Sunday, 29 December 2013

!!! राम उर्फ पुष्पमित्र शुंग ………………. !!!

इतक्या वर्षापासून बौद्ध धम्म , धम्माचा इतिहास आणि सोबत हिंदू ब्राह्मणी पुराण ,ग्रंथ विशेष करून रामायण ,महाभारत ,भगवदगीता यांच्या अभ्यासाअंती मी आज अतिशय ठामपणे ,सप्रमाण हे निष्कर्षाप्रत सांगू इच्छितो कि
हिंदू ब्राह्मणी लोकांचा रामायण या काल्पनिक पण वास्तव जीवनाशी साधर्म्य असणारे काव्य आणि या काव्याचा दाखविलेला नायक म्हणजेच 'श्रीराम' हा दुसरा तिसरा कोणी नसून बौद्ध धम्माचा पाडाव करणारा ' पुष्पमित्र शुंग ' हा आहे . पुष्पमित्र शुंगाला ' रामायणामध्ये राम हे नाव देऊन अतिशोक्तीचा भरणा केलेला आहे . रामायणामध्ये खलनायक स्वरूप दाखविलेल आहे असा 'रावण ' हा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोक आणि मोर्य घराण्याचा वंशज 'सम्राट बृहदथ ' आहे . सम्राट अशोक हयात असताना आणि नंतर भारतासह सिलोन (श्रीलंका) देशाचा बुद्धिष्ट देश होणाच्या जडणघडणीत मोर्य घराण्याचा सिंहाचा वाटा होता . तो काटा राम अर्थात ' पुष्पमित्र शुंग ' याने रावणाचा अर्थात ''सम्राट बृहदथ ' चा काटा काढून बौद्ध धम्मावर घाला घालण्याचे काम करून ब्राह्मणी धर्माला चालना दिली .

रामायणामध्ये अशा कितीतरी अतिशोक्ती आणि चुका आहेत कि थोडी बुद्धी लावली तर सहज लक्षात येतात . रामायणामध्ये उल्लेख आहे कि , जानकी राजा कडे परशुरामाने आपला शिवधनुष्य ठेवला होता . हा शिवधनुष्य इतका शक्तिशाली होता कि सामान्य मनुष्य तो तोलू शकत नव्हता . पण रामायणामध्ये उल्लेख आहे कि "सीता हि नऊ वर्षाची असताना शिवधनुष्याशी
खेळत होती आपल्या बोटाने त्याला हलवत होती " नंतर ती तरुण झाल्यावर त्या शिवधनुष्याला सहज हातामध्ये पेलत असे असा उल्लेख आहे ,याचा अर्थ असा कि परशुरामाचा धनुष्य जो मनुष्य / स्त्री पेलत असेल ती किती श्रेष्ठ आणि ताकदवान असेल . पुढे असा उल्लेख आहे कि जानकी राजाने सीतेचे लग्न अर्थात स्वयंवर करण्याचे ठरविले तेव्हा अनेक राजे महाराजे बोलविले होते त्यात राम आणि रावण पण आले होते . आता परत अगोदरच्या प्रसंगावर जाऊ कि "सीता तरुण झाल्यावर हा धनुष्य सहज उलचत असे". सीतेच्या स्वयंवरात जानकी राजाने हि अट घालती होती कि जो हा धनुष्याला दोरी लावेल त्याला सीता वरमाला घालेल , पण जेव्हा रावणाचा क्रमांक येतो तेव्हा "तो शिवधनुष्य पेलताना रावण खाली पडतो अर्थात तो पेलू शकत नाही" . पुढे राम धनुष्याला दोरी लावतो आणि सीता त्याला वरमाला घालते . पण पुढे ते वनवासात असताना रावण सीतेचे अपहरण करायला येतो असा उल्लेख आहे . आता आपण परत मागे गेलो असता कळते कि " सीता तरुण झाल्यावर हा धनुष्य सहज उलचत असे" आणि "रावण शिवधनुष्य पेलताना रावण खाली पडतो अर्थात तो पेलू शकत नाही" या दोन्ही गोष्टीवरून हा निष्कर्ष निघतो कि सीता हि रावणापेक्षा शक्तिमान आहे . मग अशी शक्तिमान सीता रावण आपल्या खांद्यावर घेऊन पळाला कसा ? लिहिणाऱ्याने काल्पनिकपणे लिहिला पण वाचणाऱ्या बहुजन हिंदू समाजाने आपला मेंदू नक्कीच गहाण ठेवला आहे .
असे अनेक प्रसंग आहेत ,जिथे बौद्ध धम्मावर आक्रमण करण्याच्या दृष्टीने आपलाच स्वकीय असणारा बहुजन अर्थात ओबीसी (हनुमान ) ला सोबत घेऊन समोर त्यांचे गोडवे गावून आणि रामाने त्याच अनुषंगाने ब्राह्मणांनी बहुजन ओबीसी यांना गुलाम केले आणि आणि काव्यात माकडे ,वानर ,हनुमान अशा संज्ञा लावून त्यांचीही लायकी काढलेली आहे . अर्थात इथल्या लोकांना गुलाम बनवून बौद्ध धम्माच्या पाडावास मदत घेतलीच आहे . हनुमानाची जवळ पास २५०० कि. मी. इतकी लांबी सांगितली आहे अर्थात श्रीलंका आणि भारताच अंतर अगदी ५० -१०० कि . मी . च्या आसपास आहे . सीतेला सहज तो परत आणू शकत होता जिथे संजीवनी बुटी आणण्यासाठी अख्खा पर्वत आणू शकतो तिथे बेटावर वसलेला श्रीलंका देश तो उचलून पण आणू शकत होता . अशा कितीतरी गोष्टी थोतांड आहेत तरीही बहुजन समाज अजून स्वताची बुद्धी हरवून गुलाम झालेला आहे . रामायणात बुद्धाचे उल्लेख वारंवार आढळतात . कुठे रामाच्या तोंडून बुद्धाला चोर म्हटलं जात कुठे रामाला बुद्धाची उपमा दिली जाते अर्थात यामागे पुष्पमित्र शुंग च आढळतो त्याचकाळात रामायण काव्याची निर्मिती झालेली आहे .

पुढे कृष्ण आणि काही महाभारत पण कल्पोकल्पित आणि बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर झालेली प्रसंगे आणि मूळचे बौद्ध धर्मीय पण पाडाव झाल्यानंतर 'शुद्र' म्हणून गणल्या गेलेल्या लोकावर अन्याय आणि अत्याचार रंगविण्याचे काम या ग्रंथातून आहे . कृष्णालाही ब्राम्हण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा पण थोडा बहुजन वाटला पाहिजे आणि इथल्या बहुजन लोकांना आपला वाटायला हवा म्हणून यादव वंशात गवळी रुपात पद्धतशीरपणे आणि शीलभ्रष्ट दाखविण्यात यशस्वी झालेले आहे , मुळात स्वतःचे आचरण अनैतिक असूनपण ब्राम्हण ग्रंथकारांनी कृष्णाला देव बनविण्यात यशस्वी झालेले आहेत . जिथे कृष्ण ब्राम्हण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो तिथे मूळ नागवंशीय बौद्ध असलेला 'कालिया मर्दन ' अर्थात नागवंशी तक्षक कालिया यांच्यातील संघर्ष हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राम्हण संस्कृतीचा संघर्ष आहे . इथेही बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर ' भगवद गीतेचे ' लिखाण हे दुसरे तिसरे काहीही नसून धम्म्पदाची नक्कल आहे अस अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे आणि आभ्यासांती खरही आहे . पण भगवदगीता हि हि धम्मपदाला विकृत स्वरुपात लिहिलेलं आहे . जिथे पृथ्वी हि हि चपटी आणि सरळ सांगितली आहे पण विज्ञानाने हे सिद्ध केलय कि पृथ्वी अंडगोलाकार आहे . अशा असंख्य गोष्टी आहेत आणि सर्व थोतांड आहे . अजूनही बहुजन समाजाने वाचन करावे आणि मानसिक गुलामगिरीतून सुटून मूळ बौद्ध धम्माकडे वळावे …………………

!!! जय भीम ………नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव
!!! जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!!

जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित बौद्ध धर्म (धम्म) देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणाल तर चुकीच नाही होणार याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . बौद्ध धम्माचे जे सिद्धांत त्यांनी मांडिले त्या सिद्धांतावरच १९ आणि २० शतकातील होऊन गेलेल्या महान वैज्ञानिकांनी बुद्ध तत्वज्ञानावर आणि तथागातालाच आद्य वैज्ञानिक मानूनच संशोधन पुढे नेले आहे .

अगदी अलीकडच्या काळातल उदाहरण घेतल तर Apple computer अर्थात आज आपण iphone किवा इतर गोष्टी ज्या Apple कंपनीने निर्माण केल्यात ज्या Mac OS अर्थात operating system वर आधारित आहेत त्याचा संचालक Director स्टीव्ह जॉब होता. अलीकडच्या काळात त्याच निधन झाल . पण पूर्वी सतत अपयश पाहून खचलेल्या स्टीव्ह जॉब ने बुद्धाविषयी ऐकले होते पण निराशेतून मार्ग काढण्यासाठी भारत भ्रमणावर आलेला स्टीव्ह बुद्ध विचारांना शरण आला . अपयशाने खचलेला स्टीव्ह बौद्ध धम्माच्या सिद्धांताने एव्हढा बदलून गेला कि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्ध तत्वज्ञान तो वाचू लागला . बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानच आहे त्यातून त्याला बुद्धाच्या उपदेशामधुनच computer क्षेत्रात आलेल्या अपयशाच कारण आणि मार्ग सापडला . बुद्धाने सांगितलेले परिवर्तन आणि कृतिशीलता त्याला एव्हढी भावली कि Apple ची creativity & Design बुद्ध सापेक्षतेवर आधारलेली होती जेव्हा तो परत आपल्या देशात अमेरिकेला गेला तर Apple Computer चे नाव आणि निर्मिती झाली आणि microsoft सारख्या प्रस्थपित उद्योगालाही मागे टाकून जगात Apple ने लौकिक मिळविला त्याचे श्रेय त्याने फक्त तथागत गौतम बुद्धालाच दिले .

जगातील atomic model अर्थात अणु संरचना नील बोहर आणि रुदरफोर्ड यांना जरी मानतो तरीही त्यांनी प्रताक्षात हे सांगितलं कि आम्ही फक्त प्रयोग करून दाखविला पण २५०० वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने Atomic Model सांगितलं आणि आपल्यालाही अनेक ग्रंथामधून हेच वाचावयास मिळते . Niel Bohr Stated that “ In Atomic Model built by the centrally situated nucleus and revolving electron around it “ तथागत हि शिष्यांना उपदेश करताना Atomic Model सांगतात केंद्रकाभोवती जे अणु रेणूचे कण फिरतात त्यामुळे वस्तूची निर्मिती आणि उर्जेची देवाण घेवाण होत असते . याचाच अर्थ हा आहे कि नील बोहर च्याही अगोदर हि रचना तथागताने मांडलेली होती म्हणून नील बोहर सारखा वैज्ञानिक बुद्धाला मानतो . ज्या लोकांनी science मधून शिक्षण झालेलं असेल किवा त्याची जाण असेल त्यांना हे कळेल . The Force is present between electron and nucleus is known as Electrostatic Force . बुद्धानेही सर्वप्रथम इलेक्ट्रिक field आणि Magnetic Field अर्थात चुंबकीय क्षेत्र सांगितलेलं आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र नेहमी विद्युत क्षेत्रालाच अनुसरून राहत किवा पूरक असत हेही तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे याचा उल्लेख अनेक शास्रज्ञ तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी पण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात उल्लेख केला आहे .

अल्बर्ट आईनस्टाइन ने सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचाच पुरस्कार करून संशोधन केलेलं आहे आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हेच सिद्ध केल कि विज्ञान हे बौद्धमत आहे . तथागत म्हणतात मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका ,स्वतः ते तपासा ,अनुभव घ्या , चाचपणी करा म्हणजेच प्रयोगशील राहून सत्यमत बघा . यातच सापेक्षवादाचा सिद्धांत आहे असे अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतो Theory of relativity हि बुद्ध विचारावरच आधारलेली आहे . Robert Mayer ने सांगितलेला उर्जा नियम अर्थात energy conservation law हा तथागत गौतम बुद्धाने २५०० वर्षापूर्वी सांगितलेला आहे . जे बुद्ध सांगतात कि उर्जा हि एका वस्तू मधून दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवाहित होते त्याच क्षमन कधीच होत नाही भूतलावर त्याचे भांडार जेव्हडे आहे ,तेव्हडेच राहते त्याची निर्मिती किवा त्याला नष्ट करणे शक्य नाही . हाच नियम Robert Mayer मांडतो कि Energy neither be created nor be destroyed it can convert one form to another form but whole energy remain in constant in isolated system .

Newton चे संशोधन बुद्ध धम्माच्या तत्वाज्ञानावरच आधारलेलं आहे आणि ज्या शास्रज्ञानी स्वीकारलं त्यांनी पुढे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल संशोधन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर आणि मार्गानेच आहे अस सांगितलं . काही प्रसिद्ध वैज्ञानिकांची मते खालील प्रमाणे आहेत
The main achievement of the success of the twentieth century scientists in transcending the three dimensional barrier is acquiring a more realistic understanding of nature and natural phenomena. Twentieth century transcended science enables us to scientifically confirm that such concepts as impermanence, rebirth, telepathy and selflessness taught by the Buddha are true phenomena of nature which are beyond three spatial dimentions and therefore beyond classical science.

Derek Parfit of Oxford University (probably the world's most important living philosopher) accepts the Buddhist view of life and selflessness. He believes that his acceptance of selflessness which was inspired by split brain research, has liberated him from the prison of self. He says,

"When I believed that my existence was such a further fact, I seemed imprisoned in myself. My life seemed like a glass tunnel, through which I was moving faster every year, and at the end of which there was darkness. When I changed my view, the walls of my glass tunnel disappeared. I now live in the open air."

Derek Parfit, Fritj of Capra (the well known Nuclear Physicist) and Gary Zukav accept the Buddhist view of matter and believes in the need to liberate ourselves from the prison of material particles.
Albert Einstein regarded as the father of the theory of relativity says,

"Individual existence impresses him as a sort of prison and he wants to experience the universe as a single cosmic whole. The beginnings of cosmic religious feeling already appear at an early stage of development, as an example in the Psalms of David and in some of the Prophets. Buddhism, as we have learned especially from the wonderful writings of Schopenhaur, contains a much stronger element of this."

Niels Bohr who developed the presently accepted model of the atom together with Earnest Rutherford says,

"For a parallel to the lesson of atomic theory….. (we must turn) to those kind of epistemological problems with which already thinkers like the Buddha and Lao Tzu have been confronted, when trying to harmonize our position as spectators and actors in the drama of existence."

The most eminent Nuclear Physicist, Robert Oppenheimer, who produced the first atom bomb says,

"The general notions about human understanding … which are illustrated by discoveries in atomic physics are not in the nature of things wholly unfamiliar, wholly unheard of, or new. Even in our own culture they have a history, and in Buddhist thought a more considerable and central place. What we shall find is an exemplification, an encouragement and a refinement of old wisdom." - Robert Oppenheimer.
वर उल्लेखलेल्या nuclear bomb theory मध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे याच कारण हेच कि तथागताने मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आचरणाला महत्व दिले तसाच अखिल मानवजातीला बाह्य शक्ती अर्थात आज जो elian किवा परग्रहावरील संभावित असणाऱ्या सजीवाबद्दल जे संशोधन अमेरिका आणि NASA द्वारे सुरु आहे त्याचेही मत बौद्ध मतात आढळते म्हणून अणुशक्ती प्रयोगाला पोखरण मध्ये "बुद्ध हसला " हे नाव देण्यात आले . अमेरिकेच्या संरक्षण दलातील सैनिकांच्या गणवेशावर वर बुद्धाचे प्रतिक असण्याचे हेच कारण आहे .

याही पुढे आपण गेलो तर Biology अर्थात जीवशास्त्र पण सर्वात अगोदर सांगणारे तथागत होते आणि human reproductive system तथगताने विशद केलेली आहे cell अर्थात पेशीचे formation कसे होते तेही सांगितलेलं आहे याचही एक उदाहरण म्हणजे जेव्हा शिष्य यश तथागातला विचारतो कि मानवाचा जन्म आणि उत्पत्ती कशी होते तेव्हा तथागत आईच्या गर्भात वाढणाऱ्या fetus अर्थात गर्भाच्या cell चे विश्लेषण करून कोणत्या लेयर पासून नाक, कान,मेंदू ,डोळे , इ . अवयवाचे वर्णन करतात . मेंडेल ने जो अनुवांशिक अर्थात hereditary law सांगितला कि The character from parent can transmitted from one generation to another generation तेच तथागत गौतम बुद्ध २५०० वर्षापूर्वी पुर्नजन्म आहे का ? यावर पुर्नजन्म आहे पण तो जसा जीव तसाच निर्माण होणार नाही त्याचे घटक मिळून जीव तयार होईल हे सांगतात म्हणजेच अनुवांशिक गुणधर्म एका पिढी कडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात हे सांगणारे प्रथम संशोधक तथागत आहेत . याचाच फलित म्हणजे जीवक सारखे वैद्यक तथागताचे शिष्य होऊन गेले आणि नंतर नागार्जुन सारखे आयुर्वेदाचार्य तथागतामुळेच जगाला मिळाले . माझा एव्हढ्या मेहनतीने लिहून सांगण्याचा उद्देश हाच कि जगात बौद्ध धम्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठलाच नाही . तथागत गौतम बुद्ध नुसते महान बुद्ध नसून एक अष्टपैलू महान तत्ववेत्ते आणि जगातील प्रथम संशोधक , शास्रज्ञ , वैद्यक बहुआयामी supernatural शक्ती होऊन गेलेत आणि बौद्ध धम्मात बाबासाहेबांनी आम्हाला आणून खूप मोठे उपकार आपल्यावर केलेले आहे . बौद्ध धम्माचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

!!! नमो बुद्धाय ………जय भीम !!!

