Monday, 9 September 2013

प्रकाश आंबेडकर - 1

नायक कसा असावा ? नायक असा असतो कि स्वताचा स्वार्थ न बघता समाजाची सेवा करणे ,स्वाभिमानी बाणा दाखवून समाजाच्या उन्नतीसाठी जगणे तोच खरा समाजाचा नायक अर्थातच नेता होऊ शकतो समाज म्हणजे विशिष्ट जातीचा किवा धर्माचा समूह नव्हे तर अखिल मानव जातीचा समूह होय.

अशाच एका नायकाचा वेध आपण घेणार आहोत , हा वेध घेताना कोणी याला राजकीय प्रमोशन मानेल किंवा काही पण नायक नेत्याचे त्याहीपेक्षा एका समाजकारन्याचे गुणविशेष आणि कौतुक झाले पाहिजे आणि जनतेला आपला नेता निवडायला पर्याय दयायला हवा . याचा असा अर्थ नव्हे कि इतर कोणी नेता वाईट आहे किवा नेतृत्व करू शकत नाही तरीही जनतेने बहुआयामी नेतृत्व स्वीकारून आपल्या राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक इ . वाटचालीस गतिमान कराव .

असाच एक नेता म्हणजे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून असली तरी स्वताची वेगळी ओळख राजकीय ,सामाजिक आणि धम्मकार्यात केलेली आहे . बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचेच काम प्रकाश आंबेडकर करत आहेत अस वाटत ,सामाजिक बदल झाल्याशिवाय राजकीय बदलाला काही अर्थ उरत नाही ,जातीअंताची लढाई बाळासाहेबांनी सुरु केलेली केलेली आहे त्याचा संदर्भ म्हणजेच बाबासाहेबांनी मांडलेले अमुल्य विचार Inhalation Of Caste या ग्रंथात आढळतात . बाळासाहेब आंबेडकरांनी कधी तडजोडीच्या राजकारणाला महत्व दिल नाही समाजहिताच्या गोष्टीपुढे सत्तेला नाकारणारे बाळासाहेब रक्ताचेच नाही तर खऱ्या आंबेडकरी विचारांचे वारसदार ठरतात म्हणून आम्हास ते इतराहून स्वाभिमानी आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व वाटतात याचा प्रत्यय व्ही . पी . सिंह यांच्या सरकारच्या वेळेला आला , निवडणूक पूर्व जनता दलाशी राजकीय समझोता करून सरकार सत्तेत आल्यावर मंत्रीपदाची व्ही . पी . सिंह यांची ऑफर न स्वीकारता आंबेडकरी समाजहिताच्या महत्वपूर्ण गोष्टी व्ही . पी . सिंहाकडून करवून घेतात त्यात १९५६ पासून अपूर्ण राहिलेली बाब ज्याचा अपमान बाबासाहेबांच्या मुलाला आणि प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांना मोरारजी देसाई पंतप्रधान असताना सहन करावा लागला सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोरारजीना भेटावयास गेले असता नवबौद्ध ,बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत करावा त्यावर चोरांचे मोर असलेले मोरारजी म्हणतात कि कोण सांगितले होते महारांना बौद्ध होण्याचे , त्यावर भैय्यासाहेब म्हणतात आमच्या बापाने आणि तेथून निघून जातात ,हीच मनातील सल आणि अखिल भारतातील बौद्ध जनतेच्या सुवर्ण अक्षरात लिहावा असा हा क्षण बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत व्ही. पी .सिंग यांना करायला भाग पाडतात हेच उत्तर आहे जे आरक्षणाचा लाभ घेतात आणि वर तोंड करून विचारतात प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी काय केल ? संसदेमध्ये बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर संसदेमध्ये तैलचित्र , भारतरत्न किताब हे बाळासाहेबांच्या मुस्तद्देगिरिचे फलित आहे

क्रमश:

No comments:

Post a Comment