्धतीने पुढे चालवत गेली तर जास्त काळ टिकणार नाही .परंतु राखीव जागांचा मुद्दा हा घटनेचा अविभाज्य घटक आहे आणि तो संविधानाचा मुलभूत पाया आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपा व शिवसेनेने हेतुपुरस्कर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलाचा नारा दिला . भारिप ने यातून मार्ग काढण्यासाठी शेगाव ला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतले .त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादीवरती ओबीसी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली .उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसींना बरोबरीने आणि समानतेने वागवत नाहीत ,भेदभावाने वागवितात .ओबीसींना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी मागणी केली होती .ओबीसी हिंदुना स्वतःचे शत्रू मित्र कोण आहेत हे समजावे व त्यांची अस्मिता जागृत व्हावी यासाठी हे आवश्यक होते .शेगावची मागणी व मंडल कमिशनचा स्वीकार यामुळे बीजेपी –सेना हिंदूचे राजकीय संघटन उभे करीत होते त्याला खूप मोठा शह मिळाला .त्यांनी राखीव जागा आंदोलनापेक्षा बाबरी आंदोलनाला अग्रक्रम दिला .
आंबेडकरी चळवळी ने नव्याने आलेल्या आर्थिक धोरणाच्या विरोधात चळवळ उभारली असती आणि खाजगीकरणाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असती तर ओबीसीनां हिंदू धार्मिक संघटनेने केलेला धोरणात्मक बदल म्हणजे राखीव जागाविरोधी होण्याऐवजी घटनाविरोधी होण यातला फरक त्यांना समजाविता आला असता आणि खाजगीकरण आणि बाबरी मशिद हे दोन्हीही राखीव जागाविरोधी आहेत हे स्पष्ट झाले असते .यामुळे कदाचित त्यावेळची विधवंसकतेची तीव्रता कमी झाली असती .आंबेडकरी चळवळीमध्ये दादासाहेब गायकवाड यांनी केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह हा अपवाद आहे .यापुढे तरी आंबेडकरी चळवळ सामाजिक प्रश्नाबरोबर आर्थिक प्रश्नांना प्राधान्य देणार असती तर नंतर झालेल्या विध्व्सांची तीव्रता कमी करता आली असती .आंबेडकरी चळवळीच्या या वाटचालीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेला ‘भूमिहीनांचा सत्याग्रह’ हा एकमेव अपवाद आहे .
बाबरीमुळे उच्चवर्णीयांचा डाव सफल झाला .त्यामुळे त्यांनी राखीव जागेच्या प्रश्नावरून समाजाचे लक्ष्य विचलित केले .असा परिणाम समाजात होऊ नये .उच्चवर्णीय हिंदू आणि ओबीसी हे एकत्र झाले तर विस्कटलेली आंबेडकरी चळवळ पुन्हा एकजातीय होण्याचा धोका दिसत होता म्हणून ओबीसीच्या चळवळीला पाठींबा देणे ,त्या उभारणे महत्वाचे होते .
व्ही .पी .सिंग
बोफोर्स प्रकरणाच्या वादातून विश्वनाथ प्रताप सिंग हे कॉंग्रेस मधून बाहेर पडले होते .त्यांचा राजकीय प्रवास जनता दल निर्माण करण्यापर्यंत झाला .या पक्षाबरोबर आम्ही राजकीय समझोता व करारनामा करण्याचा निर्णय घेतला .या पक्षाबरोबर सत्तेत आलो तर पुढील प्रश्नावर अंमलबजावणी होईल .
१ ) बौद्धांना सवलती
२ ) प्रशासनाकडून सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेवरती होणारे अन्याय –अत्याचार व त्याचबरोबर राज्यांनी एस .सी ,एस.टी .साठी केलेले प्रावधान याची कशापद्धतीने अंमलबजावणी हिते ,याची चौकशी व्हावी .
३ )एस .सी .,एस .टी . वित्तीय महामंडळानां दरवर्षी किमान दोनशे कोटींचे अनुदान मिळावे
४ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे
५ ) मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी .
६ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या सभागृहात लावणे .
१९९० साली सत्ता आली आणि प्रश्नांची लगेच सोडवणूक झाली .राज्यव्यवस्था अनुकूल असेल तर प्रश्न लगेच सुटू शकतात हे यातून सिध्द झाले . १९५६ ते१९९० या काळातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पत्रक ,पोस्टर्स ,मोर्चे ,आंदोलने यांच्याकडे आपण नजर टाकली तर सर्वात प्रथम बौद्धांना सवलती दिल्याच पाहिजेत हि मागणी असायची .या मागणीनंतर इतर मागण्या असायच्या .
 क्रमश :

