भाग ३
बाबरी मशीद
याच दरम्यान ६
डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभे राहिले .ते म्हणजे बाबरी मशिदीच्या
निमित्ताने .बाबरी मजीदचे आंदोलन म्हणजे उच्चवर्णीयांच्या हिंदू संघटनेचा राजकीय
उठाव .या सवर्ण हिंदू संघटनानी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव
जागेचा प्रश्नही उपस्थित केला .राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर
हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या प्रश्नांवर कदाचित सोबत
राहणार नाही म्हणून त्यांनी घटनेलाच विरोध केला आणि घटना बदललीच पाहिजे अशी भूमिका
घेतली अशी भूमिका घेतली .घटना बदलामध्ये त्यांचे दोन महत्वाचे मुद्दे होते ,ते
म्हणजे संसदीय लोकशाही ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे आणि दुसरा राखीव जागा काढून
टाकणे .त्यांनी जो धोरणात्मक बदल केला तो राखीव जागा ऐवजी घटनाविरोधी भूमिका घेतली
.हि भूमिका घेण्यामागचा त्यांचा हेतू कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी हिंदू यांच्यात पडत
चाललेली दरी मिटवायची असेल तर आपण राखीव जागाविरोधी आहोत असे दर्शविता कामा नये
.या सर्व धार्मिक संघटनानी भाजपा आणि शिवसेनेला पुढे केले .खरे तर त्यांची दखल
घेण्याची गरज नव्हती .उच्चवर्णीय मंडळींनी यापूर्वी राखीव जागेच्या विरुद्ध गदारोळ
उभा केला होता .त्यांच्यातला जो धोरणात्मक बदल त्यांनी केला त्याचे कारण हे की राखीव
जागेच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली .ओबीसी आपल्याकडून निघून जातो आणि
घटनाविरोधी भूमिका आपण घेतली तर आंबेडकरी समूह जोरदार रीअक्शन देईल .त्यांच्या
रिअक्शन ने आपल फायदा होईल .त्यांना आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे
reacti रिअक्शन देण्यात फार तत्पर आणि उत्साही आहेत याची जाणीव होती .आंबेडकरवाद्यांनी
घटना घटना बदलाला रिअक्शन दिली कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी यांना एकत्र आणता येते हे
त्यांचे गणित होते .आंबेडकरी चळवळ एकजातीय स्वरुपाची असल्यामुळे ‘आपली घटना बदलत
आहेत ‘ ह्या आंबेडकरवाद्यांच्या विधानाचा अर्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोयीस्करपणे
‘हि त्यांची घटना ‘ असा केला आणि म्हणून ते चवताळलेत असा प्रचार केला .आणि म्हणून
लोकांची दिशाभूल केली .आपल्याला ‘आपली घटना बनवायची आहे ‘ असा प्रचार सुरु केला व
दुसरी घटना बनविण्यासाठी वातावरण तयार करायला सुरुवात केली .आंबेडकरी मंडळी आपण
काय भाषण देतो याचा सारासार विचार कधीच करीत नाहीत .त्यामुळे अनेकदा आपली भाषणे
अनेकदा विरोधकांच्या हातात आयते कोलीत देतात .याला भाबडेपण म्हणावे ,अज्ञान
म्हणावे कि हेतुपुरस्कर हे मला तरी समजत नाही .आंबेडकरवादी चळवळ हि अशाप्रकारे
प्रतिक्रियावादी पद्धतीने पुढे चालवत गेली तर जास्त काळ टिकणार नाही .परंतु राखीव
जागांचा मुद्दा हा घटनेचा अविभाज्य घटक आहे आणि तो संविधानाचा मुलभूत पाया आहे हे
लक्षात आल्यानंतर भाजपा व शिवसेनेने हेतुपुरस्कर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना
बदलाचा नारा दिला . भारिप ने यातून मार्ग काढण्यासाठी शेगाव ला १९९३ मध्ये बहुजन
महासंघाचे अधिवेशन घेतले .त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादीवरती ओबीसी
मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली
.उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसींना बरोबरीने आणि समानतेने वागवत नाहीत ,भेदभावाने
वागवितात .ओबीसींना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी मागणी केली होती
.ओबीसी हिंदुना स्वतःचे शत्रू मित्र कोण आहेत हे समजावे व त्यांची अस्मिता जागृत
व्हावी यासाठी हे आवश्यक होते .शेगावची मागणी व मंडल कमिशनचा स्वीकार यामुळे
बीजेपी –सेना हिंदूचे राजकीय संघटन उभे करीत होते त्याला खूप मोठा शह मिळाला
.त्यांनी राखीव जागा आंदोलनापेक्षा बाबरी आंदोलनाला अग्रक्रम दिला .
आंबेडकरी चळवळी ने
नव्याने आलेल्या आर्थिक धोरणाच्या विरोधात चळवळ उभारली असती आणि खाजगीकरणाच्या
विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असती तर ओबीसीनां हिंदू धार्मिक संघटनेने केलेला धोरणात्मक
बदल म्हणजे राखीव जागाविरोधी होण्याऐवजी घटनाविरोधी होण यातला फरक त्यांना
समजाविता आला असता आणि खाजगीकरण आणि बाबरी मशिद हे दोन्हीही राखीव जागाविरोधी आहेत
हे स्पष्ट झाले असते .यामुळे कदाचित त्यावेळची विधवंसकतेची तीव्रता कमी झाली असती
.आंबेडकरी चळवळीमध्ये दादासाहेब गायकवाड यांनी केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह हा अपवाद
आहे .यापुढे तरी आंबेडकरी चळवळ सामाजिक प्रश्नाबरोबर आर्थिक प्रश्नांना प्राधान्य
देणार असती तर नंतर झालेल्या विध्व्सांची तीव्रता कमी करता आली असती .आंबेडकरी
चळवळीच्या या वाटचालीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेला ‘भूमिहीनांचा
सत्याग्रह’ हा एकमेव अपवाद आहे .
बाबरीमुळे
उच्चवर्णीयांचा डाव सफल झाला .त्यामुळे त्यांनी राखीव जागेच्या प्रश्नावरून
समाजाचे लक्ष्य विचलित केले .असा परिणाम समाजात होऊ नये .उच्चवर्णीय हिंदू आणि
ओबीसी हे एकत्र झाले तर विस्कटलेली आंबेडकरी चळवळ पुन्हा एकजातीय होण्याचा धोका दिसत
होता म्हणून ओबीसीच्या चळवळीला पाठींबा देणे ,त्या उभारणे महत्वाचे होते .
व्ही .पी .सिंग
बोफोर्स प्रकरणाच्या
वादातून विश्वनाथ प्रताप सिंग हे कॉंग्रेस मधून बाहेर पडले होते .त्यांचा राजकीय
प्रवास जनता दल निर्माण करण्यापर्यंत झाला .या पक्षाबरोबर आम्ही राजकीय समझोता व
करारनामा करण्याचा निर्णय घेतला .या पक्षाबरोबर सत्तेत आलो तर पुढील प्रश्नावर
अंमलबजावणी होईल .
१ ) बौद्धांना सवलती
२ ) प्रशासनाकडून
सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेवरती होणारे अन्याय –अत्याचार व त्याचबरोबर राज्यांनी
एस .सी ,एस.टी .साठी केलेले प्रावधान याची कशापद्धतीने अंमलबजावणी हिते ,याची चौकशी
व्हावी .
३ )एस .सी .,एस .टी
. वित्तीय महामंडळानां दरवर्षी किमान दोनशे कोटींचे अनुदान मिळावे
४ ) डॉ .बाबासाहेब
आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे
५ ) मंडल आयोगाची
अंमलबजावणी व्हावी .
६ ) डॉ .बाबासाहेब
आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या सभागृहात लावणे .
१९९० साली सत्ता आली
आणि प्रश्नांची लगेच सोडवणूक झाली .राज्यव्यवस्था अनुकूल असेल तर प्रश्न लगेच सुटू
शकतात हे यातून सिध्द झाले . १९५६ ते१९९० या काळातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पत्रक
,पोस्टर्स ,मोर्चे ,आंदोलने यांच्याकडे आपण नजर टाकली तर सर्वात प्रथम “बौद्धांना सवलती दिल्याच पाहिजेत “ हि मागणी असायची .या मागणीनंतर इतर मागण्या
असायच्या .
क्रमश :
-
adv प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर


