Saturday, 11 April 2015


                                             !!! औद्योगिकरण आणि बहुजन समाज !!!

भारताने स्वतंत्र झाल्यापासून भारतीय संविधानानुसार जो औद्योगिक विकास केला तो संथगतीने का होईना पण आज २०१५ मध्ये औद्योगीकरणाच्या बाबतीत विकसित झाला आहे .याच कारण कि इंग्रजांची औद्योगिक धोरणे आणि त्यांच्या कार्यकाळात ज्या पायाभूत सुविधा अगोदरच तयार होत्या त्यामुळे रस्ते ,रेल्वे मार्ग सागरी मार्ग या मधून व्यापार आणि दळवळणास अधिक गती मिळाली त्याचा उपयोग स्वातंत्र्य काळात अधिक मिळाला ,त्याही पेक्षा भारतात व्यापार वाढीस खरी चालना कोणी दिली असेल तर सम्राट अशोकाने ,सम्राट अशोकाच्या काळात भारत एक संपन्न आणि जगातील महासत्ता होता .त्याकाळात कृषी क्षेत्र मुख्य असल तरी त्यावर आधारित उद्योगाला अशोकाच्या काळात चालना मिळाली .त्यात अनेक प्रकारचे कापड बनविले जाई आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविले जाई ,मासेमारी इ व्यवसायाबरोबर शिल्पकलेला जास्त महत्व होत त्याचा व्यापार विदेशातही चालत असे आणि चलन व नाणी याचं नियंत्रण त्यावेळी नियुक्त अमात्य (महामंत्री ) करत असे म्हणून अशोकाच्या काळात भारत "एक सोने कि चिडिया " असा देश होता . कालपरत्वे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाल्यामुळे विशिष्ट वर्ग आणि शासक यांच्या हातात अर्थव्यवस्था गेली तदननंतर डॉ .बाबासाहेबांनी अर्थव्यवस्थेला सामाजिक न्यायाच रूप देऊन घटनेत बद्ध केल .परंतु स्वातंत्र्यानंतर येणार्या सरकारने भांडवलशाही व्यवस्था हे रूप देऊन निवडक उद्योकाकडे याची मक्तेदारी दिल्याने विशिष्ठ वर्गाचाच विकास साध्य झाला परंतु तळांगळातील शोषित पिडीत बहुजन समाज एक तर सरकारी यंत्रणेचा नोकरदार बनवून राहिला आणि खाजगी क्षेत्रात कामगार म्हणून खाजगी उद्योग क्षेत्रात त्याने जुळवून घेतले याचा असा परिणाम झाला कि बहुजन समाज खास करून sc st obc हा वर्ग उद्योगाचा भाग झाला परंतु कामगार नोकरदार म्हणून !
डॉ .बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना सामाजिक अभिसरण लक्षात घेऊन लिहिली "शिका संघटीत व्हा संघर्ष करा " या मूलमंत्रासोबतच सामाजिक क्रांतीशिवाय राजकीयक्रांतीला महत्व दिले.काहींनी शासनकर्ती जमात बनण्याचा अर्थ राजकीय क्रांतीशी लावून आर्थिक ,सामाजिक क्रांतीकडे पाठ फिरविली .त्याचा असा परिणाम झाला कि जी अर्थव्यवस्था मागासवर्गीय तळांगळातील लोकांच्या हाती असायला हवी होती तो वर्ग नोकरी कामात व्यस्त झाला आणि ३ % वर्गाच्या हाती उत्पादन आणि औद्योजकता गेल्यामुळे भारताची उत्पादन क्षमता केवळ ६ % राहिली तर त्याच लोकसंखेच्या थोड्याफार पुढे असलेला चीन हा देश उत्पादन वाढीत ७६ % वर पोहोचला हा फरक विकसित चीन मध्ये आणि विकसनशील भारतामध्ये राहिला .
आज बहुजन SC ST OBC जर उद्योजकतेकडे वळून औद्योगीकरणाचा भाग झाल्यास नक्कीच अर्थव्यवस्थेत बदल होईल ,देशाचा आणि समाजाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल . उद्योग व्यवसाय कडे वळताना मुख्य भांडवल हि अडचण येणे हा पहिला प्रश्न सर्वासमोर निर्माण होतो पंरतु सरकारच्या योजना काही काही वित्त सहाय्य मंडळे यांचा विचार केल्यास ,कमी भांडवलातून आणि संघटीतरित्या ५ ते १०० लोकसमूह बनवून उद्योग व्यवसाय निर्मिती होऊ शकते आणि ते सोयीस्कर राहते .उद्योग व्यवसायाचे मुख्य दोन भाग पडतात . १ ) Manufacturing (निर्मिती )
२ ) Service (सेवा )
निर्मितीचे परत १ ) Micro (सूक्ष्म ) ज्यात कमीत कमी २५ लाखाहून उलाढाल
२ ) small (लघु ) ज्यात ५ लाख ते ५ कोटी पर्यंत उलाढाल
३ ) Medium (मध्यम )
ज्यात ५ कोटी ते १० कोटीच्या वर उलाढाल होते असे उद्योग
सेवा क्षेत्रात सारख्याच प्रकारच्या उद्योगांची विभागणी होते .सर्वात महत्वाच नियोजन कुठला उद्योग व्यवसाय ,आवड ,कला ,कुवत आर्थिक इ बाबींचा विचार केला जातो .सबंधित उद्योगांच कागदोपत्री नियोजन त्यासबंधी लागणारी कागदपत्रे परवाने करारपत्रे इत्यादी बाबींचा विचार करणे गरचेजे असते .तसेच सुरु करण्यात येण्यार्या उद्योगाची चाचपणी मार्केट रिसर्च उत्पादनाची किंमत नफा तोटा याचा पायभूत विचार करणे गरजेचे आहे .
आपल्या व्यवसायाच्या आखणीनुसार वित्त सहाय्य करणाऱ्या संस्था मंडळ यांच्याकडे उद्योगाच्या लागणाऱ्या भांडवल व प्रोजेक्ट रिपोर्ट योग्य रीतीने सादर करणे आवश्यक आहे . काही महिला उद्योजकासाठी सिडबी ,सिडो (small industries development organization), SEWA (Self employer women association ) तसेच नाबार्ड ,इतर बँका वित्तीय संस्था उद्योगासाठी वित्त पुरवठा करतात .अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून उद्योजक व्यवसायाकडे वळून नोकरी घेणार्या पेक्षा नोकरी देणारे होणे केंव्हाही चांगले . तसेच बहुजन समाजातील बेरोजगार शिक्षित तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळवून आर्थिक विकास साधण्यासाठी adv .प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील "गाव तेथे उद्योग" या पूर्तीसाठी भारिप बहुजन महासंघ अगोदरच २० उद्योगांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे .बहुसंख्य तरुण वर्ग या कडे वळला पाहिजे यासाठी हा प्रयत्न .
- प्रवीण जाधव 
प्रकल्प समन्वयक ,
भारिप उद्योजक विभाग

(पुढील भागात कृषी क्षेत्रास पूरक उद्योग आणि त्यांची माहिती )

No comments:

Post a Comment