-    adv  प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर 


                                   भाग २

  
सतरा लाख मतदार

 लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते .निवडणूक हे साधन आहे .निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते .आंबेडकरी चळवळ जी निवडणूकीपासून कोसभर दूर गेली होती .एव्हढेच नव्हे ,तर समझोत्याच्या राजकारणाची स्वतःचे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती ; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या कि ,’सिट ऑर नो सिट’ ,’व्होट फॉर कॉंग्रेस ‘ तिला निवडणुकीच्या आखाड्यात आणण्यासाठी १९८५ -८६ च्या विधानसभा ,लोकसभा निवडणुका लढवून पक्षाने १७ लाख मते मिळविली .हेच पक्षाचे खरे भांडवल .त्यानंतर अनेक लढे व निवडणुका झाल्या .पक्षावरचा विश्वास  डगमगला नाही .या १७ लाख मतदाराच्या जोरावर आम्ही सत्ता या बाजूची त्या बाजूला फिरवू शकतो हे  प्रत्यक्षात दाखविले .निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली . त्यामुळे भटके –विमुक्त ,आदिवासी ,ओबीसी , ‘नाही रे वर्ग ‘ यांचे पक्षाकडे आकर्षण वाढले .या प्रक्रियेमुळे सत्ताधारी वर्गात भीती निर्माण झाली .डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी इतिहासकालीन सांस्कृतिक रचनेची मीमांसा करताना ब्राह्मण सोडून इतर सर्वच जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहेत (सामाजिक नाही ) हे सूत्र मांडले होते .आणि म्हणूनच सामाजिक स्वातंत्र्याचा लढा ब्राह्मण्याविरुध्ह झाला .बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्रात ब्राह्मणांची जागा आता मराठा समाजाने घेतली आहे .त्यामुळे आता सार्वजन आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे असा आग्रह मराठा समाजापुढे करताहेत .तो मिळत नसल्यामुळे हा लढा मराठविरोधी होत आहे .त्यांच्याबाबत इतर समाजात तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे .यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असेल ,असा ज्यावेळी प्रचार करण्यात आला त्याचवेळी त्याचवेळी मराठेतर समाज आपल्याकडे आकर्षित होऊ लागला .या दरम्यान १९९२ साली आम्ही किनवटची पोटनिवडणूक लढविली .पक्षाने आदिवासी उमेदवार निवडून आणला .पक्षाचे हे मोठे यश होते .पक्षाला ताकदही मिळाली .याच काळात नांदेडच्या गौतम वाघमारे यांच्या हौतात्म्यामुळे सरकारला पुन : नामांतर प्रश्नावर विचार करण्याची पाळी आली .त्याचवेळी मंडल कमिशनच्या शिफारसी स्वीकारण्यात याव्या या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे ओबीसी समूह जागरूक होत होता .त्याचबरोबर मंडल आयोगाला झालेल्या कडव्या विरोधामुळे उच्चवर्णीय हिंदू समूह आपल्या बाजूने नाही याचेही भान प्रथमच ओबीसींच्या समूहांना होत गेले .बाबासाहेबांनी आपल्यासाठीहि तरदूत ठेवली आहे हि जाणीव त्यांच्यात पसरत होती .त्याचा परिणाम म्हणजे बाबासाहेबांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलत होता .पक्षाने १९९३ मध्ये नागपूरला काढलेल्या मोर्चात पहिल्यांदा हा ओबीसी समूह फार मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता .हा आंबेडकरी चळवळीतील लक्षवेधी बदल होता .पक्षाकडे आलेले हा ओबीसी पाहून सरकार हादरले आणि त्याचबरोबर नामांतराचा प्रश्न सामंजस्याने मिटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली .जे नामांतर झाले त्यामध्ये आंबेडकरी समूह आणि मराठा समाज या दोघांच्याही अस्मिता कायम ठेवून नामांतर झाले .हा तोडगा त्याही काळी मांडण्यात आला होता .परंतु त्यावेळीच्या नेतृत्वामध्ये ते स्वीकारून जो कोणी विश्लेषात्मक अभ्यास करील ;त्याच्या पुढे नेहमीच कोडे राहणार आहे , कि एव्हढे जीव आणि मालमत्ता कुर्बान का केली ? अठरा वर्ष रेंगाळत असलेला नामांतराचा प्रश्न १९९४ साली निकाली काढला .

              रिडल्स
या पक्षाच्या नव्या चेहर्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलू लागली .पक्षाची ताकदही वाढली .त्याचबरोबर हि ताकद मोडून काढण्यासाठी अनेक राजकीय खेळी सुरु झाल्या .त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘रिडल्स इन हिंदूइझम’ मधील ‘रिडल्स ऑफ रामा ‘ याच्या विरोधात फेब्रुवारी १९८७ मध्ये वातावरण पेटविण्यात आले .त्याच जातीयवादी व धर्मांध शक्तींनी पुढाकार घेतला व त्यांनी शिवसेनेसारख्या धर्मांध राजकीय पक्षाला पुढे करून हा लढा आक्रमक केला .त्याचे कारण आंबेडकरी चळवळ हि एकजातीय न राहता ,ती वेगवेगळ्या समदुखी समूहांची चळवळ होऊ पाहत होती .त्यात ती यशस्वी झाली तर आपल्या पारंपारिक सत्तेला धक्का पोहोचेल हि भीती होती .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर कट्टरपंथी हिंदू संघटनांनी मराठा समाजाला हाताशी धरून धर्मातरीत समूहाला व्यवस्थितपणे एकाकी पाडले .त्यांना ‘धर्मबुडवे ‘ म्हणून संबोधले .याचा परिणाम म्हणजे धर्मांतरित बौद्धांना इतरांपासून राजकीयदृष्ट्या त्यांनी एकाकी पाडले .परंतु दुसर्या बाजूने त्याचा फायदा असा झाला कि ,धर्मांतरित समूह स्वता:कडे व स्वतःच्या चळवळीकडे अंर्तमुख होऊन पाहू लागला .या घटनांमुळे एका बाजूला त्यांनी धर्मांतरित समूहाच्या लढाईला सुरुवात केली आणि दुसर्या बाजूला त्यांनी नव्याने निर्माण होणार्या सामाजिक व्यवस्थेत समता आणि बंधुत्वाचे तत्व रुजविण्यासाठी प्रयत्न केला .त्यांना मिळालेल्या या नव्या स्वातंत्र्यामुळे व दृष्टीमुळे त्यांनी स्वतः ला शिक्षित करून घेतले .सरकारी नोकर्यांमध्ये प्रवेश केला .आर्थिक बदलही झाला .स्वतः मध्ये आणि आपल्या नातेवाईकामध्येही त्यांनी परिवर्तन घडवून आणले .त्यांच्यावर जी सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न झाला ; तो त्यांनी हाणून पाडला.अशा बंधनांची त्यांनी पर्वादेखील केली नाही .स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतर त्यांनी समदुखी समूहाचा शोध घेण्यास सुरुवात केली .त्याला बंधनातून मुक्त करण्यासाठी ते धडपडू लागला .इतरांच्या प्रश्नांवरही ते रस्त्यावर उतरले .मंडल आयोगाची अंमलबजावणी ,अत्याचारविरोधी भूमिका ,विषमता विरोधी पुढाकार हि त्यातली काही ठळक उदाहरणे आहेत .या प्रक्रियेतून ते  ‘धर्मबुडवे’ या प्रतिमेमधून बाहेर पडले .उलट ते इतरांसाठी परिवर्तनाचे एक प्रतिक बनले  आहेत व सामाजिक बंधने मोडण्यात ते यशस्वी होत आहेत हे लक्षात येताच रिडल्स प्रश्न उपस्थित करून व्यापक होणार्या त्यांच्या चळवळीला पुन्हा जातीपुरती संकुचित करण्याचा प्रयत्न्न झाला .हि परिस्थिती निर्माण करण्यात आली .कारण त्यांना माहित होते कि , आंबेडकरी चळवळीतील माणूस ‘प्रतिक्रिया’ देण्यामध्ये तत्पर आहे .त्यांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू देव देवतांना शिव्या द्यायला सुरुवात झाली कि ,जे हिंदू राजकीय दृष्ट्या पक्ष सोडल्याशिवाय गत्यंतर नाही . या परिस्थितीचे भान ठेवून आंदोलन हे १) आंबेडकरी अस्मिता विरुध्द हिंदू अस्मिता असे होणार नाही . २) हे आंदोलन लेखन स्वातंत्र्य याच मुद्यावर लढले गेले पाहिजे ३) आंदोलनाचे केंद्र हे मुंबई शहर राहिले पाहिजे  ४) नामांतर आंदोलनातील त्रुटी या आंदोलनापासून वगळल्या गेल्या पाहिजेत या मुद्यावरच लक्ष केंद्रित होईल हे आम्ही जाणीवपूर्वक पहिले व तशी काळजी घेतली .
