मनुष्याला सुखाचा ,दु:ख मुक्तीचा , समता , स्वातंत्र्य ,न्याय ,बंधुत्व , शांती , मैत्रीवर आधारित बौद्ध धम्म तथागत भगवान बुद्धाने जगाला दिला पण इथल्या ब्राह्मणी संस्कृतीने स्वार्थाकरिता इतिहासात त्याचा रक्तरंजितपणे ह्रास केला परंतु बाबासाहेबांनी १९५६ ला पुनरुजीवन केले . धम्माचे विकृतीकरण ब्राह्मणी हिंदू संस्कृतीने कस केल त्याचा आढावा आपण घेऊया .
हिंदू पुराण आणि ग्रंथात बुद्धाचे विकृत स्वरुपात वर्णन आढळून येते . जसे आयोध्याकांडामधील श्लोकात रामाने बुद्धाला म्हटले आहे , " यथा ही चोर : स तथा हि बुध्दस्त तथागत नास्तिकमत्र विद्धी !"
अर्थात - जसा चोर तसा बुद्ध तथागत नास्तिक आहे असे रामाने बुद्धाच्या संदर्भात म्हटले आहे . माझा इथे सरळ प्रश्न आहे हिंदुत्ववाद्यांना जर रामायण बुद्धाच्या अगोदर होऊन गेल असेल आणि ५००० वर्षाअगोदर असेल तर बुद्धाविषयी एव्हढी घृणा रामाला का होती ? रामायण म्हणजे दुसर तिसर काही नसून बौद्ध संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांच्यातील संघर्ष आहे . बुद्धाचा नवव्या अवतारामध्ये दाखवून विकृतीकरण केलेलं आहे . नवव्या अवतारानंतर दहावा अवतार विष्णू कशासाठी घेणार आहे ते अनुभागवत पुराणात लिहील आहे . त्यात अस लिहील आहे कि विष्णू जो दहावा अवतार घेणार आहे तो आणि त्याचे आक्रमण किटकामध्ये बौद्धांच्या विरोधात होईल असे म्हटले आहे . बृह्न्नारदीय पुराणात बौद्ध विहारत प्रवेश हा मोठा अपराध समजण्यात आला आहे . बंगालचे स्मृतिकार शूलपाणीने असे घोषित केले आहे कि बौद्धावर नजर पडल्यास मोठे पाप होते . एव्हढ बौद्ध धर्माचे विकृतीकरण केलेले आहे .
कुमारील भट्टाने बौद्ध भिक्खूच्या सहवासात राहून बौद्ध विरोधी कार्य केले . शंकराचार्याने भगवान बुद्धाला 'असंबद्ध प्रलापी ' म्हटले आहे . तसेच मनुष्यांना मूढ करून त्यांना धर्मबाह्य मार्गाने नेण्यासाठी बुद्ध अवतीर्ण झाला असे म्हटले आहे . भिक्षु म्हणून ज्यांना दहा वर्षे झालेली असतात त्यांना 'थेर ' म्हणतात . हे बौद्ध भिक्षुकरिता आपण आदरार्थी संबोधतो . परंतु हिंदू संस्कृतीने तो शब्द बदलवून ' थेरडा ' असे केले आहे . 'थेर ' याच शब्दाला अजून 'धेड ' इथल्या ब्राह्मण संस्कृतीने केले आहे . ब्राह्मण संस्कृतीचे पालन आज बसपा ,बामसेफ सारखे पक्ष अर्थात कांशीराम पासून मायावती , वामन मेश्राम इथल्या बौद्ध लोकांना शिव्या देण्यासाठी 'धेड ' 'गुजरे ' 'भडवे ' 'दलाल ' असे असम्यकपणे वापरून बौद्ध संस्कृतीचा अपमान केलेला आहे . परत 'भिक्खू ' या शब्दाचे विकृतीकरण इथल्या हिंदू संस्कृतीने भिकारी असे केलेले आहे त्याचप्रमाणे भिक्षुणीलाही दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आदराने ' थेरी ' असे म्हणतो पण या शब्दाचेही ' थेरडी ' असा विपर्यास केलेला आहे .
सिद्धार्थाला ज्या बोधीवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली सम्यक संबोधि प्राप्त झाली ते झाड म्हणजे बोधीवृक्ष . पण हिंदू संस्कृती असे सांगते कि पिंपळाच्या झाडाखाली कोणी जाऊ नका कारण तेथे 'मुंज्या ' राहतो अस स्वरूप त्यांनी प्रचलित केल . सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम धम्मोपदेश देऊन धम्मचक्रप्रवर्तन केल , धम्मचक्रप्रवर्तन हे बौद्धांसाठी आदराचे आहे . कृष्णाच्या हाती धम्मचक्राच्या ऐवजी 'सुदर्शनचक्र ' दाखविले आहे . बौद्ध धम्माचे 'निब्बाण ' हे अतिउच्च पद आहे . निर्वांणप्राप्ती हे धम्माचे मुख्य ध्येय आहे . परंतु निब्बाण याचेही विकृतीकरण करून निर्वाण म्हणजे तुमचा अंत आहे .
बुद्ध , धम्म आणि संघ हे बौद्धांचे त्रिशरण आहे आणि तीन हा शब्द बौद्धांसाठी महत्वाचा आहे परंतु ब्राह्मणी हिंदू परंपरेने तीन हा आकडा अशुभ मानला म्हणजेच बुद्ध , धम्म आणि संघ यांना शरण जाणे हे अशुभ आहे . 'तीन तिगाडा काम बिघाडा ' या वाक्प्रचार वापरतात . या तिन्हीना शरण गेले कि तुमचे काम बिघडते असा अर्थ ध्वनित होतो . मृत्युनंतर स्मशानात प्रेताला जाळण्यासाठी लाकडाच्या ढिगाला ठेवतात त्याला 'सरण ' अस म्हणतात . हे सरण कोणते सांगितले हे विचारणीय आहे .
धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ मार्ग आहेत . आठ हा शब्द हा शब्द अष्टांगिक मार्गाला विकृत करण्यासाठी अशुभ या दृष्टीने इथल्या हिंदू संस्कृतीने उपयोगात आणला . भगवान बुद्धाने उत्तम मंगल काय हे मंगलसुतामध्ये सांगितले आहे . पण ब्राह्मणी परंपरेने 'मंगलसुत्र ' म्हणजे स्त्रियांनी लग्नानंतर आपल्या पतीच्या नावाने घातलेला दागिना बनविले आहे . जयमंगल 'अठ्ठगाथा ' आपले मंगल होवो अशी भावना व्यक्त करण्यासाठी म्हटल्या जातात तिथे हिंदू संस्कृतीमध्ये मंगलाष्टके म्हणतात . हि मंगलाष्टके म्हणजेच जयमंगल अठ्ठगाथेचे केलेले विकृतीकरण आहे .
धम्मबांधवांनी बौद्ध धम्माचा अधिक अभ्यास करून इथल्या ब्राह्मणी हिंदू संस्कृतीच केल जाणार विकृतीकरण थांबवावं मूळ बौद्ध धम्माच पालन करून करून सम्यक संमार्गाने आपले कार्यप्रवण करावे हेच मला नमूद करावे वाटते . पुढील भागात आपण अधिक आढावा घेऊ.
!!! जयभीम ................नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक
No comments:
Post a Comment