Monday, 9 September 2013

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – २ !!!



मागील भागात थोडक्यात काही गोष्टी आपण बघितल्यात आता आणखी थोडा आढावा घेवूयात , बुध्दविहारे ,स्तूप ,मुर्त्या ,दर्शनीय स्थळे यांचेही विकृतीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे . ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी विहार स्थापित केले . ब्राह्मणांनी बौद्ध धम्माचा लोप केल्यानंतर या विहाराचे विकृतीकरण केले . अनेक बुद्ध मुर्त्यांचा नाश करून त्या विद्रूप केल्या कुठे शंकराच्या मुर्त्यामध्ये त्याचे रुपांतर केले . या ठिकाणी महाबोधी विहाराची प्रदक्षिणा केल्यानंतर दारापुढे उभे राहून हाताने मागे मूर्तीला दगड मारण्याची पद्धत इथल्या ब्राह्मन्वाद्यानी सुरु केले त्याचा परिणाम बुद्ध मूर्तींचे विद्रुपीकरण झाले . पण जेव्हा अनागरिक देवमित्र धम्मपाल भारतात आले त्यानंतर त्यांनी ही प्रथा बंद करण्यास भाग पाडले . भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर प्रथम धम्मोपदेश तथागताने पाच भिक्खुना केला केला , विहाराच्या बाजूलाच पंचवर्गीय भिक्खुच्या मुर्त्या असताना त्याच ठिकाणी त्यांना पाच पांडव मुर्त्या म्हटलं जात आहे . या महाबोधी विहाराचे प्रबंधन त्या वेळपासून ब्राह्मणी परंपरेच्या हाती आहे ते आजपर्यंत . बंगालच्या शशांक राजाने तेथील बोधीवृक्षाला मुळासकट उपटून टाकले होते . आज जो बोधिवृक्ष तेथे दिसत आहे तो संघमित्रा श्रीलंकेला घेऊन गेली होती त्याची कलम तेथून आणून लावली त्याचा हा वृक्ष आहे आणि तोच हा बोधिवृक्ष आहे . शशांक राजाने त्याचठिकाणी महेश्वराची मूर्ती स्थापन केली त्यामुळे महाबोधी विहारापुढे शिवलिंगाची स्थापना दिसते .

बुद्धगयेजवळ भगवान बुद्धाच्या दोन मुर्त्या आहेत त्यांचही विद्रुपीकरण ब्राह्मणांनी केलेलं आहे एका मूर्तीला ते 'तेल्याबाबा' तर दुसऱ्या 'ढेल्याबाबा' म्हणतात . कारण एका मूर्तीला तेल टाकल्याने तो प्रसन्न होतो त्याला तेल्याबाबा' तर दुसरीला ढेकूळ फेकून मारले कि तो प्रसन्न होतो म्हणून ढेल्याबाबा' अशाप्रकारे बुद्धमुर्त्यांचे विद्रुपीकरण इथल्या मनुवाद्यांनी केलेलं आहे . भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरीनिर्वाणादरम्यान ' चार दस्सनिय ठानानि ' सांगितले . ते म्हणजे जेथे त्यांचा जन्म झाला ते लुम्बिनी , ज्या ठिकाणी सम्यक संबोधि प्राप्त झाली ते बुद्धगया , जेथे धम्मचक्रप्रवर्तन केले ते सारनाथ व जेथे त्यांचे महापरीनिर्वान झाले ते कुशीनगर , ही चार ठिकाणे सांगितली . याच धर्तीवर त्यांनी ' चारधाम ' निर्माण केले .