 रिडल्सच्या प्रश्नावर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊ नयेत तर एकच प्रवाह निर्माण व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटना /नेत्यांना एकत्र आणले .या सर्वांना एकत्र आणायचे होते ; त्याचे कारण त्यांना मोकळे सोडले असते तर प्रत्येकाने मीच बाबासाहेबांच्या विचारांचा ‘सच्चा पाईक’ आहे हे सिद्ध करण्यासाठी कडव्यातली कडवी प्रतिक्रिया देत तेहत्तीस कोटी देवांचा उद्धार केला असता .त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली असती .चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या भाषणातून शत्रूच निर्माण केले असते .असे झाले असते तर आंबेडकर चळवळीच्या बाहेरील समूह जे परिवर्तनाच्या बाजूने आहेत .त्यांची दारे चळवळीला बंद झाली असती .नामांतर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाली असती .मला हे कधीच कळले नाही कि ,तेहत्तीस कोटी देवांना शिव्या दिल्यामुळे चळवळीचे कसे भले होणार आहे ? उलट चळवळीला पोषक वातावरण निर्माण होण्याऐवजी अशा प्रतिक्रिया आणि अशा भाषणामुळे आपण शत्रूच निर्माण केले आहेत .या सर्वाना एकत्र करून पक्षाने ठरविलेली भूमिका सर्वासमोर गेली आणि त्यामुळे घटनेने बहाल केलेले विचाराचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे याचवरती रिडल्सचा प्रश्न फिरू लागला या भूमिकेमुळे समाजातील अनेक संघटना ,विचारवंताना आपल्या बाजूने येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले .त्यामुळे आंबेडकरी चळवळी शिवाय इतरही ‘लेखन स्वातंत्र्य अबाधित राहिले पहिजे’ हि भूमिका घेणार्यांना आपल्याबरोबर यायला काहीच अडचण राहिली नाही .त्यांचा पाठींबा आणि सहभागामुळे महाराष्ट्र शासनाला ‘रिडल्स’ जसेच्या तसे प्रकाशित करावे लागले .येथे दोन गोष्टीचे स्मरण आपणास करून देऊ इच्छितो .आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेते त्यावेळी मी इतरांपेक्षा मी कसा लायक आहे हे सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध झाले होते .ते नेतृत्वासाठी भांडत होते .त्यावेळचा ‘नवाकाळ’ नजरेखालून घातला तरी हि परिस्थिती आपल्या लक्षात येईल .त्याचा एक फायदा आम्हाला असा झाला कि हे नेतृत्वासाठी भांडत राहिल्यामुळे रीदाल्सचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे जी उद्धिष्ठे समोर ठेवून लढा उभा केला त्याच प्रश्नावरती रिडल्सची चळवळ केंद्रित करण्यात यश आले .त्यात ज्या दक्षता घ्यायच्या त्या घेता आल्या .त्यापैकी सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हा लढा आंबेडकरी अस्मिता विरुद्ध हिंदू अस्मिता असा होऊ दिला होऊ द्यायचा नाही त्यात आम्ही यशस्वी झालो .दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा लढा शांततेने लढायचा .दंगल करून नव्हे .हा आंबेडकरी चळवळीचा संदेश लोकांना द्यायचा होता ,तो दिला . बाळ ठाकरे यांनी मुंबईत त्यावेळी मोठा मोर्चा काढून दलितांची घरे जाळा असा संदेश दिला होता ; त्याचवेळच्या परिस्थितीचे भान ठेवून मुंबईत बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या घरातल्या चुली पेटवू या असे आवाहन मी केले होते .त्यातून ठाकरेंची फजिती झाली आणि समयसूचकतेतून प्रश्न सुटायला मदत झाली .त्यामुळे सरकारने पुन्हा रिडल्स इन हिंदूइझम प्रकाशित केले .नामांतराचा लढा हा मराठा अस्मिता विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असा होता .परंतु रिडल्सचा लढा हा हिंदू अस्मिता विरुध्द आंबेडकरी अस्मिता एव्हढा व्यापक होता तरीही कुठेही दंगल आणि रक्तपात न होता तो प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो .
‘येरे माझ्या मागल्या ‘ या म्हणी प्रमाणे एकत्र आलेले नेते आणि संघटना ,आंबेडकरी चळवळीचे स्वतःचे स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा पुन्हा कुणाच्या ना कुणाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या राजकारणात गर्क झाले .ते आपल्याला राजकीय मित्रांबरोबर समझोता करत फिरत राहिले .नेते जरी वेगवेगळे राहिले तरी रिडल्समुळे एकत्र आलेल्या जनसमुहाची ताकद पक्षाबरोबर राहिली .त्या भरवशावर पक्षाने स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली .
                               क्रमश :                          





