!!! जात निर्मूलनाचा लढा बुद्धाकडे नेणारा !!!
२०१३ रोजी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." आणि "राजकीय आरक्षण रद्द कराव " हि भूमिका मांडली . रिपाइं नेते रामदास आठवले यांनी ही भूमिका 'दलित विरोधी' ठरवली होती , तर जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ) यांनी तिला 'भारतीय संविधानाला छेद देणारी' ठरवून प्रकाश आंबेडकरांवर राखीव जागा संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता . खासदार रामविलास पासवान यांनी ती 'पूर्णत: चुकीची' ठरवतानाच 'जोपर्यंत जातिव्यवस्था व जातीयवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत दलित आदिवासींना राजकीय आरक्षणाची गरज आहे,' असे म्हटले होते .
" Annihilation of Caste " डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी जात निर्मुलनाबद्दल अत्यंत मौल्यवान विचार मांडले . जात नष्ट होणे म्हणजेच बुद्ध तत्वज्ञान स्वीकारणेच होय . वैदिक धर्माने निर्माण केलेली जातीयव्यवस्था हि विषमतावादी आणि मानवताविरोधी होती त्यात मानवांचे जातीनिहाय भाग पाडून वर्णव्यवस्था निर्माण करून भेदाभेद करून मानवाला पशुसमान वागणूक देऊन विशिष्ट वर्गाच्या हाती सत्ता संपत्ती चे अधिकार दिले .त्या विरुद्ध पहिला बंड तथागत भगवान बुद्धांनी केला ,जात पात यांना बौद्ध धर्मात थारा नाही हे सांगितलं . अनेक नद्या महासागराला जाऊन मिळतात तसाच जात पंथ नष्ट होऊन एकच धम्म तयार होतो तो मानवतावादी बौद्ध धम्म होय . जात निर्मूलनाचे विचार तथागत ,बाबासाहेबांनी मांडले त्याच विचारांना सामाजिक समतेचे रूप यावे म्हणून तीच भूमिका मा .बाळासाहेब आंबेडकर पुढे नेत असतील ,जात पात नष्ट होऊन धर्म आणि राष्ट्रीयत्व कायम होणार असेल तर आपण जातीत आणि राजकीय लाभासाठी बुद्ध बाबासाहेब यांच्या विचारांनाच विरोध करत आहोत ?
डॉ .बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली परंतु शासन दरबारी "महार " म्हणून नोंद होती .त्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे अनेक पुढारी बी .सी .कांबळे ,दादासाहेब गायकवाड अनेकांनी आंदोलने उपोषणे केली परंतु सरकारकडून निराशा मिळाली ,सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी चर्चा करून पण बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न महार म्हणूनच अडकून पडला परंतु १९८९ साली तत्कालीन व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न मांडून तो राजकीय समझोत्याने सोडवून घेतला जे बाबासाहेबांच राहिलेलं स्वप्न बौद्धांचा समावेश मंडल आयोगानुसार अनुसूचित जातीत करून बौद्धांना सवलती मिळवून दिल्या ,तरीही आजही आपण जातीत अडकून बौद्ध धम्माला जे जात निर्मुलन पूरक होत ते करण्यात आपण अनुयायी म्हणून अपयशी आहोत .
प्रकाश आंबेडकरानी इतर वर्गाला सोबत घेऊन पुणे पासून कोल्हापूर औरंगाबाद लातूर इ .ठिकाणी जातीअंताची चळवळ उभी करण्यासाठी जातीअंत परिषदांना सुरुवात केलेली आहे त्यात फुले शाहू आंबेडकरी म्हणवणारे पक्ष संघटना अनुयायी म्हणून आपण कुठे आहोत ? जात निर्मुलनासाठी बाबासाहेबांनीच प्रयत्न केला आणि त्यांच्याच नातवानेच सर्वकाही कराव त्यांनीच " अवतारवादाची " भूमिका घेऊन " अत्त दिप भव " न होता " यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारत " हा वैदिक तत्वानेच आपण आंबेडकर अनुयायी जात आहोत . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एक प्रावधान केल होत कि राजकीय आरक्षण हे केवळ १० वर्षासाठी देण्यात याव परंतु आरक्षण (अराजकीय नव्हे )
या गोष्टीचा राजकारणासाठी उहापोह करण्यात आला आणि स्वतः ला आंबेडकरवादी म्हणवणारे नेते पुढारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आरक्षण संपाव या भूमिकेला स्वतःच्या राजकीय भुकेपायी विरोध केला . डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि जे राखीव जागेवरून निवडून जाणारे प्रतिनिधी मागासवर्गीयांच्या हक्काबाबत चूप राहत असतील तर हे राजकीय आरक्षण काय कामाचे आणि ते नको आहे ,संदर्भ -डॉ .बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ . हिच भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली तर त्या भूमिकेत बाबासाहेबच आहेत .
या गोष्टीचा राजकारणासाठी उहापोह करण्यात आला आणि स्वतः ला आंबेडकरवादी म्हणवणारे नेते पुढारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आरक्षण संपाव या भूमिकेला स्वतःच्या राजकीय भुकेपायी विरोध केला . डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि जे राखीव जागेवरून निवडून जाणारे प्रतिनिधी मागासवर्गीयांच्या हक्काबाबत चूप राहत असतील तर हे राजकीय आरक्षण काय कामाचे आणि ते नको आहे ,संदर्भ -डॉ .बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ . हिच भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली तर त्या भूमिकेत बाबासाहेबच आहेत .
आज ज्या जातीअंत परिषदेने विविध ठिकाणी परिषदा बाळासाहेब आंबेडकर घेत आहे त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा ह्या चूप आहेत . प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केलेला जातीअंताचा लढा निष्प्रभ करण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था टिकवून ठेवणे अगत्याचे आहे ,म्हणून या जातीअंताचा लढ्याचा धसका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी " एक गाव एक विहीर एक स्मशान " हि केविलवाणी भूमिका मांडली परंतु फुले शाहू आंबेडकर म्हणवणारे आपण जोवर जातीअंतासाठी पुढे होणार नाही तोवर जातीव्यवस्था मजबूतच होईल .जिथे जातीअंत होणार तिथे फक्त धम्म असणार म्हणजेच जाती अंतचा अंतिम मार्ग बौद्ध धम्माकडेच नेणारा आहे .
- प्रविण जाधव

No comments:
Post a Comment