जगन्नाथपुरी या ठिकाणी जगन्नाथाचे मंदिर आहे ते हिंदूंचे नसून ते मूळ बुद्धाचे आहे आणि हे एक बुद्धविहारच आहे अजूनही या मंदिरावर धम्मचक्र अंकित आहे . चीनी प्रवासी ह्युअन त्सांग याने या ठिकाणी पाच स्तुपांचा उल्लेख केला आहे . तिरुपती बालाजी हा दुसरा तिसरा कोणी नसून ते एक बौद्धविहारच आहे हे डॉ . जमनादास खोब्रागडे यांनी संशोधन करून प्रसिद्ध केले आहे . रामटेक येथील रामाचे मंदिर देखील रामाचे नसून ते बौद्धविहारच होते याचेही संशोधन सुप्रसिद्ध संशोधक चंद्रनाग नारनवरे यांनीही पुस्तकरूपात प्रकाशित करून सांगितले आहे . रामजन्मभूमी अयोध्याही संपूर्ण बुद्धानगरी होती . राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाने तेथे उत्खनन केले असता तेथे सर्व बुद्धकालीन अवशेष प्राप्त झाले आणि कुठलेच राम मंदिर नाही मिळाले पण इथल्या मनुवादी लोकांनी ह्या गोष्टी दाबून ठेवल्या विशेष म्हणजे आयोध्या शहराचे प्राचीन नाव 'साकेत ' असे होते आणि ती बुद्धनगरी होती . पंढरपूर चे विठ्ठल मंदिर हे बुद्धविहारच होते आणि पांडुरंग हे नाव भगवान बुद्धाचे होते हे डॉ . बाबासाहेबांनी म्हटले होते , या संदर्भात अनेक पुरावेही आज उपलब्ध आहेत . पवनी या ठिकाणी बुद्धकालीन दोन मोठे स्तूप सापडलेले आहेत . सांची पेक्षाही मोठा स्तूप येथे होता .यापैकी एका स्तुपावर जगन्नाथाचे मंदिर बांधलेले आहे . ज्या ज्या ठिकाणी बौद्धलेण्या होत्या त्या त्या ठिकाणी त्यांनी या सगळ्या लेण्यांना पांडवलेण्या म्हटले आहे . कार्ले येथे भगवान बुद्धाची लेणी असताना पण अगदी लेणीच्या लगतच एकविरा देवीची स्थापना करून कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्यात येतो हा अतिशय घृणा आणणारा प्रकार इथल्या मनुवाद्यांनी केलेला आहे . बौद्ध धर्मावर हा ब्राह्मणांनी केलेला हल्ला आहे अस मी मानतो. रामटेकच्या नागार्जुन टेकडीवरही गुहेमध्ये नाग बसविलेला आहे . असे अनेक प्रकार अतिशय दुख देणारे आणि मनाला राग आणणारे आहेत .

ज्याप्रमाणे बौद्ध स्थळांचे विकृतीकरण केलेले आहे त्याप्रमाणे बौद्ध परंपरेचेही विकृतीकरण मनुवादी ब्राह्मणी संस्कृतीने केलेले आहे . आषाढी पौर्णिमा या दिवशी सिद्धार्थाने महामायेच्या पोटी प्रतीसंधी (जन्म ) ग्रहण केले . मुलीचे लग्न झाल्यावर आषाढी पौर्णिमेस मुलीला पतीच्या घरी ठेवीत नाहीत , माहेरी घेऊन येतात अथवा दुसरीकडे ठेवतात कारण काय तर 'आषाढी पौर्णिमा तिच्या अंगावरून जाऊ नये ' असे म्हणतात . याला कारण म्हणजे सिद्धार्थ गौतमाने आईच्या पोटात प्रवेश केला होता हा भावार्थ त्यात आहे म्हणून हिंदू ब्राह्मणी मनुवादी परंपरा हि आषाढी पौर्णिमा अशुभ मानते . याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन करून धम्म प्रकशित केला . भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ गुरु आहेत म्हणून हि गुरुपौर्णिमा आहे . परंतु याही पौर्णिमेला ब्राह्मणी परंपरेने बुद्धाच्या ऐवजी व्यास आणि पन्तजलीला गुरु मानून गुरुपौर्णिमा साजरी करतात हे या गुरुपौर्णिमेचही विकृतीकरण केलेलं आढळत . याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाने प्राणीहिंसेचा निषेध केला ती प्राणीहिंसा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी देवी ,मातामाय ,मरामाय इ . यांना कोंबड्या ,बकऱ्यांचा बळी देऊन साजरा करतात .

बुद्धधम्माचे होणारे आणि झालेले विकृतीकरण याचे आकलन व्हावे आणि बौद्ध बांधवानी कृतीशील व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे . अधिक माहिती आपण पुढील भागात घेवूया .

!!! जयभीम....................नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक

No comments:

Post a Comment