प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक " आंबेडकरी चळवळ संपली आहे ....." १ जानेवारी २००७ साली प्रकाशित झाल , पुस्तकाच शिर्षक हे मा .ज .वि .पवार यांनी दिलेलं असून त्यात असणारा फुल stop नाही तर टिंब टिंब आहे . २००७ पासून हे पुस्तक न वाचता केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येकजन बाळासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा हवाला देऊन केवळ टीका विरोध आणि खालची पातळी गाठतो परंतु नेमक हे पुस्तक काय आहे आणि यामध्ये बाळासाहेबांनी अस काय लिहिलेलं आहे हे वाचन अत्यंत महत्वाच आहे . ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं असेल त्याचं आकलन नक्कीच झालेलं असेल आणि वाचणारा हाही विचार करेल कि बाळासाहेबांनी सांगितलेलं विचार आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठीच आहे म्हणून मी मा .बाळासाहेब आंबेडकर यांची परवानगी घेऊन संपूर्ण पुस्तकाचे भाग विभाजित करून टाकणार आहे . तरी सर्वांनी ते वाचून जरून आपली मते आणि पुस्तकातील विचारांचा प्रसार करावा हि विनंती .

                                     - प्रवीण जाधव

                                         " आंबेडकरी चळवळ संपली आहे ...."