- प्रवीण जाधव , अप्स इन्फोटेक
देवाबद्दल पूर्वी ब्राह्मण काय म्हणत असत? ते म्हणत असत कि देव अस्तित्वात आहे . तो कोठे आहे ? असे विचारल्यास ब्राह्मण म्हणत असत कि तो दिसू शकत नाही . तुम्ही जर म्हणालात कि कमीत कमी ब्राह्मणांना तरी तो दिसू शकतो का ? जर दिसत असेल तर त्याचा आकार कसा असतो . तेव्हा ते म्हणतात देवाला आकारही नसतो . जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा ते म्हणतात त्याला स्पर्श करता येत नाही . ते म्हणतात देवाला आकारही नाही . जेव्हा तुम्ही विचाराल कि मग विश्वास कसा ठेवायचा ? तेव्हा ते म्हणतात कि देव हा अदृश्य स्वरुपात आहे . या सर्व गोष्टी वाईट असतील तर ब्राह्मणांना मूर्ख का बर म्हणू नये ? त्यांना शहाणे कसे म्हणायचे ? जर देवाला कोणी पाहू शकत नसेल , स्पर्श करू शकत नसेल किंवा तशी जाणीवही नसेल तर मग ब्राह्मणांना देवाबद्दल माहिती कशी ? लोक त्यावर अंधपणाने विश्वास ठेवतात हा मूर्खपणा नव्हे काय ?

देवाच्या निर्मिकाने देवाला कुठलाही आकार नाही सांगितले , कुठले हात पाय नाही सांगितले , देव हे फक्त तत्वज्ञान आहे आणि ते सर्व जाणीवेपलीकडे आहे असे अल्वार ,नयन्मार आणि महान यांनीही सांगितले . मग आजकालच्या देवांना आकार कसा काय प्राप्त झाला ? मंदिरामध्ये मुर्त्या ठेवून त्यांना देव संबोधणे कितपत योग्य आहे ? म्हणून देव निर्माण करणारा नीच आणि मूर्ख नव्हे काय ? देवाला विशिष्ट आकार कोणी दिला ? देवाला आपण पाहू शकत नाही आणि त्याला स्पर्शहि करू शकत नाही हे जर खरे असेल तर त्याला दिवसातून सहा सहा वेळा अन्न देण्यात काय अर्थ आहे . अशा गोष्टीवर अमाप खर्च करणारी माणसे अस्तित्वात आहेत म्हणून तर हि नीच माणसे त्यांना फसवीत आहेत .

देवाला अन्न ग्रहण ग्रहण करताना कोणी पाहिलं का ? देवाला जिवंत राहण्यासाठी सहा सहा वेळा अन्न ग्रहण करण्याची गरज आहे का ? कोण व्यक्ती आहे जो देवाच्या मुखात घास भरवतो ? देव अन्न पचन करतो का ? दिवसातून एखादवेळी तरी देव शौचास जाताना कोणी पाहिलं का ? कोणी त्याला लघवी करताना पाहिलं का ?खरोखर देव जागचा हलू शकत नाही मग या नैसर्गिक विधी तो कोठे उरकतो ? या विषयावर जो काहीच विचार करीत नाही आणि विचारतही नाही त्याला महान व आस्तिक समजले जाते . देवाला कशाचीही गरज नाही हे जर खरे असेल तर ब्राह्मण देवाचे लग्न वैगेरे कशासाठी लावतात ? त्यास पत्नी व मुले कशासाठी हवीत ? एका देवाला दोन पत्न्या आहेत तर काहींना हजारो पत्न्या आहेत देवांना हजारो पत्न्यांची गरज काय ? याविषयी ते विचारही करू शकत नाही आणि उत्तरही देऊ शकत नाही . ते इथेच थांबत नाहीत तर ते दरवर्षी देवाचा लग्न समारंभ साजरा करतात . जे लोक देवाच्या लग्नास भक्तीभावाने उपस्थित राहतात ते विचारही करीत नाही आणि विचारतही नाही कि मागच्या वर्षी झालेल्या लग्नाचं काय झाल ? काय त्या देवाची पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली ? का एखाद्या आजाराने मरण पावली ? का असा एखादा कायदा आहे कि देवाचे लग्न एका वर्षासाठीच कायदेशीर ठरविले जाते ? हे प्रश्न विचारण्याची कोणाला गरज वाटते का ? दरवर्षी देवाच्या लग्नाला उपस्थित राहणारे मूर्खच आहेत .

जर देव साक्षात सदगुणांची मूर्ती असेल तर तो असा विविध स्त्रियांशी सबंध कसा काय ठेवू शकतो ? महाकाव्यात ,ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे शिव , विष्णू , कृष्ण इ . देवांनी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्यांना अनेक बायका असूनही अशा स्त्रिया ठेवण्याची गरज का भासली ? असा प्रश्न कोणी विचारतो का ? देवाच्या वर्तनावर आणि चारित्र्यावर अनेक कथा रचल्या आहेत . त्यांचे देव नालायक व्यक्तीसारखे वर्तन करीत होते हे अत्यंत दुर्दैवी आहे . काही देवांनी तर इतरांच्या पत्नींशी बळजबरी केल्याचे वर्णन आढळते . हे देव माणूस म्हणून घेण्यास पात्र नाहीत . अशा निर्माण केलेल्या देवांचा धिक्कारच करायला हवा .

(साभार - पेरियार रामसामी यांनी मेत्टपलायम तमिळनाडू इथे दिलेलं भाषण )

- प्रवीण जाधव
!!! धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीच १४ ऑक्टोंबर नव्हे !!!

मागील माझ्या बौद्ध धम्माचे विकृतीकरण या सदराखाली मी दशहरा / दसरा या विषयी विस्तृत माहिती दिली आहे . रावण , दसबळी इ . जे मांडले गेले आहे ते संपूर्ण बौद्ध धम्माच्या पाडवानंतरचे चित्रण आहे . आज कोणी रावण किवा म्हैसासूर यांची उदाहरणे देऊन मांडत असेल किंवा आवतन देऊन सांगत असतील तर तो बौद्ध धम्माच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्ट आहे . बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करून पाहिलं तर या सर्व गोष्टी बौद्ध धर्माला शह देण्यासाठी होत्या म्हणून काल्पनिकतेने सांगितल्या गेलेल्या पात्रांना मोठ करण्यात काहीही उपयोग नाही . ज्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे आहेत असाच बौद्ध धम्म सांगणे सर्वात अगोदर महत्वाचे आहे , रावण अथवा म्हैसासुर अशी पात्रे रंगवून सांगणे आणि बौद्ध धम्माचे महत्व लपविण्यासारखे आहे . बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी चे महत्व ओळखून आणि त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४ ऑक्टोबर म्हणून नव्हे तर अशोक विजयादशमी म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा पण हे अत्यंत चूक आहे याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न मी करतो .

'दसरा' हा हिंदू चा सण त्याच दिवशी येतो म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा असे बरेच लोक सांगताना आढळतात पण बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करणे आवश्यक आहे . सम्राट अशोक वयाच्या २१ व्या वर्षी मगध च्या गादीवर बसला आपला राज्याभिषेक करून संपूर्ण भारत देशाचा अनभिषीज्ञ सम्राट बनला एका मागून एक राज्ये अशोकाला शरण येऊ लागली पण कलिंग देशाचा राजा चैत्र काही शरण येत नव्हता म्हणून सम्राट अशोकाने कलिंग देशावर युद्ध पुकारले , युद्धात लाखो माणसे मारली गेली , लाखो लोक जखमी झाले. हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि भीती वाटली नाही. विजयाने बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता त्याचवेळी भन्ते निग्रोध चारीकेसाठी चालले होते . बुद्धं सरणं गच्छामीचा निनाद सम्राट अशोकाच्या कानावर पडला . अशोक म्हणतो , या भन्ते ,आपले स्वागत असो आपण वेळेवर आलात , मला आशीर्वाद द्यावा ,मी आता सम्राट झालो . त्यावर भन्ते म्हणाले , यात तू कसला आलास सम्राट , तू लाखो जीव हत्येचे पाप केले आहेस , हे सारे कशासाठी ? तृष्णेपोटीच ना ! यात जनहित मुळीच नाही . या लोकांचा आक्रोश तुला ऐकू येतो ना , हे सारे तुझ्याचमुळे झाले , असे दुष्कर्म तू केलेले आहेस .

पुढे भन्ते तथागताचा मैत्री , अहिंसा तत्वाचा उपदेश अशोकाला करतात . अशोकामध्ये बदल होऊन हाती असलेली तलवार सम्राट अशोक म्यान करतात आणि म्हणतो ," मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही ,युद्ध करणार नाही ,आजपासून मी धर्मशील होणार , मी बुद्ध धम्माला शरण जाणार तेव्हा अशोक बौद्ध धम्माचा स्वीकार करून भन्ते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतात . तो काळ म्हणजे इ . स . पूर्व २५४ आणि तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमीचा दिवस . तेव्हाच सम्राट अशोकाने एक जाहीरनामा आपल्या राजमुद्रेत अंकित करून दसहारा म्हणून प्रसिद्ध केला आणि पुढे अनेक वर्षे बौद्ध धम्माचे एक प्रतिक म्हणून अशोकविजयादशमी दसहारा हा उत्सव साजरा करण्यात आला . सम्राट अशोकाने प्रजेला प्रजाधर्म आणि राजधर्म म्हणून बौद्ध धम्म दिला , अनेक भिक्खूना परदेशात पाठविले , अनेक लेण्या , स्तंभ उभारले . ८४००० स्तूप बांधले . लाखो करोडो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली .बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारलेला 'दसहारा ' नावाचा अधिकृत जाहीरनामा बनवून त्यात आचरणाचे दहा तत्वे समाविष्ट करून अशोकविजयादशमी , दसहारा म्हणजेच कालांतराने दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला तो सम्राट अशोकाचा नातू बृह्दत्त उर्फ बुद्धरथ याच्या काळापर्यंत .

सम्राट अशोकाने ८४००० स्तुपासाठी अमाप पैसा खर्च केला इ . स . पूर्व २६७ ला सुरु झालेलं काम अगदी झपाट्याने इ . स . पूर्व २६५ ला पूर्ण झाले त्याचे कारण म्हणजे शहाणव्व कोटी सुवर्णमुद्रा खर्च करून हे बांधकाम पूर्ण केले . सम्राट अशोक जगातील सर्वात बलाढ्य ,संपत्तीवान राजा होता म्हणून प्राचीन भारताला सम्राट अशोकामुळे ' भारत सोने कि चिडिया ' किवा ' सोन्याचा धूर भारतातून निघत होता ' असे लोक आजही अभिमानाने म्हणतात . पुढे पुष्पमित्र शुंगाने सम्राट अशोकाचा नातू सम्राट ब्रूहदत्त उर्फ बुद्धरथ चा खून करून रक्तरंजित प्रतीक्रांती करून लाखो बौध्द धर्मियांच्या , भिक्खुंच्या कत्तली केल्या . एका भिक्खूचे डोके जो आणेल त्याला १०० सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या अर्थात सम्राट अशोकाच्या वंशांची संपतीची देखील लुट केली आणि बौद्ध धम्माच्या पाडवासाठी 'दसहारा ' जो सम्राट अशोकाने धम्म उत्सव सुरु केला होता त्याला आपले विकृत रूप देऊन धम्म आचाराची जी तत्वे होती तिचा पाडाव केला म्हणून आपल्यापरीने तोच सण सूडभावनेने साजरे केले . बौद्ध धम्माच्या ज्या सांस्कृतिक बाबी लोकांना आकर्षित करणाऱ्या होत्या कि बुद्ध मूर्तीची रथयात्रा , महोत्सव ,सण , उपोसथ इ स्वीकारून त्याचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले . मनु ला हाती धरून मनुस्मृतीची रचना केली , रामायण , महाभारत, भगवदगीता ,पुराणे इ . काव्ये निर्माण करून स्वतःला राम आणि मोर्य राजांना रावणासारखे दर्शवून बौद्ध धम्माला मोठा शह दिला . अनेक स्तूप ,विहारे, लेण्या बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले . काहींनी ब्राह्मणी देवस्थाने बनविली ज्यात पंढरपूर , तिरुपती , बद्रीनाथ ,जग्गनाथपुरी अशी मुळची बुद्ध विहारे बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले .

अर्थात बाबासाहेबांनी १९५६ या वर्षात येणारी अशोकविजयादशमी अर्थात दशहारा हा अश्विन शुद्ध दशमीचा दिवस निवडून सम्राट अशोकाने तथागत बुद्धाने केलेले जगातील धम्मचक्र प्रवर्तन अनुकारून त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली आणि धम्मचक्र प्रवर्तनचे अनुष्ठान केले . म्हणून आपण अशोकविजयादशमी चे ऐतिहासिक महत्व आणि धम्माचे पालन करून अनुसरण करावे . जर १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला तर आपले नावाला आंबेडकरी म्हणवणारे , २२ प्रतिज्ञा न पाळणारे , गणपती , दहीहंडी , नवरात्र साजरा करणारे १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतील पण दसरा या दिवशी पुष्पमित्र शुंगाने ब्राह्मणी हिंदू परंपरेने सुरु केलेल्या सणाला आपट्याची पाने तोडत बसतील म्हणून हा मूळ आपला दशहारा अर्थात अशोक विजयादशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन साजरे करून परत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा एव्हढंच मला सांगाव वाटत .

!!! नमो बुद्धाय ……………जय भीम !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक
!!! जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!!

ब्राह्मण म्हणून द्वेष , चीड ,राग निर्माण करणे , केवळ एखादा व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून त्याचा तिरस्कार करणे ह्या घातक प्रवृत्ती आहेत . काही संघटना ह्या फक्त व्यक्तीद्वेषावर उभ्या राहत असतील तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारतीय राष्ट्रवाद याला मुठमाती दिल्यासारखे होईल . परंतु जो ब्राह्मण निर्मित 'मनुवाद' जोपासत असेल तोच खरा जातीयवादी आहे मग तर कुठल्याही जाती , धर्माचा असेना . माझे अनेक मित्र , मैत्रिणी ब्राह्मण आहेत तेही बाबासाहेबांचे विचार जोपासतात , आज इतके ब्राह्मण समाजातले लोक आहेत त्यांनी मनुवादाला मूठमाती दिलेली आहे . जेव्हढ बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजातील लोक वाचत नाहीत त्यापेक्षा अधिक अभ्यास काही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलेले ब्राह्मण करीत आहे याचा अर्थ सर्वच ब्राह्मण चांगले किंवा सर्वच ब्राह्मण वाईट असा होत नाही . बाबासाहेबांच्या संकल्पेनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि भारतीयत्वाची कल्पना दूर करून काही संघटना आणि लोक केवळ ते जन्माने ब्राह्मण आहे म्हणून जातीय द्वेष निर्माण करून जातीयतेचा हा पेटता निखारा तसाच तेवत ठेवतात . समाज प्रबोधनासाठी ३३ कोटी देवांना लाथ मारणारे अभिनेते ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम लागू , ब्राह्मणवाद हा चुकीचा आहे अस सांगणारे प्र . के . अत्रे असो कि पु . ल . देशपांडे किवा अंधश्रद्धेविरुद्ध लढताना गोळ्या खाऊन मरणारे नरेंद्र दाभोळकर या सारखे अनेक लोक ब्राह्मणच आहेत . जर नुसता ब्राह्मण नावाने द्वेषसत्र सुरु ठेवले तर जो प्रामाणिक काम करणारा काही ब्राह्मण वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारख होईल . गांधी , जिना पेक्षाही श्रेष्ठ न्यायमूर्ती रानडे आहेत असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग रानडे सारखी महापुरूषे हे त्यांच्याच ब्राह्मणव्यवस्थेशी झगडत होते . मुळात जो ब्राह्मणवाद पाळणारे कोणीही असो मग तेच खरे देशाचे दुश्मन आहेत असे मला वाटते .

