Saturday, 11 April 2015


                                             !!! औद्योगिकरण आणि बहुजन समाज !!!

भारताने स्वतंत्र झाल्यापासून भारतीय संविधानानुसार जो औद्योगिक विकास केला तो संथगतीने का होईना पण आज २०१५ मध्ये औद्योगीकरणाच्या बाबतीत विकसित झाला आहे .याच कारण कि इंग्रजांची औद्योगिक धोरणे आणि त्यांच्या कार्यकाळात ज्या पायाभूत सुविधा अगोदरच तयार होत्या त्यामुळे रस्ते ,रेल्वे मार्ग सागरी मार्ग या मधून व्यापार आणि दळवळणास अधिक गती मिळाली त्याचा उपयोग स्वातंत्र्य काळात अधिक मिळाला ,त्याही पेक्षा भारतात व्यापार वाढीस खरी चालना कोणी दिली असेल तर सम्राट अशोकाने ,सम्राट अशोकाच्या काळात भारत एक संपन्न आणि जगातील महासत्ता होता .त्याकाळात कृषी क्षेत्र मुख्य असल तरी त्यावर आधारित उद्योगाला अशोकाच्या काळात चालना मिळाली .त्यात अनेक प्रकारचे कापड बनविले जाई आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविले जाई ,मासेमारी इ व्यवसायाबरोबर शिल्पकलेला जास्त महत्व होत त्याचा व्यापार विदेशातही चालत असे आणि चलन व नाणी याचं नियंत्रण त्यावेळी नियुक्त अमात्य (महामंत्री ) करत असे म्हणून अशोकाच्या काळात भारत "एक सोने कि चिडिया " असा देश होता . कालपरत्वे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाल्यामुळे विशिष्ट वर्ग आणि शासक यांच्या हातात अर्थव्यवस्था गेली तदननंतर डॉ .बाबासाहेबांनी अर्थव्यवस्थेला सामाजिक न्यायाच रूप देऊन घटनेत बद्ध केल .परंतु स्वातंत्र्यानंतर येणार्या सरकारने भांडवलशाही व्यवस्था हे रूप देऊन निवडक उद्योकाकडे याची मक्तेदारी दिल्याने विशिष्ठ वर्गाचाच विकास साध्य झाला परंतु तळांगळातील शोषित पिडीत बहुजन समाज एक तर सरकारी यंत्रणेचा नोकरदार बनवून राहिला आणि खाजगी क्षेत्रात कामगार म्हणून खाजगी उद्योग क्षेत्रात त्याने जुळवून घेतले याचा असा परिणाम झाला कि बहुजन समाज खास करून sc st obc हा वर्ग उद्योगाचा भाग झाला परंतु कामगार नोकरदार म्हणून !
डॉ .बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना सामाजिक अभिसरण लक्षात घेऊन लिहिली "शिका संघटीत व्हा संघर्ष करा " या मूलमंत्रासोबतच सामाजिक क्रांतीशिवाय राजकीयक्रांतीला महत्व दिले.काहींनी शासनकर्ती जमात बनण्याचा अर्थ राजकीय क्रांतीशी लावून आर्थिक ,सामाजिक क्रांतीकडे पाठ फिरविली .त्याचा असा परिणाम झाला कि जी अर्थव्यवस्था मागासवर्गीय तळांगळातील लोकांच्या हाती असायला हवी होती तो वर्ग नोकरी कामात व्यस्त झाला आणि ३ % वर्गाच्या हाती उत्पादन आणि औद्योजकता गेल्यामुळे भारताची उत्पादन क्षमता केवळ ६ % राहिली तर त्याच लोकसंखेच्या थोड्याफार पुढे असलेला चीन हा देश उत्पादन वाढीत ७६ % वर पोहोचला हा फरक विकसित चीन मध्ये आणि विकसनशील भारतामध्ये राहिला .
आज बहुजन SC ST OBC जर उद्योजकतेकडे वळून औद्योगीकरणाचा भाग झाल्यास नक्कीच अर्थव्यवस्थेत बदल होईल ,देशाचा आणि समाजाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल . उद्योग व्यवसाय कडे वळताना मुख्य भांडवल हि अडचण येणे हा पहिला प्रश्न सर्वासमोर निर्माण होतो पंरतु सरकारच्या योजना काही काही वित्त सहाय्य मंडळे यांचा विचार केल्यास ,कमी भांडवलातून आणि संघटीतरित्या ५ ते १०० लोकसमूह बनवून उद्योग व्यवसाय निर्मिती होऊ शकते आणि ते सोयीस्कर राहते .उद्योग व्यवसायाचे मुख्य दोन भाग पडतात . १ ) Manufacturing (निर्मिती )
२ ) Service (सेवा )
निर्मितीचे परत १ ) Micro (सूक्ष्म ) ज्यात कमीत कमी २५ लाखाहून उलाढाल
२ ) small (लघु ) ज्यात ५ लाख ते ५ कोटी पर्यंत उलाढाल
३ ) Medium (मध्यम )
ज्यात ५ कोटी ते १० कोटीच्या वर उलाढाल होते असे उद्योग
सेवा क्षेत्रात सारख्याच प्रकारच्या उद्योगांची विभागणी होते .सर्वात महत्वाच नियोजन कुठला उद्योग व्यवसाय ,आवड ,कला ,कुवत आर्थिक इ बाबींचा विचार केला जातो .सबंधित उद्योगांच कागदोपत्री नियोजन त्यासबंधी लागणारी कागदपत्रे परवाने करारपत्रे इत्यादी बाबींचा विचार करणे गरचेजे असते .तसेच सुरु करण्यात येण्यार्या उद्योगाची चाचपणी मार्केट रिसर्च उत्पादनाची किंमत नफा तोटा याचा पायभूत विचार करणे गरजेचे आहे .
आपल्या व्यवसायाच्या आखणीनुसार वित्त सहाय्य करणाऱ्या संस्था मंडळ यांच्याकडे उद्योगाच्या लागणाऱ्या भांडवल व प्रोजेक्ट रिपोर्ट योग्य रीतीने सादर करणे आवश्यक आहे . काही महिला उद्योजकासाठी सिडबी ,सिडो (small industries development organization), SEWA (Self employer women association ) तसेच नाबार्ड ,इतर बँका वित्तीय संस्था उद्योगासाठी वित्त पुरवठा करतात .अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून उद्योजक व्यवसायाकडे वळून नोकरी घेणार्या पेक्षा नोकरी देणारे होणे केंव्हाही चांगले . तसेच बहुजन समाजातील बेरोजगार शिक्षित तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळवून आर्थिक विकास साधण्यासाठी adv .प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील "गाव तेथे उद्योग" या पूर्तीसाठी भारिप बहुजन महासंघ अगोदरच २० उद्योगांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे .बहुसंख्य तरुण वर्ग या कडे वळला पाहिजे यासाठी हा प्रयत्न .
- प्रवीण जाधव 
प्रकल्प समन्वयक ,
भारिप उद्योजक विभाग