                    भाग -१
  
         डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी आपली चळवळ कशी उभी केली ;याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला . तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे .त्यानिमित्ताने ,मी १९८० साली पुणे ,सातारा ,कोल्हापूर ,कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला .जुन्या माणसांशी बोललो .त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केले ,आठवणी सांगितल्या .बाबासाहेबांची जेंव्हा चावडीत बैठक सुरु असायची त्यावेळी अनेक ज्ञातिबांधव मुद्दामहून चावडीत झोपण्यास येत असत .ते बाबासाहेबांना उद्देशून म्हणत असत कि .' हा काय करणार आहे ? हा तर आमची हाडकी -हडावळी ,आमचे बावन्न अधिकार काढायला निघालाय .' अशा परिस्थितीत डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी जे कोणी या चळवळीला सहकार्य करतील ,त्यांना बरोबर घेऊन आपली चळवळ पुढे नेली .याचा अर्थ असा होतो कि त्यावेळीही समाजात काही जागरूक लोक होते ते बाबासाहेबांबरोबर आले.  जे नव्हते ,ते बाजूला थांबले .कालांतराने ज्यांनी बाबासाहेबांना सहकार्य केल नाही तेहि चळवळीत आले .त्यावेळी ज्यांना हाडकी हाडवळ हे सुरक्षेचे कवच वाटत होते ;तेच बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले .पण जेंव्हा त्यांना " हाडकी - हाडोळी " हे सुरक्षेचे कवच नाही ,तर गुलामीची निशाणी आहे हे लक्षात आले ; त्यावेळी त्यांनी आपला पवित्र बदलला व ते आंबेडकरी चळवळीचे वाटसरू बनले .हे या ठिकाणी सांगण्याचे कारण कि ,जी परिस्तिती असते तिच्यात लोक बदल करण्यास तयार नसतात .अशा वेळी नवी व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात जी सतर्कता यांच्यात हवी असते .ती तयार झालेली नसते . माझा राजकीय जीवनातील  चोवीस वर्षाचा अनुभव मला हेच सांगतो आहे .

  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी एक जुनी व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण केली .त्यातून आपल्याला जे अधिकार मिळाले त्या लाभामध्येच आज आपण 'मदहोश ' आहेत . परिस्थिती बदलली आहे .या बदलत्या परिस्थितीत आपल्याला नव्याने अधिकार मिळवावे लागतील किंवा जे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत ते सह्बूत ठेवण्यासाठी जागरूक राहावे लागेल .या संदर्भात समाजात काही चर्चा घडते आहे ,कृती होत आहे असे मला काही दिसत नाही .बाबासाहेबांनी जी चळवळ मोठ्या कष्टाने उभी केली ,तिच्या प्रारंभीच्या काळाचा अभ्यास होणे ,तिची चिकित्सा होणे मला गरजेचे वाटते . त्यामधून आज आपल्यापुढे जी नवी आव्हाने उभी आहेत ,ती पेलून ' चळवळ टिकविण्यासाठी उपयुक्त असे ज्ञान मिळेल .आजवर या सबंधातले संशोधात्मक लेखन कमीच झाले आहे .

चर्चेचे गांभीर्य .....


२००४ -२००५ या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे मला बघायला मिळाले ,जे मी अनुभवले ' त्यावरून आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही . ती जी काही चालेल .ती माझ्या पिढीपुरतीच . त्यातलेसुद्धा कमिटेड कार्यकर्ते असेपर्यंत , तेव्हढ्यापुरतीच राहील .पुढे ती चालली तर त्यामध्ये आंबेडकरी आणि स्वाभिमान विचार नसेल .विचारला माननारा कार्यकर्ता नसेल .जो काही कार्यकर्ता आढळेल त्याची चळवळीशी विचारांशी बांधिलकी किती राहील ,याबद्दल मला शंका आहे . त्याची बांधिलकी चळवळीशी नसेल तर चळवळ कशी आणि कुठे राहणार आहे ? हे मी लिहित असताना ,काही जणांना निवडणुकीच्या अपयशातून ,मी निराशावादी झालोय आणि म्हणून मी अशी भूमिका मांडतोय ,असे वाटण्याची शक्यता आहे . त्या सर्वाना मी सांगू इच्छितो कि ,माझ्यासारखा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत झोकून देतो ; तेंव्हा त्याला हि जाणीव असतेच कि , आपल्याला सहजासहजी सत्ता मिळणार नाही .सत्तेसंबधी त्याची भूमिका असते  कि ,सत्ता मिळाली तर ठीक . अन्यथा जे काही अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले व जी व्यवस्था निर्माण केली ,त्या अधिकारात वाढ कशी होईल ; त्याचबरोबर जी व्यवस्था निर्माण केली आहे ,ती सुद्रुढ कशी होईल , यासाठी धडपड करीत राहावे .त्यामुळे चळवळीसंबंधी जी काही चर्चा मी येथे करत आहे ; ती ती पूर्वग्रह न ठेवता गांभीर्याने लक्षात घेतली जावी अशी माझी अपेक्षा  आहे . आंबेडकरी चळवळीत काम करताना याची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे कि , आपले आर्थिक ,सामाजिक उद्धिष्ट आणि तत्वज्ञान हे असमानतेच्या विरोधात असल्यामुळे ,त्याला प्रस्थापितांकडून विरोध हा होणारच. त्या विरोधाची धार वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते . सत्ता मिळविणे हे प्रवाहाच्या विरोधात पोह्न्यासारखे कठीण असते .चळवळीची हि अवस्था का झाली ? त्याची करणे काय ? काय मिळविले  ? काय गमावले ? काय मिळवून टिकवू शकलो नाही ? याचेही थोडक्यात इथे विश्लेषण केले आहे .या विश्लेषणाची सुरुवात नामांतराच्या चळवळीपासून करीत आहे .

    नामांतर.......

 १९८० साली माझ्या राजकीय चळवळीला सुरुवात झाली .त्यावेळीची महाराष्ट्राची परीस्तीती वेगळी होती .१९७६ साली सुरु झालेली नामांतराची चळवळ क्षीण होण्याच्या मार्गावर होती . आंबेडकरी चळवळ पूर्णपणे 'नामांतर ' या एकच प्रश्नावर केंद्रित झालेली होती . नामांतराच्या लढ्यात लोकांनी एकजूटता दाखविली .हि ताकद खूप मोठी होती .त्यामध्ये चळवळीबरोबर नसणारे पण बाबासाहेबांना मानणारे हेही सहभागी झाले होते .
हि उभी राहिलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान कॉंग्रेसने आणि त्याचबरोबर कॉंग्रेसबरोबर समझोत्यात असलेल्या आर .पी .आय . च्या नेत्यांना हाताशी धरून केले .या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून प्रचंड दडपशाही करण्यात आली व पोलिसाकडून अमानुष अत्याचार करण्यात आले .आंबेडकरी चळवळ मुळासकट उपटून टाकण्याचा यावेळी प्रयत्न झाला . कॉंग्रेस आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांनी दलितांच्या घरांची राख रांगोळी केली आणि महिलांची बेअब्रू केली . शिक्षणामुळे ज्यांना नोकर्या लागल्या त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली होती आणि त्यांना जायकवाडी धरणामुळे समृद्धी आलेली होती अशांची हि समृद्धी या दंगलीमध्ये अक्षरशा : नष्ट करण्यात आली . दडपशाही व अत्याचार करून पुन्हा आंबेडकरी चळवळ आपल्या विरोधात उभी राहू नये असा डाव कॉंग्रेस ने रचला होता .कॉंग्रेस चे नेतृत्व हे मराठा समाजाचे नेतृत्व होते .' मराठवाडा विद्यापीठ' या नावात 'मराठा' समाज स्वतःची अस्मिता पाहत होता .नामांतर म्हणजे मराठ्यांना संपविणे व आपली सत्ता काढून घेणे ,असा प्रचार हित शत्रूंकडून त्या काळात करण्यात आला .त्याचे गांभीर्य लक्षात न घेता आंदोलन चालविले गेले .त्याचे पर्यवसान आंबेडकरी अस्मिता विरूद्ध मराठा अस्मिता असा लढा लढविण्यात झाले .परिणामी दंगल झाली .दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली ,जाळण्यात आली .बहिष्कार टाकण्यात आले .कत्तली करण्यात आल्या आणि दलितांना एकांगी पाडण्यात आल .

   त्यावेळी परिस्थिती बदलणे आणि शांतता प्रश्तापित करणे याला प्राधान्य देणे हे महत्वाचे होते आणि ते मी केले . मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडण मिटविणे ,सामंजस्य निर्माण करणे ,ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी लढणे आणी आक्रस्ताळी भाषणाची धार बोथट करणे यासारखी कामे अंगावर घेतली .या भूमिकेमुळे माझ्याबद्दल अनेक समज - गैरसमज पसरले .मी त्याची कधीही पर्वा केली नाही .या आंदोलनात काहींनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकामुळे (ज्या भूमिकांना मी बेजबाबदार म्हणतो ) ,नामांतराचा हा लढा सरकारविरोधी लढा होता .तो तसाच ठेवला गेला पाहिजे होता .त्याला पहिल्या टप्प्यात मराठविरोधी स्वरूप दिल्या गेल आणि नंतर ते पोलीस विरोधी झाल .आंदोलनकर्ते त्यामुळे कोंडीत सापडले .याचा फायदा मराठा नेतृत्वाने पुरेपूर उठविला ,पोलिसांचा अत्याचार ओढवून घेतला ,याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये एकप्रकारची दहशत बसली होती .या कारणास्तव मोर्चाला यायचे म्हणजे पोलिसांचा लाठीमार खायचा .अशी भीती लोकांमध्ये निर्माण झालेली होती .त्यामुळे नंतर नंतर लोक मोर्चाला यायचे थांबले . मनाने ते हरले होते .अत्यचार ,मारझोड ,दडपशाहीमुळे खचलेल्या सैन्यामध्ये नवीन विश्वास निर्माण करण्याची गरज होती .त्यासाठी लोकांमध्ये पुन्हा एकदा चळवळीबद्दल विश्वास निर्माण होईल असा कृतीशील कार्यक्रम देणे आवश्यक होते .आंबेडकर चळवळीत 'मोर्चा' व सभा हे सर्वात मोठे हत्यार राहिले आहे . ते मोडणे म्हणजे चळवळीला मोडणे होय असाच अर्थ त्याकाळी लोक लावत होते .दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास , चळवळ संपविण्याच्या मार्गावर घेऊन जाणे म्हणून आम्ही १९८२ साली आठ दिवसांचा long मार्च काढला .जस जसा हा 'मार्च ' पुढे जात राहिला तस तसा लोकात विश्वास वाढत गेला .ज्यावेळी मुंबई ला हा मोर्चा पोहोचला .त्यावेळी लाखोंच्या संख्येने ग्रामीण जनता त्यात सहभागी झाली होती .शहरी भागातील माणूस जो या मोर्चात होता तो वेगळाच होता . long मार्च ने उपस्थित केलेल्या प्रश्नावरती त्यावेळी विधानसभेत चर्चा झाली आणि तात्पुरती का होईना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली .यातून आपले प्रश्न मार्गी लागू शकतात हा नवा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला .
           त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासक व पोलीस खात्याला मोठी चिंता वाटत होती कि आंबेडकरी चळवळ चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात चळवळीतील कार्यकर्त्यावर जो अमानुष अत्याचार झाला त्याचा परिणाम म्हणून तो नक्षलवादी चळवळीकडे वळतो कि काय अशी चिंता एका वरच्या पातळीवर केली जात होती .हे त्यावेळी फार थोड्या जणांच्या लक्षात आल होत .आंबेडकरी चळवळीतील कार्यकरत्यावर व चळवळीतील जनतेवर जो अमानुष अत्यचार झाले त्याचा परिणाम म्हणून नक्षलवादाकडे वळतो कि काय हि परिस्थिती long मार्चच्या बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना वाटत होती .या भीतीला खतपाणी घालायचे त्यांनी ठरविले .
                                                   क्रमश :
                                                             - प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर


(साभार :-  " आंबेडकरी चळवळ संपली आहे ...." या पुस्तकातून )