ब्राह्मणापेक्षाही जास्त प्रमाणात जातिवाद आणि ब्राह्मणवाद ब्राह्मणवादाच्या सावलीत वाढणाऱ्या काही जातीत तो अधिक आहे . स्वतःच्या जाती ब्राह्मण व्यवस्थेमध्ये शुद्र असूनही इतर जाती धर्माला कानिष्टतम दाखविणाऱ्या या जाती खरा ब्राह्मणवाद पाळत आहेत आणि अगोदर अनेक हजारो वर्षापासून जातीपातीच्या उतरंडी खाली जगण्यातच धन्यता ह्या काही मानात आलेल्या आहेत . महाराष्ट्रामध्ये खासकरून मराठा समाजाकडून अनेक कालखंडापासून इतर मागाससमाजावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे . याचा अर्थ संपूर्ण मराठा समाज दोषी नाही परंतु अलीकडच्या काळात मराठा समाजामध्ये याचे प्रमाण बहुतांश आहे . समाजप्रबोधनाचा ठेका घेतलेल्या काही संघटना विशेष करून मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड यांची मानसिकता फक्त ब्राह्मण द्वेष निर्माण करणारी अधिक वाटते . एक नंबर च्या खुर्चीवर असलेला ब्राह्मण समाज केव्हा खाली येउन त्यावर आपला नंबर केव्हा लागतो हेच या संघटनांच्या कृतीतून अधिक भासते . मागासवर्गीयांवर जेव्हा ज्या समाजाकडून अन्याय , अत्याचार होतो तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना त्यांच्या समाजात जाऊन याच प्रबोधन करतात का ? मागास समाजावर जेंव्हा अत्याचार , खून , बलात्कार इ . वाईट गोष्टी होतात त्यावर कधी मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड कधी तोंडातून ब्र काढतात का ? मग रस्त्यावर उतरून न्याय हक्क मिळवून देणे तर दूरची गोष्ट आहे . मूलनिवासी , बामसेफ , भारत मुक्ती मोर्चा , अम्बस सारख्या संघटना फक्त पैसा गोळा करणे आणि समाजप्रबोधनाच्या नावाखाली भाषणे देणे या व्यतिरिक्त गेल्या २५ - ३० वर्षापासून काहीही करीत नाहीत . मराठा संघटनाना अन्याय ,अत्याचार फक्त आपल्या समाजावर दिसतो ,अशा जबाबदार लोकांची जबाबदारी हवी कि समाजाला वाईट गोष्टीपासून परावृत्त करणे . निव्वळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेवून आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या संघटना आणि विनायक मेटे सारखे लोक फक्त समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतात . अन्याय अत्याचार जेव्हढे जबाबदार आहेत तेव्हढ्याच ह्या संघटना प्रबोधनाच्या नावाखाली अन्याय , अत्याचारावर मूकपणा बाळगणारे जबाबदार आहेत .

अन्याय , अत्याचार जिथे झाला तिथली परिस्तिथी न जाणता आपणही पेपर , टीव्ही मधून येणाऱ्या बातम्यांना हवा देऊन फक्त संघर्षाचे आणि जातीयतेचे विष पेरत असतो . समाजातील काही लोक फक्त मोठेपणा दाखविण्यासाठी सदर प्रकरणाला हवा देऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम करतात . ज्या कुटुंबावर , समूहावर अन्याय अत्याचार झाला त्या कुटुंबाला कायदेशीर साथ देणे , गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी झटणे , त्या कुटुंबाला आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे , परत असले अन्याय , अत्याचार होऊ नये म्हणून तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे , जाती ह्या नष्ट झाल्या पाहिजे यासाठी जातीअंताचा लढा सुरु ठेवणे ,हि आपली आंबेडकरी समाजाची मोठी जबाबदारी असली पाहिजे . तथागत भगवान बुद्ध ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार स्वातंत्र्य , समता , बंधुता , शांती , अहिंसा ,मैत्री , प्रेम या तत्वांचे रुजुनीकरण होण्यासाठी झटणे तेव्हाच अन्यायग्रस्त समाजाला आणि त्यादृष्टीने तशी व्यवस्था निर्माण होण्याला न्याय देण्यासारखे होईल .

!!! नमो बुद्धाय ……… जयभीम !!!
- प्रवीण जाधव
 
!!! निराश मनोवृत्ती समाजपरिवर्तन कशा करतील ? !!!


रिपब्लिकन चळवळीला ५७ वर्ष झालीत बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष राजकिय पटलावर शुन्य असला तरी सामाजिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहे हे अनेक सामाजिक चळवळीतून अनेक सामाजिक आंदोलनांची लढे करण्यात यशस्वी झाला आहे . रिपब्लिकन पक्षाने राजकीय पटलावर सुरु केलेली घौड दौड अतिशय यशस्वीपणे सुरु केली याची फळे सुरुवातीला महाराष्ट्र , उत्तरप्रदेश ,पंजाब आणि बंगाल प्रांतात यशस्वीपणे पक्ष संघटन आणि राजकीय यश सुरुवातीला या पक्षाला मिळाल अर्थात याच कारण दादासाहेब गायकवाड सारख्या नेत्याला समोर करून सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी तितकीच साथ दिली होती परंतु फुटीचा शाप आणि स्वार्थीवृत्तीमुळे नेत्यांनी पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले . भैय्यासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आनण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले . दादासाहेबांचे आजारपनाचा काही स्वार्थी नेत्यांनी आणि कॉंग्रेस नेत्यांनी घेऊन रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्वच संपून टाकले . रा . सु . गवई नी तेंव्हापासून धरलेली कॉंग्रेसची वाट धरली ती आजवर सुटलेली नाही . अनेक वेळा नेते एकत्र आले आणि फुटले स्वार्थी हेतूनी स्वतःचे पोट समाजाच्या पोटापेक्षा मोठे समजणारे नेते कधी याच्या दावणीला कधी त्याच्या दावणीला दिसले .

जेव्हा जेव्हा कॉंग्रस अडचणीत येते सत्ता हातातून निसटू लागते तेव्हा कॉंग्रेस धार्जिण्या रिपब्लिकन नेत्यांना हाताशी धरून रिपब्लिकन ऐक्याची बोंब इथल्या कॉंग्रेस कडून उठवली जाते ८० च्या काळात प्रकाश आंबेडकरांचा उदय त्या वेळी तुकड्या तुकड्या मध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीला भारिप अर्थात भारतीय रिपब्लिकन पक्ष या माध्यमातून एकत्र आणण्यात यशस्वी होत होते . त्या नंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाने लढविलेली निवडणूक पक्षाचे नवीन तरुण मंडळी निवडून आली नाही पण राजकीय पटलावर आपला ठसा आणि घेतलेली मते लक्षणीय ठरली . अर्थात हि वाटचाल फक्त प्रकाश आंबेडकरांची एकट्याची नव्हती तर संपूर्ण आंबेडकरी समाज एकोप्याने आणि स्वाभिमानाने पुढे जात होती . राजकीय परिवर्तनाची ती नांदी होती पण पुढे कॉंग्रेस ने चळवळ जेव्हा हवी असेल तेव्हा काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून रिपब्लिकन चळवळीला खिंडार पाडले . जेव्हा कॉंग्रेस अडचणीत आली तेव्हा ९ शेंबड्या पोरांना उपोषणाला बसवून रिपब्लिकन ऐक्य हे गोंडस नाव देऊन , प्रकाश आंबेडकरांनी मजबूत केलेली रिपब्लिकन चळवळ नेस्तनाबूत करण्याचे काम केले . ऐक्यामुळे इतर कोणाचे नाही पण प्रकाश आंबेडकरानी सुरु केलेल्या स्वाभिमानी चळवळीचे राजकीय पटलावर मोठे नुकसान झाले . प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात समाज आगेकूच करीत असताना रामदास आठवले रिडल्स असो वा इतर आंदोलने असो प्रकाश आंबेडकरासोबत होते . पण आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा दुश्मन आणि आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करणारा 'शरद पवार ' याने रामदास आठवले ला फोडून रामदास आठवले सारख्या नेत्याला हाताशी धरून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आगेकूच करणारी आंबेडकरी चळवळ आणि प्रकाश आंबेडकराना शह देण्याचा प्रयत्न केला . रामदास आठवले लाचारीने शरद पवार सोबत २० वर्ष राहून रिपब्लिकन चळवळ राजकीय पटलावर शुन्य करून टाकली .आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा दुश्मन शरद पवार पासून फारकत घेऊन शरद पवाराच मित्र आणि आंबेडकरी चळवळीचा महादुश्मन असलेल्या बाळ ठाकरे चरणी लीन होऊन आज सत्तेचा तुकड्यासाठी कधी उद्धव ठाकरे तर कधी गोपीनाथ मुंडे ला 'जोहार माय बाप जोहार' करताना दिसत आहेत आणि तिकडून काही हाती मिळत नाही हे दिसत असताना पडद्यामागून प्रकाश आंबेडकराना 'ऐक्याचे ' साकडे घालताना दिसत आहेत . इतर गटाचे नेते शांत बसून येणाऱ्या तुकड्याची वाट पाहत आहेत . इथे खरोखरच समाजाने आणि आंबेडकरी तरुणांनी स्वतः तटस्त राहून शिव्या हाकण्याचा जो कार्यक्रम फेसबुक वरून चालतो तो थांबवून निदान आपल्या भागात समाजाला जागृत करून खऱ्या रिपब्लिकन चळवळीला मजबूत कराव .

आज बरेच निराशावादी लोक हे रिपब्लिकन चळवळीला हे व्हायला हव होत हे करयला हव होत , आपण एव्हढे निराश झालो का ? घरात बसून समाजपरिवर्तानाच्या गप्पा करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या वारसाएव्हढे कर्तुत्व बजावले आहे का ? किंवा समाज परिवर्तनाच्या गोष्टी करून जे वास्तव आहे , जे प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या विचाराने आंबेडकर घराणे काम करत आहे त्यांना शह देण्याचे प्रयत्न पडद्याआडून होत आहेत . रिपब्लिकन चळवळीला अपयश आले आहे आणि आम्हीच ती उभारू आमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही ? चळवळीला नेताच राहिला नाही अशा वल्गना करणाऱ्यांनी उद्याच नवीन दुकान उघडण्याचे कंत्राट स्वतःकडे आहे आणि आम्हिच याचे वाली आणि आम्हीच या चळवळीचे प्रेषित आहोत हि भूमिका घेतात . बाबासाहेबांच्या विचारांनी बहुजन शेतकरी , शेतमजूर ,कष्टकरी , कामगार या लोकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी उभी करण्यात बाळासाहेब आंबेडकर यशस्वी होत आहेत तर ती एक उल्लेखनीय आणि अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल . या वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी जेव्हढे सामाजिक मुद्दे ,लढे , सभा इतर कोणी नेत्यांनी घेतले किंवा लढले नाही . एव्हढे सारे कर्तुत्व असताना समाजात नेता नाही म्हणणारे आणि गढुळ वातावरण निर्माण करणारे स्वयंघोषित फेसबुकी विचारवंत चळवळीचे खरे मारक आहेत .

आज रिपब्लिकन चळवळीत बाळासाहेब आंबेडकराइतका प्रगल्भ , अभ्यासू नेता नाही , अन्य नेते कुठे असतात त्यांना माहिती पण निवडणुकीची तुतारी वाजायला लागली कि अनेक स्वयघोषित नेते ऐक्याची हाक देताना दिसतात . एखादा भिकारी भिक मागून थकेल पण रामदास आठवले अजिबात थकत नाहीत , उद्धव ठाकरे ची भेट होत नाही हे हेरून लक्ष्मीपूजनाच्या शुभेछ्यांच्या नावाखाली एका राज्यसभेच्या जागेची मागणी करून लाचार शब्दालाही लाज वाटेल इतका लाचारपणा चालवलेला आहे त्यांचा संसार त्यांना लखलाभ असो पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक चळवळ चालविणाऱ्या बाबासाहेबांच्या रक्ताला बदनाम आणि शह देणाऱ्या लोकांची निराशावादीवृत्ती हि तुमच्या स्वतःची आहे समाजाची नाही . आज चळवळ सक्षमपणे अभ्यासूपणे पाहले असता बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेता आजवर चालवत आहेत , अकोला ,औरंगाबाद ,चंद्रपूर , नागपूर सहित अनेक ठिकाणी स्वबळावर लोकप्रतिनिधी बाळासाहेबांनी निवडून आणलेत , इतरांच काय ? कवाडेचे काय अस्तित्व ? गवई कुठे आहेत ? आठवले स्वबळावर लढले का ? समाजाने नेत्यांचा विचार करायचा कि ३ कोटीच्यावर असलेल्या समाजाचा विचार करायचा . चळवळीला बाबासाहेबांच्या रक्ताचा नेता आहे तो कधीच सांगत नाही कि मी तुमचा नेता नाही पण कृतीतून कार्य करणाऱ्या नेत्याची ओळख होते . रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा वाजविणारे आणि निराशावादी फेस्बुकी विचारवंत फक्त ऐक्याच्या आडून आंबेडकर कुटुंबावर चिखलफेक करतात , स्वतःचे कर्तुत्व अस्तित्व ? ओळखून समाजात दुही आणि संभ्रम निर्माण करणारे लोक समाजाच्या भविष्याच्या विचार न करता , इथल्या प्रस्थपित व्यवस्थेवर न बोलता फक्त आंबेडकर द्वेष निर्माण करून, जो पुढे जात आहे त्याचे पाय ओढण्याचे काम करतात .

स्वतः किती परिवर्तन करू शकतो याची ग्वाही देण्याइतपत आपण मोठे नाही आहोत , जे वास्तव आहे , ज्यामागे समाजमानस आहे त्याला नाकारून आणि निराशावादी वृत्ती समाजात पसरवून समाजाचे परिवर्तन कधी होत नसते .

!!! जयभीम ...... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव
!!! कोलंबसाच्या पूर्वी अमेरिकेचा शोध बौद्ध धर्मियांनी लावला !!!

भारतापासून हजारो कोसो दूर असलेल्या जावा , अमेरिका वैगेरे देशातून कोलंबस पोहोचण्यापूर्वी बौद्ध धर्माने प्रवेश केला होता . जावा बेटापर्यंत बौद्ध धर्म कसा पोहचला याची संपूर्ण हकीकत उपलब्ध नाही पण भगवान बुद्धाच्या ध्यानस्थ मुर्त्या तेथे सापडल्या आहेत . यावरून अमेरिकेत बौद्ध धर्मप्रचारकांचा प्रवेश हा कोलंबसाच्या पूर्वी हजारो वर्षाअगोदर झाला होता तेथे सप्रमाण देऊन अनुमान लावता येईल . या संबंधाने अमेरिकेतील मासिकात " कोलंबसाच्या पूर्वी अमेरिकेचा शोध " या शीर्षकाखाली एक लेख प्रसिध्द झाला होता . " Buddhist discovery of America in the Harper's Magazine for July 1901 " १४४० वर्षाच्या पूर्वी बौद्ध भिक्षु अमेरिकेत गेले होते आणि तेथे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला होता .

प्रोफ . फ्रायर असे म्हणतात कि अनेक प्रमाणावरून सिद्ध झाले आहे कि , " पाच बौद्ध भिक्षु रशियाच्या उत्तर सीमेवरील कामश्चाटकाद्वीपकाल्पातून प्रशांत महासागर ओलांडून अलाक्साच्या बाजूने अमेरिकेत उतरले आणि दक्षिण मेक्सिको पर्यंत जाऊन पोचले होते . " या मार्गाने अमेरिकेत उतरणे अशक्य नाही . हा मार्ग किती सोपा आहे हे समोर नकाशा समोर ठेवून पाहले असता हा अत्यंत सोपा मार्ग आहे . मेक्सिकोमधल्या मूळ रहिवाशांचा प्राचीन इतिहास , त्यांचा धर्म , आचार विचार व प्राचीन कीर्तीची अवशिष्ट चिन्हे ह्या सर्व गोष्टी सत्यत्वाची साक्ष देतात . चीनच्या प्राचीन ग्रंथात फुसम नावाच्या एका प्राच्य देशाचा उल्लेख आहे . हे नाव त्या देशातल्या एका वृक्षाच्या नावावरून पडलेले असावे . मेक्सिकोमध्ये ' आगुये ' किंवा 'मागुये' नावाचा जो वृक्ष आहे त्यामध्ये व फुसम या वृक्षामध्ये बरेच साम्य आहे . चीनी भाषेत हु-एन-त्संग याने जो प्रवासवर्णन लिहिलेला आहे तो काल्पनिक नसून त्याला जे आढळले त्याने सर्व हकीकत आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेलं आहे . इ . स . ४९९ मध्ये चीनी राजा यु आन याच्या कारकीर्दीमध्ये तो फुसम येथून किंचेन येथे गेला होता . तो राज्यक्रांतीचा काळ असल्यामुळे राजदर्शनाचा योग त्याला घडला नाही . पण राज्यक्रांतीची गडबड शांत झाल्यावर तेथील नव्या राजाची भेट त्याने घेतली आणि फुसम येथून आणलेल्या चमत्कारिक वस्तू राजाला नजर केल्या . या वस्तूमध्ये एक विचित्र प्रकारचे कापड होते . हे कापड रेशमासारखे मऊ होते , त्याचे सुत बारीक असून इतके मजबूत होते कि एखादी जड वस्तू त्याला बांधून ठेवली तरी ते फाटत नसे . मेक्सिकोमधल्या 'आगवे' नावाच्या वृक्षापासून अशाप्रकारचे वस्त्र तयार होते . दुसरी नजर केलेली वस्तू म्हणजे सुंदर आरसा होती . अशाप्रकारचे आरसे मेक्सिकोच्या सीमेवरील लोकात दृष्टीस पडतात . राजाज्ञेवरून हु - एन याने आपला प्रवासवृतांत लिहिला .

