आपल्या भोंदुगिरी आणि फसवेगिरी साठी प्रसिद्ध असलेला आसाराम नावाचा भोंदू जो कित्येक प्रकरणामध्ये आरोपी आहे . कुठे जमिन प्रकरणी फसवेगिरी करतो ,तर कुठे कोणा शिष्याला माहित असलेल्या कुकर्माबद्दल खून करतो ,कुठे लहान मुलांचे लैंगिक शोषण करतो तर कुठे काय काय ,पण कालपरवा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार त्याने केला तशी रीतसर त्या मुलीने तक्रार पण केलेली आहे . बलात्कार हा शब्द उच्चारताना आम्हाला लाज वाटते पण आसाराम बापू नावाचा भोंदू सराईतपणे बलात्कार करतो आणि सरकार मात्र अशा बापू भोंदू ना अभय देते . इथवरच तो आसाराम थांबला नाही तर काल चक्क त्याने स्वताची तुलना तथागत गौतम बुद्धाशी केली . तथागत हे विश्वासमान आहेत आणि आसाराम हा धुलीकणासमान . काय तर म्हणे बुद्धालाही असेच प्रसंग सहन करावे लागले होते . कुठे तथागत गौतम बुद्ध आणि कुठे हा नराधम आसाराम भोंदू ! उच्चवर्गातील काही मूर्ख लोक आपला पैसा कसा खर्च व्हावा आणि आपल्या काळ्या पैशातून कसा नंगानाच करता येईल आणि नाचगाणे करून स्वताचे मनोरंजन करून असल्या भोंदुना पाठीशी घालत आहे ,असा वर्गही तितकाच असल्या अनैतिक कृत्यासाठी जबाबदार आहे . तासानतास त्याचे प्रवचन ऐकत बसलेले लोक आणि असले भोंदू महाराज ,बापू दिन दुबळ्या लोकासाठी यांची नाळ तुटलेली दिसते . असे हे लोक खरोखरच इथल्या मूळ लोकांचे दुश्मन आहेत अस मी मानतो .
तथागत गौतम बुद्धावर असले आरोप करणारे त्या काळातले आसाराम सारखेच मनुवादी ब्राह्मण लोक होते ,बुद्धाची कीर्ती सर्वदूर पसरली होती . बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाने आणि पंचशिलेने लोक मार्गक्रमण करीत होते . ब्राह्मणवादाचे जोखड झुगारून लोक धम्मात शामिल होत होते त्यामुळे ब्राह्मणाच्या मनात बुद्धाविषयी घृणा निर्माण झालेली होती . कोणी लोक ब्राह्मणाला विचारत नव्हते सर्वत्र त्यांच्यावर थु थु होत होती . अशातच बुद्धाला बदनाम करण्यासाठी काही ब्राह्मणांनी एक डाव रचला . चिंचा नावाची देखणी ,सुंदर ब्राह्मणी तिला समोर करून तथागताला बदनाम करण्याचा डाव रचण्यात आला . तेव्हा तथागत श्रावस्ती मधील जेतवनात वास्तव्याला होते . जेव्हा लोक सायंकाळी तथागताचे दर्शन घेऊन आणि प्रवर्चन ऐकून परत येत तेव्हा हि चिंचा नावाची ब्राह्मणी हातामध्ये फुलांच्या माळा घेऊन जेतवनाकडे जात असे कोणी तिला विचारले तर उल ट उत्तर देत असे आणि म्हणत असे तुम्हाला काय करायचं ? परत रात्र जेतवनाच्या शेजारी असणाऱ्या तीर्थिकाराम वनात काढून परत सकाळी शहरात परतते तेव्हा लोक तिला विचारत कि रात्र कोठे घालवलीस तर त्यावर लोकांना उलट उत्तर देऊन म्हणायची तुम्हाला काय करायचे ? मी रात्र जेतवनात श्रमण गौतामासोबत घालवली त्यावर काही लोक विश्वास करायचे . हा प्रकार रोज चालायचा , असे ३ महिने उलटले तथागताची बदनामी व्हावी म्हणून तिने कपड्यांच्या चिंध्या पोटाला बांधून हा प्रकार असाच सुरु ठेवला आणि लोकांना वाटू लागले कि तिला ३ महिन्यांचा गर्भ राहिला . परत ९ व्या महिन्यात चिंचाने लाकडाचा ओंडका आणि त्यावर कापड पोटाला बांधले . विषारी किड्या मुंग्या ना स्वताच्या हाता पायाला चावून घेऊन सूज निर्माण केली .
अशावेळी तथागत लोकांना उपदेश करत असताना चिंचा तिथे जाऊन तथागतास म्हणाली ," हे श्रमण गौतमा ,तुम्हाला माझ्या पोटात वाढणाऱ्या गर्भाची काही काळजी नाही ,तुमची जबाबदारी आहे कि आपल्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या संगोपनाची आपण व्यवस्था करावी किवा आपल्या शिष्याला तशी सूचना करावी . यावर प्रवचन करणारे तथागत मध्येच गंभीर होऊन तिच्याकडे शांतपणे बघत राहिले . उपस्थित लोकांचा समुदाय स्तब्ध होऊन बघत होता . यावर तथागत गौतम बुद्ध म्हणाले , " हे भगिनी चिंचा , जे काही झाल हे माझ्या आणि तुझ्या मनाला चांगल्या प्रकारे माहित आहे. यावर चिंचा ब्राह्मणी म्हणाली ," हो हो माहित आहे माझ्या गर्भावस्थेला तुम्हीच कारणीभूत आहात आणि ती जोर जोरात खोकलू लागली . खोकल्यामुळे पोटाला बांधलेली लाकडी फळी पोटातून गळून पायावर पडली . त्यामुळे तिचा खोटेपणा लोकांच्या लक्षात आला . लोकांनी तिला काठीने मारून तेथून पिटाळून लावले . अशा प्रकारे बुद्धाला बदनामीचे अशाप्रकारचे अनेक षडयंत्रे तथागताच्या तेजाने गळून पडाली .
आसाराम सारखे असे भोंदू स्वतःची तुलना बुद्धाशी करून स्वताची नालायकी सिद्ध करत आहेत . ज्या तथागताचा धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिलाय आणि बौद्ध धम्माची मुलतत्वे भारतीय संविधानात समाविष्ट करून अखिल भारत तत्वाने बौद्धमयच केलेला आहे . मुळात मनुवाद्याना हे संविधान नको आहे त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे त्यामुळे या देशात असली कृत्ये केली जात आहे . परंतु मुठभर असणाऱ्या ह्या मनुवाद्याना हे माहित नाही कि बहुजन समाज आता जागृत होत आहे आणि असल्या आसरामासाठी तुरंग वाट पाहात आहे आपल्या दुष्कृत्याच्या शिक्षेसाठी !!!
!!! जयभिम ………………. नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक
No comments:
Post a Comment