(पुढील भागात कृषी क्षेत्रास पूरक उद्योग आणि त्यांची माहिती )

!!! जात निर्मूलनाचा लढा बुद्धाकडे नेणारा !!!
२०१३ रोजी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." आणि "राजकीय आरक्षण रद्द कराव " हि भूमिका मांडली . रिपाइं नेते रामदास आठवले यांनी ही भूमिका 'दलित विरोधी' ठरवली होती , तर जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ) यांनी तिला 'भारतीय संविधानाला छेद देणारी' ठरवून प्रकाश आंबेडकरांवर राखीव जागा संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता . खासदार रामविलास पासवान यांनी ती 'पूर्णत: चुकीची' ठरवतानाच 'जोपर्यंत जातिव्यवस्था व जातीयवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत दलित आदिवासींना राजकीय आरक्षणाची गरज आहे,' असे म्हटले होते .
" Annihilation of Caste " डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी जात निर्मुलनाबद्दल अत्यंत मौल्यवान विचार मांडले . जात नष्ट होणे म्हणजेच बुद्ध तत्वज्ञान स्वीकारणेच होय . वैदिक धर्माने निर्माण केलेली जातीयव्यवस्था हि विषमतावादी आणि मानवताविरोधी होती त्यात मानवांचे जातीनिहाय भाग पाडून वर्णव्यवस्था निर्माण करून भेदाभेद करून मानवाला पशुसमान वागणूक देऊन विशिष्ट वर्गाच्या हाती सत्ता संपत्ती चे अधिकार दिले .त्या विरुद्ध पहिला बंड तथागत भगवान बुद्धांनी केला ,जात पात यांना बौद्ध धर्मात थारा नाही हे सांगितलं . अनेक नद्या महासागराला जाऊन मिळतात तसाच जात पंथ नष्ट होऊन एकच धम्म तयार होतो तो मानवतावादी बौद्ध धम्म होय . जात निर्मूलनाचे विचार तथागत ,बाबासाहेबांनी मांडले त्याच विचारांना सामाजिक समतेचे रूप यावे म्हणून तीच भूमिका मा .बाळासाहेब आंबेडकर पुढे नेत असतील ,जात पात नष्ट होऊन धर्म आणि राष्ट्रीयत्व कायम होणार असेल तर आपण जातीत आणि राजकीय लाभासाठी बुद्ध बाबासाहेब यांच्या विचारांनाच विरोध करत आहोत ?
डॉ .बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली परंतु शासन दरबारी "महार " म्हणून नोंद होती .त्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे अनेक पुढारी बी .सी .कांबळे ,दादासाहेब गायकवाड अनेकांनी आंदोलने उपोषणे केली परंतु सरकारकडून निराशा मिळाली ,सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी चर्चा करून पण बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न महार म्हणूनच अडकून पडला परंतु १९८९ साली तत्कालीन व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न मांडून तो राजकीय समझोत्याने सोडवून घेतला जे बाबासाहेबांच राहिलेलं स्वप्न बौद्धांचा समावेश मंडल आयोगानुसार अनुसूचित जातीत करून बौद्धांना सवलती मिळवून दिल्या ,तरीही आजही आपण जातीत अडकून बौद्ध धम्माला जे जात निर्मुलन पूरक होत ते करण्यात आपण अनुयायी म्हणून अपयशी आहोत .
प्रकाश आंबेडकरानी इतर वर्गाला सोबत घेऊन पुणे पासून कोल्हापूर औरंगाबाद लातूर इ .ठिकाणी जातीअंताची चळवळ उभी करण्यासाठी जातीअंत परिषदांना सुरुवात केलेली आहे त्यात फुले शाहू आंबेडकरी म्हणवणारे पक्ष संघटना अनुयायी म्हणून आपण कुठे आहोत ? जात निर्मुलनासाठी बाबासाहेबांनीच प्रयत्न केला आणि त्यांच्याच नातवानेच सर्वकाही कराव त्यांनीच " अवतारवादाची " भूमिका घेऊन " अत्त दिप भव " न होता " यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारत " हा वैदिक तत्वानेच आपण आंबेडकर अनुयायी जात आहोत . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एक प्रावधान केल होत कि राजकीय आरक्षण हे केवळ १० वर्षासाठी देण्यात याव परंतु आरक्षण (अराजकीय नव्हे )
या गोष्टीचा राजकारणासाठी उहापोह करण्यात आला आणि स्वतः ला आंबेडकरवादी म्हणवणारे नेते पुढारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आरक्षण संपाव या भूमिकेला स्वतःच्या राजकीय भुकेपायी विरोध केला . डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि जे राखीव जागेवरून निवडून जाणारे प्रतिनिधी मागासवर्गीयांच्या हक्काबाबत चूप राहत असतील तर हे राजकीय आरक्षण काय कामाचे आणि ते नको आहे ,संदर्भ -डॉ .बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ . हिच भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली तर त्या भूमिकेत बाबासाहेबच आहेत .
आज ज्या जातीअंत परिषदेने विविध ठिकाणी परिषदा बाळासाहेब आंबेडकर घेत आहे त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा ह्या चूप आहेत . प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केलेला जातीअंताचा लढा निष्प्रभ करण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था टिकवून ठेवणे अगत्याचे आहे ,म्हणून या जातीअंताचा लढ्याचा धसका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी " एक गाव एक विहीर एक स्मशान " हि केविलवाणी भूमिका मांडली परंतु फुले शाहू आंबेडकर म्हणवणारे आपण जोवर जातीअंतासाठी पुढे होणार नाही तोवर जातीव्यवस्था मजबूतच होईल .जिथे जातीअंत होणार तिथे फक्त धम्म असणार म्हणजेच जाती अंतचा अंतिम मार्ग बौद्ध धम्माकडेच नेणारा आहे .
                                                                                        
                                                                                              - प्रविण जाधव