पूर्वी फुसमच्या लोकांना बौद्ध धर्माची माहिती नव्हती पण इ . स . ४५८ मध्ये सुंग वंशातील ता - मीन राजाच्या कारकिर्दीत काबुलाहून पाच बौद्धभिक्षु फुसम येथे गेले व तेथे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला . तेंव्हा बहुसंख्य लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तेंव्हापासून तेथील लोकांच्या नीतिमत्तेत सुधारणा झाली . हे बौद्ध भिक्षु कामश्चाटकाद्वीपकाल्पातून कोणत्या मार्गाने गेले व वाटेत किती अंतरावर त्यांना कोणकोणती स्थळे लागली , तेथील लोकांचे आचार विचार कसे होते याची सर्व हकीकत प्रवासवृत्तात आहे . फुसम वृक्षाच्या सालीपासून तंतू कसे काढतात आणि त्यांचे वस्त्रे कसे विणतात किंवा त्यापासून कागद कसा तयार करतात याचे विस्तृत वर्णन लिहून ठेविले आहे . तेथे जी फळे होतात जी प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे तीच फळे मेक्सिको मध्ये होतात . त्या देशात तांबे सापडते , पण तेथे लोखंडाच्या खाणी नाहीत व सोने , चांदी यांचा व्यवहार नाही असे म्हटले आहे . तेथील लोकांची राज्यपद्धती , आचारविचार ,विवाह , प्रेतसंस्कार ,नगररचना , सैन्य , शस्रास्रे यांचा अभाव वैगेरे संबंधाने त्या प्रवाशाने केलेली वर्णने आणि अमेरिकेच्या मूळ रहिवासी विशेषत: मेक्सिकोच्या सीमेवर राहणारे लोक यांच्यामध्ये जबरदस्त साम्य आढळते . मेक्सिकोमध्ये एक दंतकथा लोकामध्ये अशी आहे कि एक श्वेतकाय परदेशी पुरुष तेथे गेला होता व पापांचा परिहार करावा , न्याय व सत्य यास धरून व्यवहार करावा , शिष्टाचार ,मिताचार ठेवावा वैगेरे गोष्टींचा उपदेश तो करीत असे . त्याच्या स्मरणार्थ म्यागडालीना या गावामध्ये त्याची एक पाषाणमूर्ती ठेवण्यात आली होती . तिचे नाव उइ- सी- पेकोका असे होते . त्यामुळे हेच ते पाच बौद्ध भिक्षु असावेत . स्पानिश लोकांनी अमेरिका खंड जिंकला तेंव्हा लोकामध्ये प्रचलित असलेली धर्ममते , आचार ,संस्कार , त्यांचे शिल्प , घरे बांधण्याची तऱ्हा ,काल गणनेची पध्दती इ गोष्टी ज्या आशिया खंडातील बौद्ध धर्म यांच्यात बरेच साम्य होते यावरून हेच सिद्ध होते कि दोन देशातील दळण वळण असल्याशिवाय अशाप्रकारचे साम्य निर्माण होऊ शकत नाही .

परत आणखी एक प्रमाण देता येईल ते भाषाविषयक होय , भगवान बुद्धाचे नाव गौतम व वंशाचे नाव शाक्य . गौतम आणि शाक्य हि दोन्ही नावे मेक्सिकोमधील नावांशी मिळतीजुळती आहेत . उदाहरण ' ग्वातिमाला ' हे नाव 'गौतमालय ' याचा अपभ्रंश आहे . पुरोहिताचे नाव 'ग्वातेमोट - निज ' हे नाव गौतम या नावावरून निघालेले दिसते . यास्काका , जाकाटेकास , शाकाटापेक , जाकाटलाम , शाकापुलास इ . नावांशी 'शाक्य' या नावांशी साम्य आढळून येते . पालेस्के येथे एक प्राचीन बुद्धमूर्ती आहे . तिचे नाव शाक-मोल अर्थात शाक्यमुनी . कोलोराडो नदीच्या ओघात एक बेट आहे , त्यात एक पुरोहित राहत होता त्याचे नाव गोतुशाक्का म्हणजेच गौतम शाक्य असे होते .

आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे कि अमेरिकेमध्ये अश्या कित्येत वस्तू आहेत कि त्यावरून तेथे बौद्ध धर्म प्रचलित होता याला उत्कृष्ट प्रमाण सापडते . ध्यानस्थ बुद्धाच्या मूर्ती , भिक्षु वेशातल्या मूर्ती , हत्तीचे पुतळे (मेक्सिकोमध्ये हत्ती हा प्राणीच नसता तेथे त्याच्या मूर्ती कशा आल्या ?) . चीनमधील प्यागाडो बुद्धमंदिर सारख्या आकृतीची देवालये , तटावर चित्रे कोरण्याची पद्धती , कोरीव शीला , स्तूप , विहार या सर्व गोष्टी याचेच प्रमाण दाखवितात कि कोलंबसाच्या हजारो वर्षाअगोदर तेथे बौद्ध धर्मीय लोक पोहचले होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तेथे केला होता .

(अधिक माहितीसाठी www.sacred-texts.com/earth/fu/ या वेबसाईट वर जाऊन अभ्यास करावा)

!!! जयभीम ..... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव
     !!! भिडेवाड्याच्या शोधात …………… !!!

थोर महापुरुष महात्मा फुले विषयी त्यांच्या साहित्यातून बराच काही वाचाल होत पण त्यांनी १५ मे १८४८ ला भिडेवाडा येथे सुरु केलेली देशातील पहिली शाळा विषयी बरच कुतूहल होत . तो भिडेवाडा किती महान असेल या महापुरुषाचा सहवास लाभलेला म्हणून काही वर्षापूर्वी मी आणि माझा अभियंता मित्र राहुल जाधव भिडेवाडा शोधण्यासाठी निघालो . राहुल ला फक्त एव्हढंच माहित होत कि बुधवारपेठे मध्ये कुठेतरी आहे म्हणून ! बुधवारपेठेतून आम्ही पायी चालू लागलो . चालताना जणू तो काळच त्या रस्त्यामधून flashback झाल्यासारखे झाले . शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नायनाट पेशव्यांनी करून नुसता माज पेशव्यांनी वाढवला असेल , जातीयतेचा उत निर्माण करून इथल्या शुद्र समाजावर अन्याय अत्याचार याच रस्त्यावर हे पेशवे करीत असतील , इतक्या भयंकर परिस्थिती मध्ये महात्मा फुले , सावित्रीबाई फुलेंनी बहुजन समाजाच्या उद्धाराचा जो वसा घेतला असेल तो किती किती महान आहे . ब्राह्मणी कामांध चेहरे , शेण गोटे खाऊन सगळ्या अडचणींना तोंड देऊन सावित्रीमाई ने जो स्त्री जातीचा उद्धार केला त्याची सर बदकावर बसून बदकाला त्रास देणाऱ्या काल्पनिक सरस्वतीला कुठून येणार असे अनेक विचार मनात येउन चालत होतो भिडेवाड्याच्या शोधात ! रस्त्याने चालताना अचानक देहविक्री करणाऱ्या स्त्रिया नजरेस पडल्या . मनात वाटल , पेशव्यांनी अनैतिकपणाचा किती अंत केला असेल . परराज्यातून स्त्रिया लुटून आणून त्यांना उपभोगुन त्यांना या गलिच्छ व्यवसायात ढकलुन अत्याचाराचा हा हा कार माजविला असेल . ज्या ब्राह्मण पेशव्यांनी असले घाणेरडे कृत्ये केले तिथे माझा महात्मा या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांच्या अनौरस मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडे करून त्यांना सन्मार्गाला लावण्याचे महान कार्य आमच्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई ने केले खरच त्याला तोड नाही . जेव्हढा आदर आई वडिलांसाठी असेल त्याहुनी अधिक आदर फुले दांपत्याविषयी अधिकाधिक वाढत होता , प्रत्यक्ष तो काळ अनुभवतोय कि काय हे पाहून मन भरून आले .

चालताना अनेकांना हा प्रश्न होता कि भिडेवाडा कुठे आहे ,पण तिकडून उत्तर यायचं कि भिडेवाडा काय आहे ? आमच हेच उत्तर ठरलेल असायचं कि मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेनी भिडेवाड्यामध्ये सुरु केली होती . अनेकांची महात्मा फुले बद्दलची अनास्था पाहून मन नाराज होत होत, दुपारची वेळ झाली होती . समोरच एक हॉटेल दिसलं वाटल अगोदर आता काहीतरी खाऊन घ्याव . बिलाचे पैसे द्यावे आणि हॉटेल मालकाला विचारावं कारण याला कदाचित माहित असेल पण कसलं काय त्यालाही काही माहित नव्हत . समोर असलेल्या पोलिस चौकीमध्ये बसलेल्या पोलिसालाही आम्हाला हेच विश्लेषण द्यावे लागले मग त्याने आम्हाला योग्य पत्ता दिला . येउन भिडेवाड्याजवळ आलो तर त्याची स्थिती पाहून मन हेलावून गेल कारण जीर्ण झालेला हा भिडेवाडा खूप मोडकळीस आलेला होता , त्यामध्ये अतिक्रमण करण्यात आलेले दुकाने पाहून तर मनात अधिक राग निर्माण झाला.

फुले ,शाहू , आंबेडकर याचं नाव घेऊन येणार सरकारसहित महात्मा फुले , सावित्रीमाई फुले मुळे शिकलेले पण स्वतःची ओळख नसलेले आणि तेव्हढेच हुकलेले लोक पाहून या महात्म्याची होणारी हेळसांड खूप वेदानादाई होती .दुसर एक आश्चर्य म्हणजे भिडेवाड्याच्या विरुद्ध दिशेला पाहल तर "श्रीमंत दगडूशेठ हलवाई चा गणपती " नटून थटून आलेल्या स्त्रियांनी आणि मुलीनी घेरलेला दिसला . ज्या महापुरुषाने ,सावित्रीमाईने अतोनात हाल सोसून या समाजासाठी झिजले खासकरून सावित्रीमाई ! मुली शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे म्हणून आयुष्य वेचले. मुली शिकल्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या . दगडू गणपतीच्या दर्शनासाठी मरत असलेल्या नटलेल्या मुलींची सावित्रीबाई विषयी असलेली अनास्था बघून मनात आक्रोश निर्माण होत होता पण आजही दगडू चा गणपती अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि अडगळीत पडलेला भिडेवाडा शेवटची घटका मोजीत आहे . दगडू गणपती ला मिळणाऱ्या देणग्या पाहल्या असता दिवस अपुरा पडतो , त्या देणगी देणारामध्ये रामदास आठवले चे नाव वाचून तर पारा अधिक चढतो पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करून फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रसार करू हे ध्येय केंव्हाचेच उरी बांधले होते .

भिडेवाड्याचे फोटो काढत असताना दगडूगणपतीच्या रांगेतले आमच्याकडे येउन हे का गणपतीचे फोटो न काढता या पडक्या वाड्याचे फोटो काढत आहेत म्हणून विचारात होते त्यावर त्यांना या वाड्याचे काय महत्व आहे हे सांगितल्यावर तेच महानग महानगी भिडेवाड्याचेही फोटो काढू लागली … हा खूप मोठा विरोधाभास होता .

आज भिडेवाडा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे ,शासनासह सर्वांनी या कडे दुर्लक्ष केल्यामुळे तो उपेक्षेचे केंद्र झालेला आहे एव्हढंच काय तर भिडेवाडा हा आज दारूचा अड्डा झालेला आहे , सर्वांच्या दुर्लक्ष्यामुळे ऐतिहासिक भिडेवाड्याची हि दुरवस्था झालेली आहे . भिडेवाडा बचाव समिती यासाठी कित्येक वर्षापासून लढा देत आहे पण आता महात्मा फुलेंच्या वंशजांनी हा वाडा सर्व जनतेमिळून ताब्यात घेण्याचे ठरविले आहे त्याची उपेक्षा थांबविण्यासाठी हेच आंदोलन आता हाच मार्ग बाकी आहे .

आज २८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले चा स्मृतीदिन खरच आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून निदान महाराष्ट्र शासनाने तरी पाळावयास हवा . महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहचावे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हीच क्रांतीबाला वाहिलेली श्रद्धांजली ठरेल .

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त या महान क्रांतीबाला कोटी कोटी प्रणाम !!!

- प्रवीण जाधव
                   !!! आंबेडकरी तरुण जागृत होत आहे ...........!!!

राजकारण हे एक माध्यम असू शकते समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि राजकारण म्हटलं कि अनेकांच्या कपाळाला आढ्या पडतात किंवा एकप्रकारे राजकीय अस्पृश्यता निर्माण झालेली आहे त्यामुळेच कि काय राजकीय परिवर्तन करणे नेहमीच अवघड राहिलेलं आहे . सामाजिक बदलला समाज चुटकीसरशी भूमिका घेऊन स्वीकारतो तिथे राजकीय बाबतीत उदासीन राहतो . राजकीय भूमिका घेणे म्हणजे दिवस रात्र पक्षाचा कार्यकर्ता होणे असा अर्थ होत नाही किंवा आपण कोणाच्या अधिपत्याखाली जातोय हि भूमिका खूप चुकीची आहे . राजकीय भूमिका घेण्यासाठी कुण्या पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता होणेही गरजेचे नाही पण स्वतःची राजकीय भूमिका घेणे सर्वात जास्त महत्वाचे आहे . मतदानाचा मिळालेला अधिकार हा फक्त सुट्टीचा दिवस साजरा करणे आणि मौजमजा करण्यासाठी सहलीला जाणे असेल तर तो लोकशाहीस मारक ठरण्यासारख आहे . त्यामुळेच कि काय नेहमी मतदानाच प्रमाण हे सरासरी ५० % च्या आत असते . याला एकाच कारण म्हणजे राजकीय अस्पृश्यता पाळणे आणि " माझा तो भाग नव्हे " हे भूमिका घेणे . कदाचित यामुळेच प्रस्थापित मनुवादी पक्ष या देशातील बहुजन समाजाला आपल्या प्रसार माध्यमातून संमोहित करून एका निरपेक्ष विचारापासून आणि भूमिकेपासून दूर घेऊन जातो आणि बहुजन आंबेडकरी समाज याला नेहमी बळी पडतो .

आज आम्ही व इतर तरुण वर्ग राजकारणाची स्पष्ट भूमिका घेत आहोत हि नक्कीच बदलाची आणि परिवर्तनाची नांदी असेल दुसऱ्या पिढीने जी संभ्रमतेची भूमिका घेतली त्यामुळेच कि काय आंबेडकर चळवळ दिशाहीन झालेली आहे . गटा तटाच्या खाईत रिपब्लिकन चळवळ वाटली गेली किंवा स्वार्थी लोकांच्या सूळसुळाटामुळे विखुरली जरी गेली तरी संभ्रमित भूमिका घेणारी दुसरी पिढी यालाही तितकीच जबाबदार आहे . स्पष्ट राजकीय भूमिका न घेतल्यामुळे किंवा आपला आणि परका कोण हे न कळाल्यामुळे म्हणा समाज नेहमीच कॉंग्रेस सारख्या मनुवादी पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आहे त्याला तोही तितकाच जबाबदार आहे . उदाहरण द्यायचं झाल तर महाराष्ट्रात कोणत्याही भागाच उदाहरण घ्यायचं झाल तर आंबेडकरी समाज लाखाच्या घरात असतो तिथे जरी रिपब्लिकन गट तट पक्ष ५ जरी असले तरी कोणत्याही एका पक्षाला मतदान होत का ? जरी रिपब्लिकन चळवळ विखुरलेली असली तरी १ लाखाच मतदान असलेला उदाहरणादाखल एक भाग घेतला तर तिथे ५ - १० गट जरी असले तिथे हेच एक लाख २० -२० हजार स्वरुपात आंबेडकरी पक्षांना जातात का ? तर याचे उत्तर आजीबात नाही तिथे एकाच आंबेडकरी पक्षालाही समाजाचे एकगठ्ठा मते मिळतही नाही आणि ती divide होतही नाही तिथे ५ ते १० हजाराच्या आसपास मते मिळतात तेही एकूण समाजाच्या एकूण मताच्या ६ ते ८ % च्या आसपास इतर समाज मते देईल तो भाग तर दुरची गोष्ट आहे . मग उरलेली मते कुठे जातात तर ती कॉंग्रेस किंवा तत्सम पक्षांना जातात याच कारण हेच कि राजकीय भूमिका विचारसरणीचा अभाव ,समाजाच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन निवडणुकीकाळात मोठी वाटणारी रक्कम पण जीवनाचा काहीही बदल न होणारी रक्कम दिली जाते . ६० वर्षापासून हाच प्रकार चालत आलेला आहे , आर्थिक परिस्थितीने मजबूर असलेल्या समाजाच काही क्षणासाठी समजून घेऊ शकतो पण थोडेफार आर्थिक स्थैर्य आलेला समाजही अशा गोष्टीना बळी पडताना आम्ही स्वतः बघितलेलं आहे ,हि खरच खूप मोठी शोकांतिका आहे , आंबेडकरी चळवळी साठी आणि राजकीय परिवर्तनासाठी ह्या प्रवृत्ती समाजातून काढून टाकणे महत्वाचे आहे .

आज आम्ही भारिप बहुजन महासंघ पक्षात अनेक उच्चशिक्षित तरुण येत आहेत स्पष्ट भूमिका घेत आहेत ते केवळ राजकारण करण्यासाठी नव्हे किंवा कोणाला निवडणुकीमध्ये उभेही राहायचे नाही आम्हाला केवळ आता आपल्या आंबेडकरी बहुजन लोकांना सत्तेत बसवायचं आहे हा संकल्प उराशी बांधलेला आहे हव तर आमचा हा २०१४ साठी एक contract समजला तरी चालेल पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांच्या विचारसरणीचा पक्ष म्हणून आणि आंबेडकरी प्रतिनिधी सत्तेत पाठवणे हेच आमचे आता भारिप च्या platform वरून स्वप्न आहे . इतरही पक्षात कोणी तरुण वर्ग जात असेल तर तीही एक स्पष्ट भूमिका आहे ,निदान या पिढीची तरी आणि त्याचे स्वागत केलेच पाहिजे याशिवाय आता बदल आणि परिवर्तन होणे शक्य नाही . मी तर म्हणेल आजचा तरुण जेव्हढा अभ्यासक झालेला आहे जो योग्य आणि अयोग्य हा फरक करू शकतो हा आंबेडकर चळवळीसाठी मी नेहमी म्हणतो कि हा सुवर्णकाळ आहे . समाजातील जशी संभ्रमित भूमिका जबाबदार होती तशी जेष्ठ आंबेडकरी साहित्यातील मंडळीहि तितकीच जबाबदार होती . एक कोणतीही राजकीय दिशा त्यांनी दाखवली नाही कि या सर्व गटातटाच्या झुंडीतून हाच तुमचा योग्य नेता आहे आणि सर्व समाजाचे एकरूपाने याच्या मागे राहावे मग तो नेता कोणीही असो अशी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे स्वतःच्या परिघाबाहेर न गेल्यामुळे तो सीमित राहिला . आज महाराष्ट्रात थोडस का होईना जे यश भारिप ने मिळवल आहे आणि मिळवत आहे आणि ते इतरांच्या तुलनेत आणि मनुवादी प्रस्थापित पक्षांच्या गर्तेत मोठ आहे . भारिप च मुठीभर यश काढून टाकल तर महाराष्ट्रात आंबेडकरी विचारसरणीच्या इतर पक्षांचही यश शून्य आहे हे विसरता येणार नाही . म्हणून स्पष्ट राजकीय भूमिका २०१४ समोर ठेवून येणाऱ्या आंबेडकरी तरुणाईच स्वागत सर्वांनी करायला हव .जर राजकीय बदलात शामिल होणाऱ्या तरुणाई च आपल्याच समविचारी लोकांनी खच्चीकरण केल तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही . कोणी भारिपचा हाती झेंडा घेतला म्हणजे तो परका ठरत नाही किंवा तो अस्पृश्य होत नाही फक्त मानसिकता बदला एक स्पष्ट राजकीय भूमिका घ्या , आम्ही हेही म्हणत नाही कि आम्हीच सर्वोत्तम आमचेच नेतृत्व माना अस आम्ही म्हणत नाही पण परिवर्तनाच्या या लढाईला निश्चित साथ द्या .

३ कोटी असलेल्या समाजामध्ये ५० % पेक्षा जास्त असणाऱ्या तरुणांनी एक स्पष्ट भूमिका घेऊन ३ कोटी लोक ८० ते ९० लोकप्रतिनिधी सत्तेत पाठवू शकतात हे लक्षात ठेवा .

" भिक नको सत्तेची .......सत्ता हवी हक्काची "

!!! जयभीम ..............नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव

Saturday, 14 September 2013

!!! मळाचा गणपती आणि मळलेले लोक !!!

हिंदू पुराण ग्रंथ यांचा आधार घेतला तर अस लक्षात येत कि शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वतीने अप्रकृतिकपणे पुत्र निर्माण केलेत तर दुसऱ्या पुराणात हे सांगतात कि अनेक देव देवता शिव म्हणजेच महादेवाला विनंती करू लागले कि आमच्या रक्षणासाठी आपण आपला पुत्र निर्माण करावा . पुढील गोष्टीचे वर्णन करताना मला अतिशय लज्जित वाटते पण लिहिणाऱ्याने त्याची तमा बाळगली नाही तर आपलेही कर्तव्य आहे कि यावर विवेकबुद्धीने याचे खंडन करणे आवश्यक आहे . म्हणून शिवपुराणामध्ये लिहिल्यानुसार पार्वती आणि शिव दोघे जंगलामध्ये फिरायला जातात तेव्हा पार्वतीला हत्ती आणि हत्तीणीचा प्रणय चाललेला दिसतो त्यानंतर पार्वतीहि शिवाकडे तशी इच्छा व्यक्त करते ,आणि अश्लीलपणाचा कळस सुरु होतो १००० वर्षे हा शिवाचा आणि पार्वतीचा प्रणय चालतो . त्यानंतर चा अश्लीलपणा मी अधिक सांगू शकत नाही त्यासाठी शिवपुराण आणि अन्य पुराणांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल . माझ सांगण्याच तात्पर्य हेच आहे कि कोणी शिवाचा पुत्र अर्थात गणेश म्हनजेच गणपती चा जन्म काही ग्रंथ प्राकृतिक आणि काही अप्रकृतिक सांगतात . यावरून हे कल्पोकल्पित आणि अश्लीलतेचा कळस गाठनारे पुराणके आहेत . अजूनही इथला बहुजन समाज हिंदू ब्राह्मणी गुलामगिरीत आधुनिक पद्धतीने जगत आहे .

मनुस्मृतीनुसार स्त्रियांनाही 'शुद्र' मानलेल आहे . म्हणून शिवपुराणात असा उल्लेख आहे कि पार्वती एकदा अंघोळीला गेली असता तिने शरीराच्या मळाणे गणेश अर्थात गणपती तयार केला . यावरून अस आपण तार्किकपणे पाहल तर काही गोष्टी निर्माण होतात कि पार्वतीने मळाने गणपती बनविला तर तिच्या शरीरावर किती मळ असेल ? म्हणजे तिने किती महिन्यापासून किवा वर्षापासून अंघोळ केलेली नसेल म्हणून तिच्या अंगावर एव्हढा मळ साचला असेल ? किती हि एखाद्या स्त्रीची बदनामी इथल्या ब्राह्मणी परंपरेने काल्पनिक गोष्टी मध्ये हि पार्वतीची अर्थात स्त्रीची बदनामीच केलेली आहे . असा हा गणपती जन्माची अख्यायिका आहे .

परत दुसरा प्रसंग एकदा परत पार्वती अंघोळीला गेली असता बाहेरून कोणी आत मध्ये येऊ नये म्हणून गणेश अर्थात गणपतीला पहारा करण्यास पार्वतिने ठेवले . ब्राह्मण ग्रंथकार पुराणकार यांची पार्वतीच्या अंघोळीची रुची वारंवार पुराणामधून दाखविलेली आहे यावरूनच त्यांची नैतिकता कळून येते. ठरल्या प्रमाणे गणपती बाहेर उभा राहतो परंतु तितक्यात महादेव/शंकराचे आगमन होते . गणपती शंकराला आत जाण्यापासून रोखतो तर महादेव गणपतीचे शीर / डोके छाटून टाकतो . इथवर सर्वांनी ऐकलेलं आहे पण गुलामगिरीत जगणाऱ्या बहुजन ओबीसी ला आपल्या डोक्यात 1400 cc (cranial capacity ) अर्थात बुद्ध्यांक असलेला साधा मेंदू नसावा याचे आजच्या आधुनिक युगात मोठ आश्चर्य वाटत . त्या निमित्ताने काही तार्किक प्रश्न आपल्या डोक्याला आपण का विचारू नयेत ?जसे अगोदर पुराणकाराने सांगितल्याप्रमाणे तिच्या अंगावर एव्हढा मळ होता कि तिने गणपती बनविला म्हणजेच ती अंघोळ करत नसेल म्हणजे तिला अंघोळीला का जावे लागले बर ? गेली तर गेली पण तिला त्यावेळी बाथरूम असेल ना मग त्यालाही दरवाजा असेल तर तिथे गणपतीला ठेवण्याची गरज काय होती ? बर गणपतीला बाहेर ठेवलं तर ठेवलं पण शंकराला अस कोणत अर्जंट काम किवा मिटिंग होती कि direct पार्वती अंघोळ करीत असताना थोडा वेळ थांबताहि येत नव्हत ? यासाठी गणपतीचं डोक का त्याला उडवाव लागल , गणपती हा जर शंकराचा मुलगा होता तर स्वतःच्या मुलाला तो ओळखत नव्हता का ? किवा तो अंतर्यामी परमेश्वर आहे जगातील प्रत्येक जीवाला तो आपल्या अंतरज्ञानाने ओळखत असेल तर स्वतःच्याच मुलाला का ओळखू शकला नाही ? असे अनेक प्रश्न बुद्धीप्रामान्यवाद्यांना पडतात आणि ते शत प्रतिशत खरही आहे ह्या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत .

बर गणपतीचे डोके उडविल्यानंतर पार्वती अंघोळीवरून बाहेर येते तर तिला हे चित्र दिसते आणि महादेवाला ती सुनावते आणि हा आपला मुलगा आहे असे सांगते यावरून हेच सिद्ध होते कि शंकर हा मूर्ख असायला हवा कारण स्वतःच्या पत्नीस फक्त भेटण्याच्या कारणाने स्वतःच्या मुलाची हत्या करतो आणि त्याला माहितही नसते कि हा आपला मुलगा आहे म्हणून , पण पुराणकार पुढे सांगतात कि तेव्हा समोरून एक हत्ती चाललेला असतो तेव्हा त्याचे डोके कलम करून गणपतीस लावतो अर्थात गणेशाचे गजमुख होऊन जाते . इथेही जास्त डोके न लावता बहुजन गुलाम लोकांनी विचार करायला हवा कि जर शंकर महादेव हा सर्वशक्तिमान आहे तर त्यांला हत्तीचे डोकेच का दिसले ? जर तो खरा शक्तिमान असेल तर त्याने हत्तीऐवजी मनुष्याचे डोके का लावले नाही ? आणि कितीही लहान हत्ती जरी घेतला तर त्याचे डोके मनुष्याच्या डोके नसलेल्या धडावर match च होत नाही आणि एव्हढे वजनदार डोके मानवी शरीर पेलू शकत नाही . काही दिवसापूर्वी मी माझ्या एका मित्राच्या हॉस्पिटल मध्ये गेलो असता तिथे मला गणपतीचे मोठे चित्र लावलेले दिसले . मी अभियांत्रिकी क्षेत्रात जरी असलो तर माझी सर्वात अगोदरची पसंती मेडिकल फिल्ड होती म्हणून मला बरीच माहिती आहे, त्यामुळे मी माझ्या मित्राशी याबद्दल इंग्रजीमधून संवाद साधला आणि त्याला विचारलं कि मला एका मनुष्याला हत्तीचे डोके लावायचे आहे तर अशी सर्जरी होऊ शकेल काय ? तर तो हसून मला म्हणाला तू गंमत करतोस का ? तुलाही माहित आहे अस शक्य नाही . मग मी त्याला म्हणालो जर मनुष्याचे डोके धडापासून वेगळे केले तर मेंदूचा संपर्क शरीराशी तुटून मनुष्य लगेच मरतो आणि इतर प्राणी किंवा मनुष्याचेही डोके आपण लावू शकत नाही . तो अगदी बरोबर आहे म्हणाला ,यावर मी त्याला प्रश्न केला कि हा गणपतीचा लावलेला फोटो याच ऑपरेशन शंकराने कस केल असेल ? जर तू गणपतीचा फोटो लावत अशील तर स्वाभाविक इथे येणाऱ्या माझ्यासारख्या पुरोगामी विचारांच्या लोकांची समजूत होईल कि तू एक डॉक्टर म्हणून अशाप्रकारच्या सर्जरीच समर्थन करत आहे आणि तुला हे मेडीकली आणि सायंटिफिकली आम्हाला प्रुव्ह कराव लागेल . त्यानंतर तो अतिशय लाजीरवाणा झाला . तुम्ही बहुजन मंडळी अजूनही धार्मिक गुलामगिरीत आहात. आज तुम्ही डॉक्टर आहात ते गणपती ,महादेव यांनी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही दिला ,तुम्ही शिकले केवळ महामानव डॉ . बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे! काही दिवसांनी मला त्याने फोन करून आग्रहाने चहासाठी बोलवले पण मला परत जावे वाटेना पण तिथे गेलो तर कळाल गणपतीचा फोटो त्याने त्याच दिवशी काढून त्याऐवजी बाबासाहेब ,महात्मा फुले आणि इतर महापुरुषाचे फोटो मला पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे त्याच्या विचारातही फुले ,शाहू ,आंबेडकर दिसले सांगायचं तात्पर्य एव्हढंच कि आंबेडकरी विचारामध्ये जग बदल्याची ताकद आहे फक्त संयम आणि अभ्यासाची जोड ठेवली तर सर्व शक्य आहे .

मागील काही लेखात मी सांगितले आहे कि हि सर्व पुराण, धर्मग्रंथ फक्त बौद्ध धर्मास टक्कर देण्यासाठी लिहिली गेली आहेत . जिथे हत्तीला बौद्ध धम्मात महत्वाचे स्थान आहे . तथागताच्या जन्मापासून महानिर्वानापर्यंत अनेक वेळा हत्तीचा उल्लेख येतो . तिथे ब्राह्मण पुराणकार शंकराकडून हत्तीच्या डोक्याचे शिरच्छेद करतात याचा दुसरा तिसरा अर्थ काही नव्हे तर हा शिरच्छेद म्हणजे बौद्ध धम्माचा पाडाव करणे आणि ब्राह्मणी व्यवस्था लादणे होय . मागे सांगितल्या प्रमाणे

'पूजयामि मुनिन्दस्स सिरीपादसरोरुहे '

म्हणजे येथे सिरीपाद म्हणजे 'श्रीपाद '. श्री म्हणजे गुणसंपन्न ,विद्यासंपन्न ,सर्वज्ञ असे जे बुद्ध म्हणजे मुनींचे जे इंद्र (प्रमुख ) असे जे आहेत . ज्यांचे चरण हे कमाळाप्रमाणे आहेत , त्यांची पूजा करतो . श्रीपाद हे बुद्धाचे नाव आहे . पालीमध्ये ' गणपती ' या शब्दाचा अर्थ गण म्हणजे भिक्षुंचा गण अथवा संघ व पती म्हणजे प्रमुख हे भगवान बुद्धाला उद्देशून म्हटले आहे पण यांनी मळाचा आणि हत्तीच्या डोक्याचा गणपती बनविलेला आहे .

अशाप्रकारे ब्राम्हणी परंपरेने बौद्ध संस्कृतीचे जे विकृतीकरण केलेले आहे . मुळात पुराण, वेद लिहिणाऱ्या ब्राह्मणांनी कल्पोकल्पित कथा रचून इथल्या बहुजन समाजाला वेड लावलेलं आहे त्याचाच कित्ता गिरवत भटमान्य टिळकाने गणेशोत्सव महात्मा फुल्यांनी सुरु केलेल्या शिवाजी महाराज जयंती ला बंद करण्यासाठी आणि ब्राह्मणी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सुरु केला होता . म्हणून आज बहुजन समाजासोबत काही फक्त नावाला आंबेडकरी असलेले लोक हिंदू ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत सर्वात प्रथम अशा लोकांना बहिष्कृत करायला हव त्यामुळे आपल्या चळवळीची गती आपण आणखी मजबूत करू शकू .

!!! जय भीम .................... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव

Monday, 9 September 2013

प्रकाश आंबेडकर - 4

एक डोळस संपूर्ण आभ्यासून पहले असता बाळासाहेबांची भूमिका हि आंबडेकरी चळवळीला अनुसरून राहिलेली आहे याचा अभ्यास सर्वांनी करावा अगदी रिपब्लिकन ऐक्यापासून ते आजवर , मुळात रिपब्लिकन ऐक्य आणि ते तुटण आजवर चालत आलेली रिपब्लिकन चळवळीचा अभ्यास प्रत्येकाने करून प्रत्येक नेत्याची चाचपणी केल्यास प्रकाश आंबेडकर त्यात पास होतात हि वस्तुस्थिती आहे . इतर नेते कितीवेळा एकत्र आलेत आणि प्रकाश आंबेडकर नाहीत मग काय झाल याचा एकाच अर्थ आहे कि इतर एकत्र येउन काहीच होऊ नाही कारण जी महाराष्ट्रात मोठी ताकद आणि इतर समाजाकडूनही त्यांना पाठींबा आहे हा सर्वात मोठा प्लस point आहे .ऐक्य झाले तेव्हा काय बदल होतो तो बाळासाहेबांनी पक्षाचा कुशल प्रशासक बनून पक्षाला राजकीय मान्यतेपर्यंत पोहचवल होत हा इतिहास आहे . ऐक्यानन्तर युती करायला आलेल्या शरद पवारालाही २ तास दाराजवळ वाट पाहायला लावून विचारांती युती करून त्याचे फलित म्हणून ४ खासदार निवडून आले होते हा इतिहास आहे पण आपली दुकानदारी चालत नाही हा माणूस पक्ष वाढवतो पक्षाला ओबीसी व इतर समाज जोडत आहे पक्षाची आणि चळवळीची खरेदी विक्री आपल्याला करता येणार नाही म्हणून हा माणूस अडसर होतो म्हणून गवई नि त्या काळात पक्षातून हकालपट्टी करून ऐक्य तोडण्यास मोठा रोल प्ले केलेला होता आणि त्याला रामदास आठवले नि सहमती दाखवली होती हेही तितकच खर आहे पुराव्यासहित पहावयाचे असल्यास संजय मून यांनी त्यावेळेला "रिपब्लिकन ऐक्याचे मारेकरी " हे पुस्तक ऐक्याचे ढोल वाजवणार्यानी जरूर वाचावे आणि ऐक्यासामधी तथ्य जाणून आणि नीट अभ्यास करून बोलायला हव . ज्यांच्यासोबत पुन्हा ऐक्य करावयाचे त्यांचे अस्तित्व आणि चळवळीला विकण्याचे काम आणि मागील अनुभव पाहता बाळासाहेब त्यांच्यासोबत जात नाही हा त्यांचा "अहंकार " नाही तर तो त्यांचा स्वाभिमान आहे आजोबांच्या विचाराना नातू तरी फाटा देऊ शकत नाही.

राहला प्रश्न अकोल्याचा तर बहुजनांना सोबत घेऊन सत्ता कशी मिळवावी हे अकोला आणि किनवट ने बहुजनांना दाखवून दिले नुसते ते अकोल्यात नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात राबत असतात आणि भारिप म्हणजेच भारतीय रिपब्लिकन पक्ष याला बहुजन महासंघाची जोड लावलेली आहे त्यामुळे इतरासारखे रिपब्लिकन पक्ष नावागोदर किवा नंतर कंसात लिहिलेलं आढळत नाही . नागपुरात नगरसेवक ,अमरावती ,औरंगाबाद ,परभणी , नांदेड ,बुलढाणा ,बीड अशा अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केलेली आहे त्यात १ महापौर ,३ आमदार ,जि . प . अध्यक्ष , कुणी नगर सेवक ,कुणी जि . प . सदस्य ,कुणी प . स . सदस्य ,अनेक पंचायत समित्या आणि नगरपालिका ताब्यात आहे तेही स्वबळावर मग बाळासाहेब हि जी स्वाभिमानाची चळवळ एकट्याने चालवत आहे तर मग ते खूप चुकत आहेत ? मुंबई मध्ये आठवले नि युती करून १ नगर सेवक आणला तिथे बाळासाहेबांनी स्वबळावर १ नगरसेवक निवडून आणला . मग आपल्या सर्वांची हि जबाबदारी नाही का कि इतर नेत्याची हि चाचपणी करायला हवी इतर नेत्याची राजकीय ताकद काय कि त्यांना नेते म्हणून विनाकारण स्वीकाराव ?

परत एकदा इतिहासात डोकावलं तर शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेनी गाठली होती ,मुंबई मध्ये दहशतीच वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने केली होती ,त्याच काळात मागासवर्गीयावरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी दलित panther ची स्थापना झाली , शिवसेनेने मद्राश्यांच्या विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली,त्यानंतर ठाकरेनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले. या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झालीत. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाई ची हत्त्या घडवून आणली . इथवर ते थांबले नाही १९७४ ला दलित panther नेता भागवत जाधव यांचा खून केला आणि आंबेडकरी समाजात प्रचंड दहशत निर्माण केली त्यानंतरही विदर्भात दलितावर हल्ले सुरूच ठेवले , कधी दक्षिण भारतीय ,कधी शीख , कधी मुस्लिम तर आंबेडकरी जनतेवर या नराधमानी हल्ले सुरूच ठेवले हा सगळ्या माजामागे कॉंग्रेस होती आणि शरद पवारांचा वरदहस्त होता म्हणून शिवसेनेने गुंडगिरी निर्माण केली , त्यानंतर “Riddles in Hinduism”. हे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये यात हिंदू देव देवतांचा अपमान आहे हि भूमिका तेव्हा बाळ ठाकरेनी घेतली होती . त्या वेळी जवळपास ४ महिने वातावरण आंबेडकरी जनता विरुद्ध शिवसेना अस राहील होत , जानेवारी १९८८ ला निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चाने लोकांना चिथावणी देऊन जमवल " ज्याच खर रक्त हिंदूच असेल त्यांनी या मोर्चात याव" , या मोर्चात बाबासाहेबावर अभद्र शब्दात बोलल्या गेल , त्यात आनंद दिघे ह्या शिवसेनेच्या नेत्यापेक्षा या नराधमाने अकलेचे तारे तोडून बाबासाहेबांच्या आई माता भीमाबाई बद्दल संशयी भाषा वापरून सकपाळ ते आंबेडकर कसे झाले अशा प्रकारचे वक्त्यव्ये करून आंबेडकरी समजला चिथावले . याचा राग म्हणून ५ फेब्रुवारी १९८८ ला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृवात मंत्रालयावर मोर्चा काढला आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यातच हुतात्मा स्मारकाजवळ आपल्या आंबेडकरी तरुणाकडून नासधूस झाली , दुसऱ्या दिवशी आताचे नकली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरेच्या आदेशाने चबुतरा गोमुत्राने धार्मिक विधी करून शुद्ध करून मनुवादी विचारसरणीचा परिचय करून दिला . पुढे मंडल आयोगाचा लढा सुरु झाला प्रकाश आंबेडकरानी व्ही. पी . सिंगच्या मदतीने लढून यशस्वी केला ,त्याच काळात छगन भुजबळ ला स्वताची जाणीव होऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला .

इथवरच बाळ ठाकरे आणि आणि त्याच्या सेनेने थांबले नाहीत तर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध केला , मराठा आणि दलित वाद निर्माण करून १४ वर्षे दलितावर अत्याचार सुरु ठेवला , या काळात बाबासाहेबावर चिखलफेक करण्याचे काम बाळ ठाकरे ने केले , 'बाबासाहेब निजामाचे हस्तक' ,'ज्याच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ' , महारानी आमच्या नोकऱ्या पळवल्या अशाप्रकारची विधाने केली तितकीच चिथावणीला साथ राज ठाकरे ने दिली. मराठवाड्यात आंबेडकरी समाजावर हल्ले करण्याचे आदेश राज ठाकरे देत होता , हे सध्या मनसे मध्ये काम करत असलेल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे , अखेर नामांतर न होता नामविस्तार झाला तत्कालीन शरद पवार सरकारचे असलेले मंत्री रामदास आठवले यांनी समझोता करून या वादावर पडता टाकण्यास मदद केली परंतु नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असे नामकरण केले पण मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेबांचे नाव लावून नामविस्तार केला . या लढ्यात पोचीराम कांबळे ,गौतम वाघमारे यांना हुतात्म आले परत यांचीच टिंगल म्हणून बाळ ठाकरे ने गौतम वाघमारे ना बेवडा संबोधून आणखी ठिणगी टाकली अनेक लोकांचे प्राण गेले घरे गेली , या सर्वाना कारणीभूत बाळ ठाकरे आणि कॉंग्रेस जबाबदार होती . अलीकडेच बाळ ठाकरे ने मरण्यापूर्वी एका tv मुलाखतीत एक मोठा खुलासा केला कदाचित सर्व आंबेडकरी लोकांना माहित नसेल पण मराठवाडा विद्यापीठाची settlement करण्यासाठी रा . सु . गवई ना जेवण्यासाठी बोलावलं आणि विद्यापीठाचे नामांतर न करता हा नामविस्तार करू त्यावर जेवताना रा . सु . गवई लगेच तयार झाले पुढे काय झाल आपल्यालाच माहिती आहे आणि मी कधी नामांतराला विरोध नाहीच केला हि भूमिका बाळ ठाकरे ने मांडली . या वरून काय सिद्ध होते ,आंबेडकरी नेत्याची हि लाचारी कि स्वाभिमानी वृत्ती यावर समाजच अधिक विचार करू शकतो या निमित्ताने सांगावे वाटते .

वर थोडक्यात उल्लेखलेल्या बाळ ठाकरे आणि त्यांच्या सेनेने केलेली दुष्कृत्ये आंबेडकरी समाजातील लहान मुल पण समर्थन करणार नाही पण आपले माजी panthar रामदास आठवले ,बाळ ठाकरेंना जावून मिळाले , ते सर्व विसरू शकतील पण जातीयवादी बाळ ठाकरे आणि शिवसेनेला हा आंबेडकरी समाज माफ नाही करू शकणार . रामदास आठवले एव्हड्यावर च नाही थांबले तर बाल ठाकरे च्या निधनानंतर अंतयात्रेमध्ये बाळ ठाकरेच्या शवासोबत ट्रक मध्ये चढलेले दिसले राज ठाकरे एकीकडे पायी चालताना दिसले तर आठवले साहेब ट्रकवर चढून आंबेडकरी वारसदार कि ठाकरे वारसदार हे आम्हा आंबेडकरी जनतेला कळाले नाही ,नामदेव ढसाळ तर आम्ही अगोदरच बाळ ठाकरेच्या चरणी नतमस्तक होताना पाहिलेले आहेत . या अंतविधीला आठवले सोबत , बाळ ठाकरेंना आव्हान देणारे आणि शिव्या देणारे झुंजार नेते जोगेंद्र कवाडे सर सह ,रा . सु . गवई चे चिरंजीव राजेंद्र गवई , महातेकर , अर्जुन डांगळे सह अनेक चळवळीला विसरलेले नेते दिसले . पण तिथे एक व्यक्ती missing होते ते म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर .

कोणी म्हणेल कि दुश्मनाच्या अंतविधीला उपस्थित रहाव लागत पण आमच्या बापाच्याही बाप असलेले बाबासाहेब आणि आंबेडकरी जनतेवर जुलूम आणि हत्या करणाऱ्या बाळ ठाकरे आणि सेनेचा आदर आणि नावाला आंबेडकरी असलेल्या खोट्या शेजाऱ्याला असेल परंतु सख्ख्या बापाच्या रक्ताच्या पोराला बापाच्या अपमानाबद्दल बाळ ठाकरे सारख्या व्यक्ती बद्दल कधीच आदर असू शकत नाही हे बाळासाहेब आंबेडकरांनी अनुपस्थित राहून स्वाभिमानी भीमबाण्याने दाखवून दिले . ………………… जयभीम
(क्रमश : पुढील अंतिम भाग -५ )

प्रकाश आंबेडकर - 3

आपल्या कुटुंबावर होणाऱ्या सततच्या आरोपामुळे बाळासाहेब कधीच डगमगले नाहीत ,बाबासाहेबानंतर भैय्यासाहेब , मीराताई आंबेडकर यांनी समाजासाठी धम्मकार्यात वाहून दिले , बाबासाहेबांच्या महापरीनीर्वाणानंतर बौद्धांची संख्या ०. ७ वरून ५ -६ टक्क्यावर आली याचे श्रेय भैय्यासाहेब नंतर मीराताईना जाते हे नक्की भैय्यासाहेबांच्या निधनानंतर मीराताईनी यशस्वीपणे धम्मकार्य सुरु ठेवून उतारवयातही संपूर्ण भारतात अविश्रांत धम्मासाठी फिरतात हे नवल आहे आणि तितकीच मोलाची साथ बाळासाहेब आंबेडकर देत आहेत याच समाजान जाण ठेवण गरजेचे आहे .

बाळासाहेबांची भूमिका नेहमी बहुजन वर्गाला ग्राह्य धरूनच राहिलेली आहे मंडल आयोगापासून सुरु झालेला लढा ओबीसी साठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला , स्वताला ओबीसी म्हणवणारे नेते छगन भूजबळ , गोपीनाथ मुंडे आपापल्या पक्ष श्रेष्टीच्या भीतीमुळे सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यास घाबरले पण तिथेही बाळासाहेबांनी अंगावर कोट चढवून ओबीसींना न्याय हक्क मिळवून दिला , स्वता चळवळीला स्वताचे नेतृत्व करून त्याचे श्रेय किवा कुठली लालसा ठेवली नाही . राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत तोफ डागली , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच १५ ऑगस्ट अर्थात स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत नाहीत म्हणून कार्यकर्त्यासह त्यांच्या मुख्यालयात जाऊन तिरंगा झेंडा फडकविला त्याचे स्पष्टीकरण प्रमोद महाजनांना द्यावे लागले . दरम्यानच्या काळात ९५ ला उत्तर प्रदेशात निवडणुकीमध्ये भारिप ने आपले बरेच उमेदवार उभे केले होते आणि विशेष बाब म्हणजे यातील बऱ्याच उमेदवारांना २० हजार पेक्षा जास्त मते मिळाली होती पण मानुवाद्याना त्याचा फायदा होईल आणि बसपा चे नुकसान होईल म्हणून चळवळीची बांधिलकी म्हणून तिकडचे पक्ष कार्य बंद केले परंतु इकडील बसपाचे लोक हे विसरून बाळासाहेबावर बदनाम करण्याचे काम करतात .

२ ० ०० च्या काळात भारिप ने स्वबळावर सत्ता मिळविण्याचे कार्य केलेले आहे ,काहीना मंत्री मग ते कोळी समाजाचे दशरथ भांडे , रामदास बोडखे यांना केले , भारिप चे ३ आमदार , खणन विकास महामंडळाचे अध्यक्ष नागपूरचे रणजीत मेश्राम यांना केले परंतु जातीवादी विलासराव देशमुख यांनी शरद पवारांचा पाढा गिरवत आंबेडकरी चळवळ दाबण्याचे काम केले सरकार अल्पमतात आले असताना या आमदार आणि मंत्र्यांना बंगलोर ला पळवून नेले , भारिप चे खच्चीकरण इथल्या मनुवाद्यांनी केली , तरीही काही प्रमाणात का होईना भारिप ने स्वाभिमानीपणे सत्ता हातामध्ये टिकवली , कासार समाजाच्या स्त्रीला महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बनविले , मनसे सारखा पक्ष मिडिया कडून महानगरपालिकेला प्रमोट केला गेला तिथे एका बौद्ध स्त्री ने अकोल्याचे महापौर व्हाव हे दाबल्या गेल . बाळासाहेबांनी स्वतः लोभापासून दूर राहून अनेकांना मोठ केल पण अनेक जन बेईमान झाल्याचे दिसतात , व्यक्तीवादाला बाळासाहेबांनी कधीच महत्व दिल नाही समाजासाठी तडजोड केली नाही , ते म्हणतात " लोक येतील आणि जातील लोकांपेक्षा चळवळ टिकणे खूप महत्वाच आहे ". जे गेले त्याचं अस्तित्वच संपल हे आपल्या समोरील उदाहरण आहे .

बाळासाहेबांनी ज्यांना मोठ केल त्यामध्ये नीलमताई गोऱ्हे ,चंद्रकांत हंडोरे , मखराम पवार ,भीमराव केराम ,रामदास बोडखे ,भांडे ,सूर्यवंशी , हनुमंत उपरे असे कितीतरी उदाहरणे देता येतील पण व्यक्तीपेक्षा आंबेडकरी चळवळ महत्वाची आहे व्यक्ती येतील आणि जातील पण चळवळ आणि समाजकारण महत्वाच आहे . बाळासाहेबांनी अनेक महत्वाची प्रश्नांना हात घालून लढा दिलेला आहे यात Enron चा प्रश्न असो कि वेगळ्या विदर्भाचा प्रश्न असो कि विदर्भातील कापसाचा प्रश्न ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबतीतही पंतप्रधान आणि सोनिया गांधीनाही कोर्टात खेचणारे एकमेव नेते , डाऊ कंपनीचा लढा आसो वा लावासा प्रश्न कि मुस्लीमासाठी सच्चर आयोग असो विविध प्रश्न हाताळून योग्य लढा दिला .
समाजाने स्वताच चळवळीचे नेतृत्व करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करून बाळासाहेबांच्या मागे उभे राहावे अन्यथा ६० वर्षापासून चाललेली परिस्थिती कायम ठेवून इथल्या मनुवाद्याचे गुलाम बनून राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . प्रत्येक नेत्याची मीमांसा करून एकच नेता आणि पक्ष स्वीकारून आपला स्वाभिमान जपावा हे या निमित्ताने सांगावयास वाटते …………………… जयभीम (क्रमश 

प्रकाश आंबेडकर - 2

व्ही .पि . सिंहानी दिलेली मंत्रीपदाची ऑफर नाकारून आंबेडकरी हिताच्याच गोष्टी कि ज्यात मंडल आयोगानुसार नवबौद्ध आणि बौद्धांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश , बाबासाहेबांचे संसदेमध्ये तैलचित्र , भारतरत्न , टपालाच्या तिकिटावर आणि त्या नंतर बाबासाहेबांना नोटेवर पण आणायचा प्रयत्न होता परंतु भाजपने मंडल विरुद्ध कमंडल केल्यामुळे सरकारचा पाठींबा काढला , त्यानंतर राजीव गांधीचे सरकार आले राजीव गांधीनीही बाळासाहेब आंबेडकराना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले ,परंतु कॉंग्रेस च्या या दाव्यापुढे बाळासाहेब नमले नाहीत यामुळे आंबेडकरी चळवळ दाबली जाण्याची भीती होती ,त्यामुळे समाजहिताच्या गोष्टी लक्षात घेऊन मंत्रीपदावर २ वेळा लाथ मारनाराच समाजाचा खरा नायक होऊ शकतो आणि असायलाच हवा .इतर नेते समाजाच्या प्रश्नापेक्षा ,कोणाला धम्म न स्वीकारता जातीपातीच राजकारण करून पंतप्रधान व्हायचं आहे कोणाला एकही आमदार न आणता उपमुख्यमंत्री व्हायचं आहे ....................... कोणी पंतप्रधान होऊन जर विशिष्ट धर्माने भारताला त्या धर्माचे अनुयाही अधिकारशाहीने जर झाले असते तर मनमोहन सिंगानीही देश शिखमय केला असता .

प्रकाश आंबेडकरांचे वक्तृत्व आणि विद्वत्ता अतिशय उच्च दर्जाची राहिलेली आहे , बाबासाहेबांच्या आवाजांच्या जुन्या रेकॉर्ड्स चेक केल्यास आवाजातील साम्य आढळून येते, अनुवांशिक गुणांचे हे द्योतक म्हणावे लागेल तशाच दर्जाच इंग्रजी बोलण्यात बाळासाहेब सक्षम आहेत याचा अनेकवेळा प्रत्यय संसदेमध्ये ,दूरदर्शन आणि भारतात अनेक ठिकाणी विद्यापीठामध्ये इंग्रजी व्याखानावरून लक्षात येते इतर नेत्यापेक्षा इंग्रजी बोलण्यात सरस आहे हे मात्र नक्की .

असाच एक प्रसंग ३० ऑगस्ट २००१ मध्ये डरबन , दक्षिण आफ्रिका मध्ये भारतातील १२५ खासदाराचे नेतृत्व करताना आला . संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन त्यावेळी भरले होते त्या अधिवेशनात बोलताना आफ्रिकेमध्ये काळा गोरा हा वंशवाद या धर्तीवर भारतात होणारा जातिवाद हा खूप मोठा आहे आणि यालासुद्धा संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्याव पण तत्कालीन अध्यक्ष कोफी अन्नान यांनी नकार दिला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात होणाऱ्या जातीय अन्याय अत्याचाराची नोंद घेतली गेली याचे श्रेय प्रकाश आंबेडकराना जाते हे विरोधक आणि मनुवादी पक्षही त्यांच्या असणाऱ्या अफाट विद्वत्तेला मानतात .
प्रकाश आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या कुटुंबावर आरोप करणारे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन हल्ला करतात पण बाळासाहेब आपल्या कर्तुत्वाने आणि विद्वत्तेने त्याला उत्तर देतात , त्यांना ब्राह्मणकन्येशी विवाह केला म्हणून काही लोक विरोध करून आंबेडकरी घराण्यातील स्त्रीबद्दल वाईट बोलतात ,पण बाबासाहेबाच्या विचारानुसारच जाती अंतचाच हा भाग आहे , आणि इथे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे सांगता येईल कि बाळासाहेबांच्या पत्नी अंजलीताई मायदेव - आंबेडकर ह्या कुणी रूढीवादी ब्राह्मणकन्या नव्हेत तर बाबासाहेबांचे आवडते शिक्षक आणि बाबासाहेबांना घडविण्यात आणि तथागत गौतम बुद्धांचे पुस्तक भेट देणारे केळुस्कर गुरुजी यांच्या ह्या नात मग काही नालायक लोकाकडून असले नीच पातळीवरचे आरोप सुपारी घेऊन बदनामीकारक आहे , त्यांच्या मुलाची मुंज केली असाही आरोप करण्यात येतो आरोप करणारे तिथे जेवायला गेले असतील तर त्यांनी सिद्ध करून द्याव पण बाबासाहेबांच्या कुटुंबीयावर असले आरोप गद्दारपणाचे लक्षण आहे हे लक्षात घ्याव . बाबासाहेब जिवंत असते तर रडाले असते ,म्हणाले असते माझ्यानंतर माझ्या कुटुंबाने जे जे होईल ते केले , माझे अख्ख कुटुंब मी समाजाला अर्पण केले पण तुम्ही गद्दार निघालात अस मला ,माझ्या कुटुंबाला तुमच्याकडून त्रास होतो ,मी तुमच्यासाठी काहीच नसत केल तर योग्य झाल असत .

परंतु आजही बाळासाहेबाबद्दल समाजात खूप आदर आहे आणि तो त्यांनी सार्थही करून दाखविला , समाजाने आता एक पक्ष आणि एकच नेता ठरवून खरी आंबेडकरी चळवळ जपावी …………. जयभीम 

प्रकाश आंबेडकर - 1

नायक कसा असावा ? नायक असा असतो कि स्वताचा स्वार्थ न बघता समाजाची सेवा करणे ,स्वाभिमानी बाणा दाखवून समाजाच्या उन्नतीसाठी जगणे तोच खरा समाजाचा नायक अर्थातच नेता होऊ शकतो समाज म्हणजे विशिष्ट जातीचा किवा धर्माचा समूह नव्हे तर अखिल मानव जातीचा समूह होय.

अशाच एका नायकाचा वेध आपण घेणार आहोत , हा वेध घेताना कोणी याला राजकीय प्रमोशन मानेल किंवा काही पण नायक नेत्याचे त्याहीपेक्षा एका समाजकारन्याचे गुणविशेष आणि कौतुक झाले पाहिजे आणि जनतेला आपला नेता निवडायला पर्याय दयायला हवा . याचा असा अर्थ नव्हे कि इतर कोणी नेता वाईट आहे किवा नेतृत्व करू शकत नाही तरीही जनतेने बहुआयामी नेतृत्व स्वीकारून आपल्या राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक इ . वाटचालीस गतिमान कराव .

असाच एक नेता म्हणजे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून असली तरी स्वताची वेगळी ओळख राजकीय ,सामाजिक आणि धम्मकार्यात केलेली आहे . बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचेच काम प्रकाश आंबेडकर करत आहेत अस वाटत ,सामाजिक बदल झाल्याशिवाय राजकीय बदलाला काही अर्थ उरत नाही ,जातीअंताची लढाई बाळासाहेबांनी सुरु केलेली केलेली आहे त्याचा संदर्भ म्हणजेच बाबासाहेबांनी मांडलेले अमुल्य विचार Inhalation Of Caste या ग्रंथात आढळतात . बाळासाहेब आंबेडकरांनी कधी तडजोडीच्या राजकारणाला महत्व दिल नाही समाजहिताच्या गोष्टीपुढे सत्तेला नाकारणारे बाळासाहेब रक्ताचेच नाही तर खऱ्या आंबेडकरी विचारांचे वारसदार ठरतात म्हणून आम्हास ते इतराहून स्वाभिमानी आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व वाटतात याचा प्रत्यय व्ही . पी . सिंह यांच्या सरकारच्या वेळेला आला , निवडणूक पूर्व जनता दलाशी राजकीय समझोता करून सरकार सत्तेत आल्यावर मंत्रीपदाची व्ही . पी . सिंह यांची ऑफर न स्वीकारता आंबेडकरी समाजहिताच्या महत्वपूर्ण गोष्टी व्ही . पी . सिंहाकडून करवून घेतात त्यात १९५६ पासून अपूर्ण राहिलेली बाब ज्याचा अपमान बाबासाहेबांच्या मुलाला आणि प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांना मोरारजी देसाई पंतप्रधान असताना सहन करावा लागला सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोरारजीना भेटावयास गेले असता नवबौद्ध ,बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत करावा त्यावर चोरांचे मोर असलेले मोरारजी म्हणतात कि कोण सांगितले होते महारांना बौद्ध होण्याचे , त्यावर भैय्यासाहेब म्हणतात आमच्या बापाने आणि तेथून निघून जातात ,हीच मनातील सल आणि अखिल भारतातील बौद्ध जनतेच्या सुवर्ण अक्षरात लिहावा असा हा क्षण बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत व्ही. पी .सिंग यांना करायला भाग पाडतात हेच उत्तर आहे जे आरक्षणाचा लाभ घेतात आणि वर तोंड करून विचारतात प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी काय केल ? संसदेमध्ये बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर संसदेमध्ये तैलचित्र , भारतरत्न किताब हे बाळासाहेबांच्या मुस्तद्देगिरिचे फलित आहे

क्रमश:

!!! पुणे कराराचा धिक्कार म्हणजेच बाबासाहेबांचा धिक्कार !!!



बामसेफ ,मूलनिवासी , अम्बस ,भारत मुक्ती मोर्चा इ . जातीयवादी संघटना , मी जातीयवादीच म्हणेल कारण आंबेडकरी चळवळ हि सागरासारखी आहे त्यात असल्या घाण ,नाल्यातल्या सांडपाणी असलेल्या संघटना सागरास घाण करण्यास कार्यरत असतात . पुणे करार सारखे विषय घेऊन गेल्या २५ -३० वर्षामध्ये आंबेडकरी लोकांमध्ये जात आहेत . इतक्या वर्षात स्वतःलाच मुक्ती नाही देऊ शकले तर भारताला काय मुक्ती देणार ? विशिष्ट समाजाला लक्ष करून विविध जाती पाती जोडून शिकलेल्या पण तेव्हढ्याच प्रकारे स्वताच्या डोक्याने हुकलेल्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे खऱ्या आंबेडकरी चळवळीपासून दूर जात आहोत . गेल्या खूप दिवसापासून पुणे करार या विषयाचे अध्ययन सुरु केले असता लक्षात आले कि बामसेफ ,मूलनिवासी , अम्बस ,भारत मुक्ती मोर्चा इ . जातीयवादी संघटना खोटा अपप्रचार करीत आहेत , मग स्वताला आंबेडकरी म्हणवणाऱ्या ह्या भिक मागणाऱ्या संघटना RSS च्या आहेत कि आंबेडकरी आहेत हे कळत नाही .
भडवे ,दलाल या शिव्यांचा प्रवर्तक आणि बामसेफ या टोळीचा म्होरक्या वामन मेश्राम खोटा अपप्रचार करण्यात माहीर आहे शेवटी गोळा केलेल्या पैसा आणि संपत्ती च्या जोरावर समाजाला 'गुमराह ' करत आहे . काही अक्कल्शुन्य ,मूर्ख लोक स्वतःची विवेकबुद्धी कुठे गहाण ठेवतात त्यांना माहिती . फक्त एक मेंढी एकाच मार्गाने जात असेल तर बाकीही मेंढ्या त्याच मार्गाने जाणार कारण त्यांना इतर मार्ग माहित नसतो शेवटी ते मेंढीवळच असते त्यांचे.

२४ सप्टेंबर १९३२ ला जो करार गांधीजी आणि बाबासाहेबामध्ये झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो . बाबासाहेबांनी केलेल्या काही मागण्यावर महात्मा गांधी ला आक्षेप होता त्यामुळे गांधीजीने आमरण उपोषण सुरु केले होते त्यात महत्वाची बाब होती कि अस्पृश्यांना वेगळ्या राखीव जागा आणि बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी २ मतदानाची मागणी , मतदानाचे २ दा अधिकार हा इतर वर्गापासून विपरीत मागणी होती आणि त्यामुळे देशातील सर्व समान नागरिकतेला फाटा मिळाल्यागत होईल हि स्तिथि त्यावेळी निर्माण झाली होती . यातून गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो समझोता झाला तो पुणे करार होय . पुणे कराराचा तपशील खालीलप्रमाणे आहे

** Puna pact 1932**

1 There shall be seats reserved for the Depressed Classes out of general electorate seats in the provincial legislatures as follows: - Madras 30; Bombay with Sind 25; Punjab 8; Bihar and Orissa 18; Central Provinces 20; Assam 7; Bengal 30; United Provinces 20. Total 148. These figures are based on the Prime Minister's (British) decision.

2 Election to these seats shall be by joint electorates subject, however, to the following procedure All members of the Depressed Classes registered in the general electoral roll of a constituency will form an electoral college which will elect a panel of tour candidates belonging to the Depressed Classes for each of such reserved seats by the method of the single vote and four persons getting the highest number of votes in such primary elections shall be the candidates for election by the general electorate.

3 The representation of the Depressed Classes in the Central Legislature shall likewise be on the principle of joint electorates and reserved seats by the method of primary election in the manner provided for in clause above for their representation in the provincial legislatures. Central
Legislature

4 In the Central Legislature 18 per cent of the seats allotted to the general electorate for British India in the said legislature shall he reserved for the Depressed Classes.

5 The system of primary election to a panel of candidates for election to the Central and Provincial Legislatures as i herein-before mentioned shall come to an end after the first ten years, unless terminated sooner by mutual agreement under the provision of clause 6 below.

6 The system of representation of Depressed Classes by reserved seats in the Provincial and Central Legislatures as provided for in clauses (1) and (4) shall continue until determined otherwise by mutual agreement between the communities concerned in this settlement.

7 The Franchise for the Central and Provincial Legislatures of the Depressed Classes shall be as indicated, in the Lothian Committee Report.

8 There shall be no disabilities attached to any one on the ground of his being a member of the Depressed Classes in regard to any election to local bodies or appointment to the public services. Every endeavour shall be made to secure a fair representation of the Depressed Classes in these respects, subject to such educational qualifications as may be laid down for appointment to the Public Services.(Adult franchise but reservation has been provided for Dalits on population basis, till 1960),
9 In every province out of the educational grant an adequate sum shall be ear-marked for providing educational facilities to the members of Depressed Classes.

पुणे करार
१) प्रांतीय विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी अस्पृश्य वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.
२) या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी अस्पृश्य वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३) केंद्रिय कार्यकारिणीमध्ये अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.
४) केंद्रिय कारिणीमध्ये अस्पृश्य वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.
६) प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये अस्पृश्यांनाजागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे. तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.
७) केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत अस्पृश्यांनामतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.
८) अस्पृश्यांनास्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९) सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.

असा हा संक्षिप्त स्वरूपाचा पुणे करार होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी तो एक राजकीय समझोता गांधी सोबत केला . विशेष बाब म्हणजे हा पुणे कराराचा ड्राफ्ट गांधीजीने नव्हे तर बाबासाहेबांनी स्वतः बनविला होता ,या पुणे करारावर गांधीची नव्हे तर स्वतः बाबासाहेबांची सही आहे . मग या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी तत्कालीन परीस्थ्तीतीवर मात करण्यासाठी बनविल्या ,समाजाला अधिकार देण्यासाठी गांधीशी चार हात केले, यातून मार्ग म्हणजे पुणे करार ! बाबासाहेबांनी स्वतः तयार करून मार्ग काढला , त्याचा धिक्कार करणे म्हनजेच बाबासाहेबांचा धिक्कार आहे ,वामन मेश्राम आणि तत्सम जातीयवादी ,पैसा गोळा करणाऱ्या संघटना दिवसरात्र बाबासाहेबांचा धिक्कार आणि अपमान करत असतात . अशा संघटना पासून आंबेडकरी समाजाने व इतर बहुजन समाजाने सावध राहावे .
वामन मेश्राम लिखित पुस्तक " पुना पॅक्ट के दुष्परीणाम" या पुस्तकात अकलेचे तारे तोडताना म्हणतात कि पुणे कराराच्या विरुद्ध बाबासाहेबांनी १९४६ ला मोठ आंदोलन केल होत पण असा इतिहासात कोणताही संदर्भ नाही ,बाबासाहेब आंबेडकर हे जगातले इतके उच्चविद्याविभूषित , ज्ञानवंत महापुरुष होते कि कोणत्याही कार्यात चूक करू शकतील आणि परत ती सुधारण्यासाठी आंदोलन करतील हि गोष्ट अशक्यप्राय आहे . त्याच बाबासाहेबाबद्दल भ्रम निर्माण करणारे किती गद्दार आहेत तेही बघा . याच पुस्तकात ते असे सांगतात कि १५ जुलै १९४६ ला पुणे ला विधिमंडळाचे अधिवेशन भरणार होते त्यामध्ये उच्चन्यायालयाचे रिटायर्ड जज आर. आर. भोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले आणि त्यांना जेल पण झाली होती असा वामन मेश्राम ची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे . मुळात वामन मेश्राम यांना हे माहित नाही कि आर. आर. भोळे हे १९४६ ला मुळात जज नव्हतेच ते १९६७ ला मुंबई हायकोर्टाचे जज झाले .इथे माझा प्रश्न आहे कि १९४६ ला जज असलेली व्यक्ती परत जज होऊ शकते ? बर झाली तर झाली ज्या व्यक्तीला शिक्षा झालेली आहे ती जज होऊ शकते ? यासाठी वामन मेश्राम ने त्याकाळात सरकारकडे काही शिफारस केली असेल . अशा या खोट्या आणि लबाड माहितीने बामसेफ सारख्या संघटना बाबासाहेबांचाच धिक्कार करून अपमान करीत आहेत आणि असले हे लोक आंबेडकरी चळवळीपासून दूर आहेत आणि हेच लोक खरे दुश्मन आहेत .
वामन मेश्राम ,बामसेफ आणि त्याचे काही चेले हाच अपप्रचार करून थांबत नाहीत . खोटे संदर्भ देऊन खोटे दाखले देऊन बाबासाहेबांची विटंबना करीत आहे . गोलमेज परिषदेदरम्यान बाबासाहेब आणि गांधी दरम्यान उडालेले खटके आणि ब्रिटन मधल्या मिडियाने बाबासाहेबांच्या मुलाखती पुणे कराराच्या नंतरच्या आहेत असे सांगतात. अनेक संदर्भ देऊन त्यांना काय साध्य करायचं ते अधिक जाणो . 'पुणे करार' हा तत्कालीन परिस्तितीनुसार बाबासाहेबांनी केलेला करार होता त्यामुळे हजारो वर्षापासून अधिकारापासून वंचित असलेला समाज सत्तेत जाणार होता या पुणे कराराच्या अधिकारामुळे तत्कालीन समाजाचे प्रतिनिधी विधिमंडळात जाणार होते ,ज्या समाजाला गावाच्या बाहेर रहाव लागे , चाकरीची ,घाणेची कामे करावी लागायची तो समाज पुणे करारामुळे म्हणजेच बाबासाहेबामुळे हजारो वर्षापासून निपचित पडलेला समाज आज विधिमंडळात जाणार होता आणि तो एक ऐतिहासिक क्षण होता आणि इतिहासात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचा आपण निषेध करावा कि स्वागत करून बाबासाहेबांचा गौरव करावा अर्थात याचे उत्तर गौरवच येईल . या पुणे करारामुळे अनेक प्रतिनिधी विधिमंडळात गेले स्वताची सत्ता मिळाली मग या ऐतिहासिक गोष्टीला बाबासाहेबांचे नातू तथा रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर " पुणे करार अधिकार दिवस " जर साजरा करीत असतील तर ते चूक आणि तुम्ही ते खरे! अशा या नालायक संघटना अन या नालायकी प्रवृत्तीमुळे या संघटना समाजात प्रदूषणाचे वातावरण निर्माण करून बाबासाहेबांच्या घराण्यावर नीच पातळीवर जाऊन आरोप करतात , यात विलास खरात नावाचा नालायकी प्राध्यापक आपल्या ब्लॉग वर बाळासाहेब आंबेडकर , त्यांच्या पत्नी एव्हढेच नाही तर धम्म कार्यात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याविषयीही अर्वाच्य शब्दात आपल्या घाणेरड्या तोंडातून घाण बाहेर काढतो ,असा या मूर्ख बामसेफवासी नराधमाला चांगला धडा शिकवायला हवा . तथागत बुद्धाचा फोटो छापण्याची लाज वाटणाऱ्या या जातीयवादी संघटना जितक्या दूर केल्या तेव्हढा चांगल आंबेडकरी समाजासाठी असू शकते . बाबासाहेबांना कांशीराम , संत रविदास , बसवेश्वर या सारख्या लोकांच्या रांगेत लावून अपमान करणाऱ्या संघटनांचा जेव्हढा तिरस्कार करावा तेव्हढा कमी आहे . संत बसवेश्वर लिंगाला दैवत मानून लिंगाची पूजा करतात ,मी धम्माचा उपासक असल्याने मला अशा गोष्टी लिहिण्यासही लाज वाटते अशा लोकांना हे बाबासाहेबांच्या बरोबरीने फोटो लावतात अशा ह्या संघटनांचा निषेध करावा तेव्हढा कमी आहे . अशी हि दुष्कृत्ती करून ह्या संघटना स्वताला आंबेडकरवादी कशा म्हणवून घेतात जिथे पावलोपावली बाबासाहेबांची विटंबना करीत असतील तर समाजाने यांच्यापासून सावध राहावे.
मुळात पुणे करार आज अस्तित्वात आहे का ? हा मोठा प्रश्न आहे . याच उत्त्तर नाही अस आहे मग ज्या गोष्टीच अस्तित्व नाही त्या गोष्टीची वारंवार चर्चा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी करून त्यांच्यासाठी पोषक वातावरण या संघटना आणि त्यांचे म्होरके आणि चेले चपाटे करीत आहेत . काही दिवसांनी हे असही सांगतील कि संविधान हे बाबासाहेबांनी मजबुरीमध्ये लिहिले होते आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दुसरे होते म्हणून हे आता बदलायला हव . २६ नोव्हेंबर १९४९ ला बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना तयार करून शोषित ,पिडीत , मागास समाजास पुणे करारापेक्षाही अधिक अधिकार राज्यघटनेमध्ये देऊन स्वतंत्र भारताला नवी दिशा दिली . त्यावेळीच पुणे कराराचे अस्तित्व संपुष्टात आले आणि देशाची नवीन राज्यघटना बाबासाहेबांनी या देशाला दिली मग पुणे कराराचा संदर्भ देऊन असल्या संघटना फक्त लोकाकडून पैसे गोळा करीत आहेत आणि पुणे कराराचा धिक्कार करून बाबासाहेबांचाही धिक्कार करीत आहे अशा लोकांचा आपण खऱ्या स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने चांगला समाचार घ्यावा आणि या मागे असलेला पक्ष आणि संघटनाचा निषेध करून आपल्या विवेक बुद्धीने आणि बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराने आणि तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने अनुसरून मार्गक्रमण करावे … जय भीम …… नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव

!!! म्हाताऱ्याची अनैत्तिक कृत्ये अन वात्रटपणा !!!



आपल्या भोंदुगिरी आणि फसवेगिरी साठी प्रसिद्ध असलेला आसाराम नावाचा भोंदू जो कित्येक प्रकरणामध्ये आरोपी आहे . कुठे जमिन प्रकरणी फसवेगिरी करतो ,तर कुठे कोणा शिष्याला माहित असलेल्या कुकर्माबद्दल खून करतो ,कुठे लहान मुलांचे लैंगिक शोषण करतो तर कुठे काय काय ,पण कालपरवा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार त्याने केला तशी रीतसर त्या मुलीने तक्रार पण केलेली आहे . बलात्कार हा शब्द उच्चारताना आम्हाला लाज वाटते पण आसाराम बापू नावाचा भोंदू सराईतपणे बलात्कार करतो आणि सरकार मात्र अशा बापू भोंदू ना अभय देते . इथवरच तो आसाराम थांबला नाही तर काल चक्क त्याने स्वताची तुलना तथागत गौतम बुद्धाशी केली . तथागत हे विश्वासमान आहेत आणि आसाराम हा धुलीकणासमान . काय तर म्हणे बुद्धालाही असेच प्रसंग सहन करावे लागले होते . कुठे तथागत गौतम बुद्ध आणि कुठे हा नराधम आसाराम भोंदू ! उच्चवर्गातील काही मूर्ख लोक आपला पैसा कसा खर्च व्हावा आणि आपल्या काळ्या पैशातून कसा नंगानाच करता येईल आणि नाचगाणे करून स्वताचे मनोरंजन करून असल्या भोंदुना पाठीशी घालत आहे ,असा वर्गही तितकाच असल्या अनैतिक कृत्यासाठी जबाबदार आहे . तासानतास त्याचे प्रवचन ऐकत बसलेले लोक आणि असले भोंदू महाराज ,बापू दिन दुबळ्या लोकासाठी यांची नाळ तुटलेली दिसते . असे हे लोक खरोखरच इथल्या मूळ लोकांचे दुश्मन आहेत अस मी मानतो .

तथागत गौतम बुद्धावर असले आरोप करणारे त्या काळातले आसाराम सारखेच मनुवादी ब्राह्मण लोक होते ,बुद्धाची कीर्ती सर्वदूर पसरली होती . बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाने आणि पंचशिलेने लोक मार्गक्रमण करीत होते . ब्राह्मणवादाचे जोखड झुगारून लोक धम्मात शामिल होत होते त्यामुळे ब्राह्मणाच्या मनात बुद्धाविषयी घृणा निर्माण झालेली होती . कोणी लोक ब्राह्मणाला विचारत नव्हते सर्वत्र त्यांच्यावर थु थु होत होती . अशातच बुद्धाला बदनाम करण्यासाठी काही ब्राह्मणांनी एक डाव रचला . चिंचा नावाची देखणी ,सुंदर ब्राह्मणी तिला समोर करून तथागताला बदनाम करण्याचा डाव रचण्यात आला . तेव्हा तथागत श्रावस्ती मधील जेतवनात वास्तव्याला होते . जेव्हा लोक सायंकाळी तथागताचे दर्शन घेऊन आणि प्रवर्चन ऐकून परत येत तेव्हा हि चिंचा नावाची ब्राह्मणी हातामध्ये फुलांच्या माळा घेऊन जेतवनाकडे जात असे कोणी तिला विचारले तर उल ट उत्तर देत असे आणि म्हणत असे तुम्हाला काय करायचं ? परत रात्र जेतवनाच्या शेजारी असणाऱ्या तीर्थिकाराम वनात काढून परत सकाळी शहरात परतते तेव्हा लोक तिला विचारत कि रात्र कोठे घालवलीस तर त्यावर लोकांना उलट उत्तर देऊन म्हणायची तुम्हाला काय करायचे ? मी रात्र जेतवनात श्रमण गौतामासोबत घालवली त्यावर काही लोक विश्वास करायचे . हा प्रकार रोज चालायचा , असे ३ महिने उलटले तथागताची बदनामी व्हावी म्हणून तिने कपड्यांच्या चिंध्या पोटाला बांधून हा प्रकार असाच सुरु ठेवला आणि लोकांना वाटू लागले कि तिला ३ महिन्यांचा गर्भ राहिला . परत ९ व्या महिन्यात चिंचाने लाकडाचा ओंडका आणि त्यावर कापड पोटाला बांधले . विषारी किड्या मुंग्या ना स्वताच्या हाता पायाला चावून घेऊन सूज निर्माण केली .

अशावेळी तथागत लोकांना उपदेश करत असताना चिंचा तिथे जाऊन तथागतास म्हणाली ," हे श्रमण गौतमा ,तुम्हाला माझ्या पोटात वाढणाऱ्या गर्भाची काही काळजी नाही ,तुमची जबाबदारी आहे कि आपल्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या संगोपनाची आपण व्यवस्था करावी किवा आपल्या शिष्याला तशी सूचना करावी . यावर प्रवचन करणारे तथागत मध्येच गंभीर होऊन तिच्याकडे शांतपणे बघत राहिले . उपस्थित लोकांचा समुदाय स्तब्ध होऊन बघत होता . यावर तथागत गौतम बुद्ध म्हणाले , " हे भगिनी चिंचा , जे काही झाल हे माझ्या आणि तुझ्या मनाला चांगल्या प्रकारे माहित आहे. यावर चिंचा ब्राह्मणी म्हणाली ," हो हो माहित आहे माझ्या गर्भावस्थेला तुम्हीच कारणीभूत आहात आणि ती जोर जोरात खोकलू लागली . खोकल्यामुळे पोटाला बांधलेली लाकडी फळी पोटातून गळून पायावर पडली . त्यामुळे तिचा खोटेपणा लोकांच्या लक्षात आला . लोकांनी तिला काठीने मारून तेथून पिटाळून लावले . अशा प्रकारे बुद्धाला बदनामीचे अशाप्रकारचे अनेक षडयंत्रे तथागताच्या तेजाने गळून पडाली .

आसाराम सारखे असे भोंदू स्वतःची तुलना बुद्धाशी करून स्वताची नालायकी सिद्ध करत आहेत . ज्या तथागताचा धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिलाय आणि बौद्ध धम्माची मुलतत्वे भारतीय संविधानात समाविष्ट करून अखिल भारत तत्वाने बौद्धमयच केलेला आहे . मुळात मनुवाद्याना हे संविधान नको आहे त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे त्यामुळे या देशात असली कृत्ये केली जात आहे . परंतु मुठभर असणाऱ्या ह्या मनुवाद्याना हे माहित नाही कि बहुजन समाज आता जागृत होत आहे आणि असल्या आसरामासाठी तुरंग वाट पाहात आहे आपल्या दुष्कृत्याच्या शिक्षेसाठी !!!

!!! जयभिम ………………. नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – ३ !!!



मागील भागात आपण पाहिलं कि बौद्ध धम्माचे साहित्यिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे विकृतीकरण इथल्या ब्राह्मण्यवादाने केलेलं आहे . काही काल्पोकाल्पित काव्य, कथा रचून बहुजन समाजाला फिल्मी वाटणाऱ्या पात्राला प्रत्यक्षात उतरवून बहुजन समाजाला मानसिक गुलामीत लोटलेल आहे . इथल्या बहुजन ओबीसी ने स्वताला गुलामगिरीत ठेवायचं कि मुक्त व्हायचं हे त्यांनी ठरवावं परंतु बौद्ध धम्मबांधवांनी धम्माचे पालन आणि धम्माबद्दलचा विपर्यास आणि इतिहासाची माहिती ठेवणे हेही महत्वाच आहे .

' दसरा ' या शब्दाचा अर्थ आहे रावण ; याला दहा तोंड होती म्हणतात आणि त्याच दिवशी त्याचा वध करण्यात आला म्हणून हा दसहरा ! रावणाला दहा तोंडे नव्हतीच . दहा प्रकारची शक्ती याला प्राप्त होती , तो दसबलाने युक्त होता . ते दस बळ वैगेरे शक्ती काहीही नव्हत तर त्याने दहा परिमिता पूर्ण केलेल्या होत्या म्हणून तो दसबळ असलेला बौद्ध धर्मीय लंकेचा राजा रावण होता आणि दसबळ हे मुळात भगवान बुद्धाचे आहे

' सब्बेपि बुद्धं दसबल तनुज बोधिचेतिय नमामि '

- ज्याने दहा प्रकारचे बळ अथवा गुण प्राप्त केलेले आहे असे ते बुद्ध . या दसऱ्याला भारतातून ब्राह्मणी परंपरेने बौद्ध धम्माचा लोप केला हा अर्थ त्याच्यात आहे आणि रामायणामध्ये बुद्धाला चोर जाणा म्हटलेलं आहे . आजही आदिवासी रावणाची पूजा करतात . राम हा ब्राह्मण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा तर रावण हा ब्राह्मणेतर म्हणजेच बौद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा आहे . रावणाला ते राक्षस संबोधतात . राक्षस शब्दाचा अर्थ जो रक्षण करतो तो . कारण ' रक्ष' या धातूपासून राक्षस हा शब्द बनलेला आहे . यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी दिला जात असे परंतु यज्ञाला आणि प्राणीहत्येला ज्यांनी विरोध केला ते म्हणजेच राक्षस ज्यांनी प्राणीमात्रांचे आणि जनतेचे रक्षण केले ते असाच रक्षण करणारा रावण होता . रावणाला श्रीलंकेचा राजा दाखविण्याचे कारण म्हणजे श्रीलंका (सिलोन ) हे बौद्ध धर्माचे केंद्रस्थान होते . म्हणून रावण हा श्रीलंकेचा राजा दाखविलेल आहे . बौद्ध साहित्यात 'लंकावतार सूत्र' हे अत्यंत महत्वाचे आहे . रामायण हे महाकाव्य आहे आणि हे महाकाव्य पाली भाषेतील जातक कथेतील 'दसरथ जातक ' या जातक कथेमधून आणि ब्राह्मणी स्वरूप देऊन रचण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे भगवतगीता हे दुसर तिसर काहीही नसून धम्मपदाची नक्कल आहे . ' विजयादशमी ' च्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवून बुद्धधम्माचा स्वीकार केला म्हणून ही विजयादशमी आहे . परंतु याच दिवशी ब्राह्मणी परंपरा शस्त्र काढून त्याची पूजा करतात .

' दिवाळी ' च्या दिवशी धम्मसेनापती महामोग्गलायन यांना ठार करून तुकडे तुकडे करण्यात आले कारण बौद्ध धम्माचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार धम्मसेनापती महामोग्गलायन यांनी केला होता म्हणून त्यांचा काटा काढायचा म्हणून हे कृत्य ब्राह्मणी संस्कृतीने कट रचून केले . आणि तो दिवस 'दिवाळी' म्हणून साजरा केला . नागपूर मधील रामटेक या ठिकाणी आश्विन पौर्णिमेला ' पितांबर ' जाळतात त्याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतात . 'पीत ' म्हणजे पिवळे व 'अंबर ' म्हणजे वस्त्र म्हणजेच याच दिवशी अनेक बौद्ध भिक्खू च्या कत्तली आणि खून यांनी केलेत आणि याच दिवशी धम्मसेनापती सारीपुत्र यांचे महापरीनिर्वाण झाले त्यांना मारून टाकण्यात आल म्हणून ते पितांबर जाळण्याची परंपरा निर्माण करतात .

आर्य नागार्जुन हे आयुर्वेदाचे श्रेष्ठ जाणकार होते तसेच बौद्ध धर्मीय ,आयुर्वेदाला जे मोठे स्वरूप प्राप्त झाले ते केवळ नागार्जुन मुळे ! परंतु इथली ब्राह्मणी संस्कृती आयुर्वेदाला फक्त नागार्जुन यांचे नाव देतात मात्र आचार ,विचार पूर्ण वैदिक आणि ब्राह्मणी परंपरेचे आहेत . योगा हि बौद्ध धम्माची देन आहे . पंतजली याने बौद्ध धम्माचा उपासक असल्याचा आव आणून हि विद्या शिकून घेतली नंतर बौद्धांचे विरोधक बनून ब्राह्मणी शासन निर्माण केले आणि योगविद्या ब्राह्मणी परंपरेने प्रसारित केली . योगविद्या हे दुसरे तिसरे काही नसून 'आनापानसतिचे' विकृतीकरण केले आहे . पाली हि साऱ्यांची भारतीय भाषांची जननी आहे , असे आचार्य बुद्धघोषाने म्हटले आहे . परंतु ब्राह्मणी परंपरेने संस्कृतला साऱ्या भाषांची जननी आहे अस म्हटलं आहे .

बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरे कपडे धारण करतात . हे कपडे आपण मंगलप्रसंगी धारण करतो . आपण पाहतो कि उच्चवर्णीयाकडे कोणी मृत झाले असेल तर ते पांढरे वस्त्र धारण करतात . धम्मामध्ये आपण शुभेच्छ्या देतांना 'भवतु सब्ब मंगल ' असे म्हणतो . पण ब्राम्हणी परंपरा याचेही विकृतीकरण करते मंगल या शब्दाचा अर्थ ब्राम्हणी परंपरेने मुला - मुलीना अडथळे आल्यास ' मंगळ आहे' असे म्हणतात . करुणा ,मैत्री , मुदिता आणि उपेक्षा हे 'ब्रम्ह ' आहे . हेच श्रेष्ठ आहे . परंतु ब्राम्हणी परंपरेने ब्रम्हा ला श्रेष्ठ म्हटले आहे . 'पूजयामि मुनिन्दस्स सिरीपादसरोरुहे ' म्हणजे येथे सिरीपाद म्हणजे 'श्रीपाद '. श्री म्हणजे गुणसंपन्न ,विद्यासंपन्न ,सर्वज्ञ असे जे बुद्ध म्हणजे मुनींचे जे इंद्र (प्रमुख ) असे जे आहेत . ज्यांचे चरण हे कमाळाप्रमाणे आहेत , त्यांची पूजा करतो . श्रीपाद हे बुद्धाचे नाव आहे . पालीमध्ये ' गणपती ' या शब्दाचा अर्थ गण म्हणजे भिक्षुंचा गण अथवा संघ व पती म्हणजे प्रमुख हे भगवान बुद्धाला उद्देशून म्हटले आहे पण यांनी मळाचा आणि हत्तीच्या डोक्याचा गणपती बनविलेला आहे .

अशाप्रकारे ब्राम्हणी परंपरेने बौद्ध संस्कृतीचे जे विकृतीकरण केलेले आहे ते सर्वांनी जाणायला हव आणि बदलत्या काळात बुद्धविचार रुजवायला हवेत . इतिहासकालीन वास्तव उलगडून इतरांना दाखवायला हव तर बौद्ध धम्माच्या वाटचालीस नवी प्रेरणा आणि दिशा मिळेल . यासाठीच हा माझा छोटा प्रयत्न तीन भागामध्ये दाखविण्याचा होता . आपणही याच अवलोकन करून प्रचार आणि प्रसार करावे हि विनंती !

!!! जयभीम ............... नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक